शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

रानभाज्या खा अन् निरोगी राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:34 IST

या रानभाज्या आपल्याला ठाऊक आहेत का? आघाडा : आघाडा ही रानभाजी असून तिची कोवळी पाने, बिया उपयुक्त ठरतात. ही ...

या रानभाज्या आपल्याला ठाऊक आहेत का?

आघाडा : आघाडा ही रानभाजी असून तिची कोवळी पाने, बिया उपयुक्त ठरतात. ही वनस्पती भूक वाढवणारी, वात, हृदयरोग, मूळव्याध, मुतखडा, पोटदुखी, जलोदर, अपचन, आमांश, रक्तरोग, श्वासनलिका दाह इत्यादी रोग व विकारात उपयुक्त आहे. ही रानभाजी नेहमी सातपुड्यातील घनदाट जंगलात आढळते.

टाकळा : टाकळ्याच्या पानांची भाजी गुणाने उष्ण असल्याने शरीरातील वात व कफदोष कमी होण्यास मदत होते. वरचेवर ही भाजी खाल्ल्याने अंगातील अतिरिक्त मेद झडण्यास याचा उपयोग होतो. त्याचबरोबर इसब, ॲलर्जी, सोरायसिस, खरूज यासारखे त्वचा विकारही कमी होतात. लहान मुलांच्या पोटातील कृमी बाहेर पडण्यासही या भाजीचा उपयोग होतो.

अळू : अळू ही कंदमूळ प्रकारात मोडणारी, अरॅशिए सुरण कुळातील वनस्पती आहे. अळू हा बारमाही उगवणारा असून अळू ही एक औषधी वनस्पतीही मानली जाते. अळू थंड असल्याने ते वात, पित्त, कफनाशक असतात. तसेच अशक्तपणा दूर करण्यासाठी अळूची पाने ही प्रभावकारी ठरतात. अळूच्या पानांवर बेसन आणि इतर मसाले थापून पानाला उभी घडी घालून वाफेवर उकडतात. नंतर त्या पानाच्या वड्या पाडतात. या वड्यांना पात्रादेखील बोलले जाते.

करटोली : हे डोकेदुखीवरील उत्तम औषध आहे. कंदाचे चूर्ण व वंगभस्म मधुमेहात देतात. डोक्याचा त्रास, मुतखडा, सर्व प्रकारची विषबाधा, हत्तीरोग या विकारात कंदाचा वापर करतात. करटोलीचे भाजलेले कंद मूळव्याधीत रक्तस्राव थांबविण्यास आणि आतड्यांच्या तक्रारीत उपयोगी आहे. कंद कफोत्सर्जक आणि थंडी वाजून येणाऱ्या तापात उपयुक्त आहे.

शेवगा : शेवग्याच्या पानामध्ये अ, ब, क जीवनसत्त्वे तसेच कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, आयोडिन ही खनिजद्रव्ये, प्रथिने,तंतूमय पदार्थ हे मोठ्या प्रमाणात आढळतात. या भाजीमुळे पचन संस्थेचे विकार बरे होण्यास मदत होते. तसेच पानं, फुलं, फळं, बिया अशा सर्वच गोष्टी खाद्य म्हणून उपयोगात येतात.

या रानभाज्या झाल्या गायब

अंबाडी : सातपुड्याच्या दुर्गम भागात आढळणारी अंबाडी आता दुर्मिळ होत असून दिसेनाशी होत आहे. आंबट चवीची अंबाडीची भाजी ही चविष्ट तर असतेच शिवाय अनेक पोषकतत्त्वांनीही परिपूर्ण असते. अंबाड्याच्या भाजीत आयर्न (लोह), व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी-६, कॅल्शियम, झिंक आणि अँटीऑक्सिडंट यासारखे अनेक पोषकतत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.

बांबूची रानभाजी : सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात मोठ्या प्रमाणावर बांबूची रानभाजी उपलब्ध राहायची. परंतु कालांतराने ही रानभाजी दुर्मिळ होत चालली असून काही प्रमाणात आढळून येते. या रानभाजीने रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत होऊन शरीर फिट राहते. तसेच मुतखडा, लघवी साफ होण्यास मदत होते.

शक्तिवर्धक रानभाज्या

बांबूची कोंब, शेवळाची कोंब, टोळंबीचे तेल, मोठी आंबाडी ही हळूहळू सातपुड्यातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या रानभाज्या गुणकारी असून याचा वापर आदिवासी बांधव दैनंदिन जीवनात करत होते. तसेच काही रानभाज्या ऋतूनुसार निघत असून याचा वापर आहारात मोठ्या प्रमाणावर केला जातो.

-सावन मोता वसावे, मोलगी, ता.अक्कलकुवा