शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

बेफिकीरपणा पुन्हा कोरोनाला आमंत्रण देणार, सण, उत्सवांमधील गर्दी कारणीभूत, चाचण्या वाढविणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:32 IST

सण, उत्सवांमधील गर्दी सध्या सण, उत्सवांची रेलचेल सुरू आहे. शासन, प्रशासनाने कोरोनाचे अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे कोरोना ...

सण, उत्सवांमधील गर्दी

सध्या सण, उत्सवांची रेलचेल सुरू आहे. शासन, प्रशासनाने कोरोनाचे अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे कोरोना कायमचा हद्दपार झाला, या आविर्भावात नागरिक वावरत आहेत. सार्वजनिक ठिकाणी वावरताना, बाजारात फिरताना, कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना कुणाच्याही चेहऱ्यावर मास्क नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव होण्याची शक्यता वाढली आहे. त्याचे परिणाम जिल्हावासीयांना येत्या काळात भोगावे लागतील, हे स्पष्टच आहे.

विनामास्कची कारवाईही थंडावली

जिल्ह्यात पूर्वी विनामास्कची कारवाई पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर करण्यात येत होती. दीड वर्षात तब्बल ७० हजार जणांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. परंतु कोरोनाचे निर्बंध शिथिल होताच विनामास्कची कारवाईदेखील थंडावली आहे. पूर्वीप्रमाणेच पोलिसांनी विनामास्कची कारवाई सुरू ठेवली, तर किमान नागरिकांमध्ये मास्क लावण्याचे तरी भान राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोविड कक्षही बंद

जिल्ह्यातील ठिकठिकाणी सुरू करण्यात आलेले कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालयात असलेल्या कोविड कक्षात बेड तयार ठेवण्यात आलेले असले, तरी या सेंटरमधील डॅाक्टर व इतर कर्मचारी काढून घेण्यात आले आहेत. ज्यांना तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्यात आले होते, त्यांची सेवासमाप्ती करण्यात आली आहे.

खाजगी रुग्णालयांमधील कोविड कक्षही बंदच आहेत. असे असले तरी संशयित रुग्ण आल्यास त्यावर कोरोनाच्या नियमांच्या आधारे उपचार केले जात आहे.

दक्षता न घेतल्यास पुन्हा संकट

नागरिकांनी दक्षता न घेतल्यास कोरोनाचे संकट पुन्हा दाराशी येणार आहे. तिसऱ्या लाटेबाबत आरोग्य यंत्रणा इशारे देत आहेत. असे असतानाही नागरिकांमधील बेफिकीरपणा वाढतच चालला आहे. येत्या काळात अर्थात दिवाळीपर्यंत अनेक सार्वजनिक सण, उत्सव साजरे होणार आहेत. त्यातील गर्दी संकटाला आमंत्रण देणारी ठरणार आहे. दिवाळीनंतर लागलीच लग्नसीझनदेखील सुरू होणार आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी ते पोषक तर ठरणार नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सर्दी, खोकला, तापाची साथ

जिल्ह्यात वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. संसर्गजन्य असलेल्या या आजारामुळे अनेक दवाखान्यांमध्ये अशा रुग्णांची गर्दी होत आहे. जिल्हा रुग्णालयातील ओपीडीचा अंदाज घेतला तर साथीच्या अशा आजाराचे रुग्ण सर्वाधिक असल्याचे चित्र आहे. साधारण सर्दी, ताप असल्यास घाबरून न जाता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोना चाचण्या वाढवाव्या

सध्याचे साथीचे आजार आणि आढळून आलेला नवीन रुग्ण हे पाहता जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढवाव्या, अशी मागणी होत आहे. कारण आठवी ते १२ वीचे वर्ग सुरू आहेत. आश्रमशाळादेखील सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना धोका निर्माण होऊ नये, यासाठी कोरोना चाचण्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे. यापूर्वी झालेल्या बैठकांमध्ये जिल्हाधिकारी यांनी तशा सूचनाही दिलेल्या आहेत. गेल्या चार ते पाच दिवसांचा अंदाज घेतला तर सरासरी १०० ते १५० जणांच्या चाचण्या केल्या जात आहेत. चार दिवसांत ६३० जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.