नंदुरबार : दहावी, बारावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनावर जाहीर करण्यात आला. त्यात अनेक विद्यार्थ्यांना कमी तर काही विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळाले. अपेक्षेपेक्षा कमी मिळालेले विद्यार्थी आता शिक्षक, अधिकारी यांना प्रश्न विचारून भंडावून सोडत असल्याचे चित्र आहे. अंतर्गत मूल्यमापनाचे फायदे व तोेटे निकालाच्या माध्यमातून समोर आले आहे. साधारण विद्यार्थीही चांगल्या गुणांनी पास झाले आहेत.
परीक्षा नाही, पुनर्मूल्यांकनही नाही
n अंतर्गत मूल्यमापन झाल्याने परीक्षेचा संबंध नाही. त्यामुळे कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनालाही वाव नाही.
n त्यामुळे दाद कशी आणि कुठे मागणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना हा पेच पडत आहे.
n याउलट साधारण गुणवत्तेचा विद्यार्थी मात्र खूश आहे.
अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे मिळालेले गुण अपेक्षित आहेत. परंतु परीक्षा झाली असती तर आणखी काही गुण वाढले असते असा माझा विश्वास आहे. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाचा फायदा व काहींना तोटा देखील झाला आहे. मला दोन विषयात कमी गुण मिळालेले आहेत. परीक्षा झाली असती तर नक्कीच जास्त गुण मिळवले असते.
-एक विद्यार्थी.
n कोरोनाकाळ असल्यामुळे शाळा बंद होत्या, परीक्षाही झाल्या नाहीत. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाची पद्धत चांगली झाली. परंतु लेखी परीक्षेपेक्षा अंतर्गत मूल्यमापनात पाल्याला कमी गुण मिळाल्याचे एका पालकाने सांगितले.
n अंतर्गत मूल्यमापनाची पद्धत बोर्डाने ठरवून दिली होती. वास्तविक नववीचा विद्यार्थी दहावीत चांगला अभ्यास करतो. त्यामुळे तो दहावीच्या लेखी परीक्षेत चांगले गुण मिळवतो.
n शिक्षण विभाग, बोर्ड यांनी वारंवार सूचना देऊन, पडताळणी करून शाळांकडून अंतर्गत मूल्यमापन करून घेतले. त्यामुळे त्यात पारदर्शकता देखील राहिल्याचे काही पालकांनी स्पष्ट केले.