शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे प्रभावीत आदिवासींसाठी हजार कोटींची के.सी.पाडवी यांची केंद्राकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 13:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे उद्भवणा:या  आव्हानात्मक काळात आदिवासी जमातींना तातडीने दिलासा मिळावा यासाठी एक हजार कोटी रुपयांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनामुळे उद्भवणा:या  आव्हानात्मक काळात आदिवासी जमातींना तातडीने दिलासा मिळावा यासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी आदिवासी विकास मंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी केंद्राकडे केली आहे. याबाबत केंद्रीय आदिवासी कार्य मंत्री अजरुन मुंडा यांना पत्र तसे पत्र लिहिले आहे. पत्रात म्हटले आहे की, केंद्र शासनाकडून 2020-21 या आर्थिक वर्षासाठी कलम 275(1) आणि विशेष केंद्रीय अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत मिळणारा हजार  कोटींचा निधी राज्यांना लॉकडाऊनमुळे बाधित झालेल्या आदिवासींसाठी योजना राबविण्यासाठी उपलब्ध करून द्यावा. आदिवासींची उपजिवीका आणि अन्न सुरक्षा संबंधित मदतकार्यांसाठी राज्यातील अखर्चित रक्कम पुर्ननियोजन करून वापरण्यासाठी परवानगी देण्यात यावी. गरजूंना तातडीने मदत करण्यासाठी आणि त्यांच्यापयर्ंत आवश्यक बाबी पोहोचविण्यासाठी हे उपयुक्त ठरेल.आदिम जमाती आणि पारधीसारख्या सामाजिकरित्या अत्यंत मागासलेल्या जमाती शिधापत्रिकेसाठी कोणत्याही प्रकारचे कागदपत्र उपलब्ध करून देऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ घेता येत नाही. अशा जमातीतील नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांशिवाय रेशनकार्ड देण्याबाबत केंद्र सरकारने दिशानिर्देश द्यावेत. यातील बहूतेक स्थलांतरीत मजूर असून त्यांना शिधापत्रिका दिल्यास सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे त्यांना अन्नधान्य उपलब्ध होऊ शकेल. आदिम आणि पारधी जमातीला अंत्योदय येाजनेअंतर्गत शिधापत्रिका देण्यात याव्यात.रेशनकार्डसाठी अर्ज प्रलंबित असलेल्या सर्व आदिवासी अर्जदारांनाही या वेळी अन्न सुरक्षेअंतर्गत धान्याचा लाभ देण्याची आवश्यकता आहे. भारत सरकारचे सध्याच्या परिस्थितीत गौण वन उपज योजनेसाठी आधारभूत किमतीच्या व्यापक उपयोगाचे धोरण असून त्याकरिता मात्र विशेष निधी देण्यात आलेला नाही.  वनधन योजना हे त्यादृष्टीने चांगले पाऊल असून अर्थसहाय्य आणि विपणन साखळीशी योजनेला जोडणे गरजेचे आहे.महाराष्ट्रातील नंदुरबार सारख्या इतर अतिदुर्गम आदिवासी भागांमध्ये मोबाईल टॉवर बंद स्थितीत आहेत. नंदुरबार किंवा राज्यातील इतर दुर्गम आदिवासी भाग, गुजरात आणि मध्यप्रदेशचा आदिवासी वस्तीचा भागात मोबाईल नेटवर्क नसल्याने कोविड-19 सारख्या संसर्गाबाबत या भागात संपर्क स्थापित करता येत नाही. बीएसएनएल, एमटीएनएल किंवा खाजगी कंपन्यांनी तेथे पुर्ण क्षमतेने चालणारे टॉवर्स स्थापित करणे गरजेचे आहे. दूरसंचार मंत्रालयाला या समस्येबाबत अवगत करण्यात यावे आणि या सर्व समस्यांबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.