शहरं
Join us  
Trending Stories
1
कोसळल्या धारा...! केरळमध्ये मान्सून दाखल झाला; महाराष्ट्रात कधी पोहोचणार...
2
'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
3
पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी
4
अरे देवा! तरुणाला चष्मा न लावणं पडलं महागात; ५०० रुपयांऐवजी गमावले तब्बल ९० हजार
5
ट्रम्पच्या 'त्या' निर्णयामुळे बेल्जियमच्या भावी राजकुमारीचे शिक्षण धोक्यात; कोण आहे एलिझाबेथ?
6
'हयगय केली जाणार नाही', IG जालिंदर सुपेकरांचं नाव चर्चेत, अजित पवारांचा कारवाईचा इशारा
7
कोरोना का वाढतोय? लसीचा प्रभाव संपला की अन्य काही...; २०१९ मध्ये जेव्हा पहिल्यांदा आलेला तेव्हा... 
8
Jyoti Malhotra : "ती गुप्तहेर नाही, फक्त एक..."; पाकिस्तानी बहीण हिरा बतूलने घेतली ज्योती मल्होत्राची बाजू
9
१०० ते १५० लोक, ६१ लॅपटॉप, ४१ मोबाईल, पुण्यात बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड
10
काळरात्र! सर्पदंशाने दोन सख्या भावंडांचा झोपेतच मृत्यू, कोयाळ गाव हादरलं
11
Operation Sindoor : चार वार अन् शत्रू झाला लाचार! भारताची अशी एअर स्ट्राईक जिने पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं 
12
Corona Virus : चिंताजनक! देशात कोरोनाचा वेग वाढतोय, ९ महिन्यांचं बाळ पॉझिटिव्ह; कोणत्या राज्यात किती रुग्ण?
13
'धुरंधर' सिनेमाचं डोंबिवलीत होतंय शूट, माणकोली पूलावरुन संजय दत्तचा व्हिडिओ व्हायरल
14
Mumbai Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी 'या' २ मार्गांवर मेगाब्लॉक, गाड्यांचं वेळापत्रकही बदलणार
15
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
16
Tarot Card: आगामी काळ प्रगतीचा, आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
18
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
19
'कान्स'च्या रेड कार्पेटवर चमकली आलिया भट, दोन्ही लूकमधून वेधलं लक्ष; चाहते म्हणाले...
20
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना ७० टक्के मदतीचे वाटप पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जुलै ते ऑक्टोबर २०१९ मध्ये अतीवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या २० हजार शेतकर्यांना शासनाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जुलै ते ऑक्टोबर २०१९ मध्ये अतीवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या २० हजार शेतकर्यांना शासनाने जाहिर केलेली मदत वाटप करण्यात नंदुरबार जिल्हा प्रशासन नाशिक विभागात पुढे आहे. आतापर्यंत तब्बल ६९ टक्के मदतीचे वाटप पूर्ण करण्यात आली आहे.      गेल्या वर्षी अतीवृष्टीमुळे कोरड व बागायत क्षेत्रातील १० हजार शेतकर्यांच्या शेती उत्पादनांचे ६० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पंचनामे करुन ३३ कोटी १३ लाख २३ हजार रूपयांच्या रकमेची मागणी केली होती. या मागणीनुसार शासनाने गेल्या महिन्यात जिल्ह्यासाठी १६ कोटी ५६ लाख ६१ हजार ५०० रूपयांचा निधी मंजूर करुन वितरण केले होते. या मदतीचे वितरण सध्या तालुकास्तरावर सुरू आहे. यांतर्गत आतापर्यंत ८ हजार शेतकर्यांना ११ कोटी रूपयांची मदत देण्यात आली असून उर्वरित शेतकर्यांना येत्या आठ दिवसात पैसे देण्यात येणार आहे. दरम्यान येत्या २९  सप्टेंबरपूर्वी जिल्ह्याला मंजूर असलेला दुसर्या टप्प्यातील निधी देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. रक्कम वितरणात नंदुरबार जिल्हा नाशिक विभागात पुढे असताना धडगाव आणि तळोदा तालुका प्रशासनाने प्रथम क्रमांक पटकावला  आहे. धडगाव तालुक्यातील १ हजार १०१ शेतकऱ्यांना २० दिवसात ५४ लाख २८ हजार रूपयांच्या मदतीचे वितरण करण्यात आले. तर तळोदा तालुक्यातील दोन हजार ६६१ शेतकर्यांना दोन कोटी ७६ लाख ११ हजार ९२५ रुपयांच्या मदतनिधीचे वितरण केले आहे. दोन्ही तालुके नेट कनेक्टीव्हीटी व बँकामधील समस्यांसाठी ओळखली जाते. असे असतानाही दोन्ही तालुक्यांनी १०० टक्के मदत वाटप करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच नंदुरबार तालुक्यात २ हजार ४१५ शेतकरी, शहादा १ हजार २७५ तर अक्कलकुवा तालुक्यात १ हजार १०१ शेतकऱ्यांना मदत मिळाली असल्याची माहिती आहे.  

प्रशासनाने नंदुरबार तालुक्यासाठी ४ कोटी ६९ लाख ३३ हजार ५००, नवापूर ५३ लाख ७१ हजार ५००, शहादा ६ कोटी ९९ लाख ५२ हजार ५००, तळोदा २ कोटी ७६ लाख १२ हजार, अक्कलकुवा १ कोटी ३६ लाख ६४ हजार तर धडगाव तालुक्यासाठील ५४ लाख २८ हजार रूपयांच्या निधीचे वितरण केले होते. तहसील कार्यालयांकडे वर्ग करण्यात आलेली ही रक्कम शेतकर्यांच्या खात्यांवर वितरीत करण्याचे काम १ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आले होते. यांतर्गत आजअखेरीस ८ हजार १९९ शेतकर्यांना ११ कोटी ४७ लाख ९९ हजार ८७७ रूपयांचे वाटप पूर्ण करण्यात आले आहेत. यात नंदुरबार ३ कोटी १५ लाख ६१ हजार २०४, नवापूर ३ लाख ३५ हजार ५८०, शहादा ४ कोटी २९ लाख २७ हजार ५७६ तर अक्कलकुवा तालुक्यात ६९ लाख ३५ हजार ५९२ रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. 

बँकांमध्ये होवू लागली गर्दीजिल्हा प्रशासनाने बागायत आणि कोरड अशी वर्गवारी करत निधीचे वितरण केले आहे. परंतु यात नवापूर तालुक्याची पिछेहाट असल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील २८७ कोरडवाहू नुकसान झालेल्या शेतकर्यांना ३ लाख ३५ हजार ५८० रूपयांची मदत दिली गेली आहे. तर एकाही बागायतदार शेतकर्याला मदत मिळालेली नसल्याची माहिती आहे. आतापर्यंत एकूण ३ हजार ३९५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेल्या कोरड व २ हजार २८० हेक्टर क्षेत्रातील बागायतदार शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यांवर टाकण्यात आलेली ही रक्कम त्यांना प्राप्त झाल्यानंतर काढण्यासाठी गर्दी होत आहे.