शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याचे दर वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:35 IST

भाजीपाला दररोज आहारात नियमित व आवश्यक आहे. श्रावण महिन्यात शाकाहारी भोजन करणाऱ्यांची संख्या वाढते. परिणामी भाजीपाल्याला मोठी मागणी आहे. ...

भाजीपाला दररोज आहारात नियमित व आवश्यक आहे. श्रावण महिन्यात शाकाहारी भोजन करणाऱ्यांची संख्या वाढते. परिणामी भाजीपाल्याला मोठी मागणी आहे. भाजीपाला हा नाशवंत प्रकारात मोडला जात असल्याने त्याला बराच कालावधीसाठी स्टोरेज करता येत नाही. शेतातून विक्रीसाठी भाजीपाला आल्यानंतर २४ तासांच्या आत त्याची विक्री झाली नाही तर त्यानंतर तो कुजायला लागतो. भाजीपाल्याचे दर पावसाळ्यापूर्वी सर्वसामान्यांच्या आटोक्यात होते. मात्र दोन महिन्यांनंतर त्यात कमालीची वाढ झाली असल्याने भाजीपाल्याच्या दरात कमालीची तेजी आहे.

येथून येतो भाजीपाला

नंदुरबार जिल्ह्यात सर्वात मोठी भाजी मंडई म्हणून शहादा येथील महात्मा जोतिबा फुले भाजीपाला मार्केटची ओळख आहे. या भाजी मार्केटमध्ये सर्व प्रकारच्या फळ व पालेभाज्या या मध्य प्रदेश व गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागातून तसेच धुळे जिल्‍ह्यातील कापडणे, साक्री, पिंपळनेर व नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथून विक्रीसाठी येत असतो. या भाजी मंडईत दररोज रात्री ९ वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांनी आणलेल्या भाजीपाल्याचा लिलाव होऊन होलसेल भावाने नंदुरबार जिल्ह्यासह मध्य प्रदेशातील सेंधवा व गुजरात राज्यातील राजपिपलापर्यंत भाजीपाल्याचा पुरवठा होतो. अतिपर्जन्यमान झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन घटल्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी असल्याने होलसेल मार्केटमध्ये भाजीपाल्याच्या दरात ५० ते १०० टक्के भाववाढ झाल्याने किरकोळ विक्रीचे दर कमालीचे कडाडले आहेत.

बटाटा खातोय भाव

शहादा येथील भाजी मार्केटमध्ये उत्तर प्रदेशातील आग्रा व गुजरात राज्यातील ढिसा येथून आयात केला जातो. बटाट्याला भाजीपाल्याचा राजा म्हणतात. बटाटा हा सर्व प्रकारच्या भाज्यांमध्ये मिक्स करता येतो. त्याचप्रमाणे उपवासाच्या फराळाच्या पदार्थांमध्ये याचा समावेश होत असल्याने दररोज किमान २५ टन बटाट्याची विक्री शहादा मार्केटमध्ये होत असते. वर्षभर बटाट्याच्या भावात चढउतार होत असतात.

व्यापारी म्हणतात..

पावसाळ्यात भाजीपाला सर्वात जास्त खराब होतो. काही ठिकाणी नैसर्गिक आपत्ती व अतिपर्जन्यमानामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटते. परिणामी शेतकऱ्यांकडून मार्केटला पुरवठा कमी होतो. आवक कमी झाली तर भाववाढ होते. भाजीपाल्याचे दर हे दोन महिन्यापूर्वीपेक्षा आता होलसेल मार्केटमध्ये वाढले आहेत. भाजीपाला साठवण्यासाठी व्यवस्था नसल्याने दिवसभरात आलेल्या संपूर्ण मालाची विक्री रात्रीत करावीच लागते.

- भरत दुरंगी, सचिव, महात्मा फुले भाजी मार्केट, शहादा

पावसाळ्यापूर्वी भाजीपाल्याचे उत्पादन जास्त प्रमाणात होत असल्याने दर आवाक्यात राहतात. मात्र भाजीपाला हा नाशवंत प्रकार असल्याने पावसाळ्यात भाजीपाल्याची नासधूस होत असल्याने आवक कमी होते. परिणामी भाजीपाल्याचे भाव वाढतात. भाजी मार्केटला शेतकऱ्यांकडून ज्या प्रमाणात पुरवठा होतो त्यानुसार भाजीपाल्याचे दर ठरत असतात.

-सतीश महाजन, अध्यक्ष, महात्मा फुले भाजी मार्केट, शहादा

गृहिणी म्हणतात..

पावसाळ्यात अनेकवेळा मनासारखी भाजी मिळत नाही. दैनंदिन आहारात समाविष्ट असलेल्या भाज्यांचे दर कमालीचे वाढले आहेत. पालेभाज्यांसह फळभाज्यांच्या दरातही वाढ झाली असल्याने आता करावे तरी काय? अशी विवंचना कायम असते. आवडीच्या भाज्यांचा समावेश दररोजच्या आहारात करावा तर त्यांच्या वाढलेल्या दरामुळे भाजी खरेदी करताना विचार करावा लागतो.

- उमा बागल, शहादा

आमच्या वसाहतीत दररोज भाजीपाला विक्री करणारी बाई येते. अनेकवेळा तिच्याकडे मेथी, पालक या आवडीच्या भाज्या नसतात. या भाज्या का नाही अशी विचारणा केली असता ती म्हणते आज होलसेल मार्केटमध्ये महाग दराने या भाज्यांची विक्री झाली असल्याने किरकोळ विक्री करताना ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद लाभत नाही. म्हणून या भाज्या विक्रीला आणल्या नाहीत. गेल्या दोन महिन्यात भाजीपाल्याचे दर वाढल्याने मासिक बजेटही बिघडले आहे.

- सुनीता भामरे, शहादा

होलसेल मार्केटमधील भाजीपाल्याचे दर पावसाळ्यापूर्वी

मेथी ३० रुपये किलो

पालक १० रुपये किलो

कोथिंबीर १० रुपये किलो

मिरची १० रुपये किलो

टमाटे ५ रुपये किलो

वांगे २ रुपये किलो

लसूण २५ रुपये किलो

बटाटा १० रुपये किलो

होलसेल मार्केटमधील भाजीपाल्याचे दर पावसाळ्यानंतर

मेथी ५० रुपये किलो

पालक २५ रुपये किलो

कोथिंबीर ४० रुपये किलो

मिरची २५ रुपये किलो

टमाटे १५ रुपये किलो

वांगे २५ रुपये किलो

लसूण ४० रुपये किलो

बटाटा १४ रुपये किलो