शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

रानभाज्या खा अन् निरोगी राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:34 IST

या रानभाज्या आपल्याला ठाऊक आहेत का? आघाडा : आघाडा ही रानभाजी असून तिची कोवळी पाने, बिया उपयुक्त ठरतात. ही ...

या रानभाज्या आपल्याला ठाऊक आहेत का?

आघाडा : आघाडा ही रानभाजी असून तिची कोवळी पाने, बिया उपयुक्त ठरतात. ही वनस्पती भूक वाढवणारी, वात, हृदयरोग, मूळव्याध, मुतखडा, पोटदुखी, जलोदर, अपचन, आमांश, रक्तरोग, श्वासनलिका दाह इत्यादी रोग व विकारात उपयुक्त आहे. ही रानभाजी नेहमी सातपुड्यातील घनदाट जंगलात आढळते.

टाकळा : टाकळ्याच्या पानांची भाजी गुणाने उष्ण असल्याने शरीरातील वात व कफदोष कमी होण्यास मदत होते. वरचेवर ही भाजी खाल्ल्याने अंगातील अतिरिक्त मेद झडण्यास याचा उपयोग होतो. त्याचबरोबर इसब, ॲलर्जी, सोरायसिस, खरूज यासारखे त्वचा विकारही कमी होतात. लहान मुलांच्या पोटातील कृमी बाहेर पडण्यासही या भाजीचा उपयोग होतो.

अळू : अळू ही कंदमूळ प्रकारात मोडणारी, अरॅशिए सुरण कुळातील वनस्पती आहे. अळू हा बारमाही उगवणारा असून अळू ही एक औषधी वनस्पतीही मानली जाते. अळू थंड असल्याने ते वात, पित्त, कफनाशक असतात. तसेच अशक्तपणा दूर करण्यासाठी अळूची पाने ही प्रभावकारी ठरतात. अळूच्या पानांवर बेसन आणि इतर मसाले थापून पानाला उभी घडी घालून वाफेवर उकडतात. नंतर त्या पानाच्या वड्या पाडतात. या वड्यांना पात्रादेखील बोलले जाते.

करटोली : हे डोकेदुखीवरील उत्तम औषध आहे. कंदाचे चूर्ण व वंगभस्म मधुमेहात देतात. डोक्याचा त्रास, मुतखडा, सर्व प्रकारची विषबाधा, हत्तीरोग या विकारात कंदाचा वापर करतात. करटोलीचे भाजलेले कंद मूळव्याधीत रक्तस्राव थांबविण्यास आणि आतड्यांच्या तक्रारीत उपयोगी आहे. कंद कफोत्सर्जक आणि थंडी वाजून येणाऱ्या तापात उपयुक्त आहे.

शेवगा : शेवग्याच्या पानामध्ये अ, ब, क जीवनसत्त्वे तसेच कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, आयोडिन ही खनिजद्रव्ये, प्रथिने,तंतूमय पदार्थ हे मोठ्या प्रमाणात आढळतात. या भाजीमुळे पचन संस्थेचे विकार बरे होण्यास मदत होते. तसेच पानं, फुलं, फळं, बिया अशा सर्वच गोष्टी खाद्य म्हणून उपयोगात येतात.

या रानभाज्या झाल्या गायब

अंबाडी : सातपुड्याच्या दुर्गम भागात आढळणारी अंबाडी आता दुर्मिळ होत असून दिसेनाशी होत आहे. आंबट चवीची अंबाडीची भाजी ही चविष्ट तर असतेच शिवाय अनेक पोषकतत्त्वांनीही परिपूर्ण असते. अंबाड्याच्या भाजीत आयर्न (लोह), व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी-६, कॅल्शियम, झिंक आणि अँटीऑक्सिडंट यासारखे अनेक पोषकतत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.

बांबूची रानभाजी : सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात मोठ्या प्रमाणावर बांबूची रानभाजी उपलब्ध राहायची. परंतु कालांतराने ही रानभाजी दुर्मिळ होत चालली असून काही प्रमाणात आढळून येते. या रानभाजीने रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत होऊन शरीर फिट राहते. तसेच मुतखडा, लघवी साफ होण्यास मदत होते.

शक्तिवर्धक रानभाज्या

बांबूची कोंब, शेवळाची कोंब, टोळंबीचे तेल, मोठी आंबाडी ही हळूहळू सातपुड्यातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या रानभाज्या गुणकारी असून याचा वापर आदिवासी बांधव दैनंदिन जीवनात करत होते. तसेच काही रानभाज्या ऋतूनुसार निघत असून याचा वापर आहारात मोठ्या प्रमाणावर केला जातो.

-सावन मोता वसावे, मोलगी, ता.अक्कलकुवा