शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना ७० टक्के मदतीचे वाटप पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जुलै ते ऑक्टोबर २०१९ मध्ये अतीवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या २० हजार शेतकर्यांना शासनाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जुलै ते ऑक्टोबर २०१९ मध्ये अतीवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या २० हजार शेतकर्यांना शासनाने जाहिर केलेली मदत वाटप करण्यात नंदुरबार जिल्हा प्रशासन नाशिक विभागात पुढे आहे. आतापर्यंत तब्बल ६९ टक्के मदतीचे वाटप पूर्ण करण्यात आली आहे.      गेल्या वर्षी अतीवृष्टीमुळे कोरड व बागायत क्षेत्रातील १० हजार शेतकर्यांच्या शेती उत्पादनांचे ६० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पंचनामे करुन ३३ कोटी १३ लाख २३ हजार रूपयांच्या रकमेची मागणी केली होती. या मागणीनुसार शासनाने गेल्या महिन्यात जिल्ह्यासाठी १६ कोटी ५६ लाख ६१ हजार ५०० रूपयांचा निधी मंजूर करुन वितरण केले होते. या मदतीचे वितरण सध्या तालुकास्तरावर सुरू आहे. यांतर्गत आतापर्यंत ८ हजार शेतकर्यांना ११ कोटी रूपयांची मदत देण्यात आली असून उर्वरित शेतकर्यांना येत्या आठ दिवसात पैसे देण्यात येणार आहे. दरम्यान येत्या २९  सप्टेंबरपूर्वी जिल्ह्याला मंजूर असलेला दुसर्या टप्प्यातील निधी देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. रक्कम वितरणात नंदुरबार जिल्हा नाशिक विभागात पुढे असताना धडगाव आणि तळोदा तालुका प्रशासनाने प्रथम क्रमांक पटकावला  आहे. धडगाव तालुक्यातील १ हजार १०१ शेतकऱ्यांना २० दिवसात ५४ लाख २८ हजार रूपयांच्या मदतीचे वितरण करण्यात आले. तर तळोदा तालुक्यातील दोन हजार ६६१ शेतकर्यांना दोन कोटी ७६ लाख ११ हजार ९२५ रुपयांच्या मदतनिधीचे वितरण केले आहे. दोन्ही तालुके नेट कनेक्टीव्हीटी व बँकामधील समस्यांसाठी ओळखली जाते. असे असतानाही दोन्ही तालुक्यांनी १०० टक्के मदत वाटप करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच नंदुरबार तालुक्यात २ हजार ४१५ शेतकरी, शहादा १ हजार २७५ तर अक्कलकुवा तालुक्यात १ हजार १०१ शेतकऱ्यांना मदत मिळाली असल्याची माहिती आहे.  

प्रशासनाने नंदुरबार तालुक्यासाठी ४ कोटी ६९ लाख ३३ हजार ५००, नवापूर ५३ लाख ७१ हजार ५००, शहादा ६ कोटी ९९ लाख ५२ हजार ५००, तळोदा २ कोटी ७६ लाख १२ हजार, अक्कलकुवा १ कोटी ३६ लाख ६४ हजार तर धडगाव तालुक्यासाठील ५४ लाख २८ हजार रूपयांच्या निधीचे वितरण केले होते. तहसील कार्यालयांकडे वर्ग करण्यात आलेली ही रक्कम शेतकर्यांच्या खात्यांवर वितरीत करण्याचे काम १ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आले होते. यांतर्गत आजअखेरीस ८ हजार १९९ शेतकर्यांना ११ कोटी ४७ लाख ९९ हजार ८७७ रूपयांचे वाटप पूर्ण करण्यात आले आहेत. यात नंदुरबार ३ कोटी १५ लाख ६१ हजार २०४, नवापूर ३ लाख ३५ हजार ५८०, शहादा ४ कोटी २९ लाख २७ हजार ५७६ तर अक्कलकुवा तालुक्यात ६९ लाख ३५ हजार ५९२ रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. 

बँकांमध्ये होवू लागली गर्दीजिल्हा प्रशासनाने बागायत आणि कोरड अशी वर्गवारी करत निधीचे वितरण केले आहे. परंतु यात नवापूर तालुक्याची पिछेहाट असल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील २८७ कोरडवाहू नुकसान झालेल्या शेतकर्यांना ३ लाख ३५ हजार ५८० रूपयांची मदत दिली गेली आहे. तर एकाही बागायतदार शेतकर्याला मदत मिळालेली नसल्याची माहिती आहे. आतापर्यंत एकूण ३ हजार ३९५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेल्या कोरड व २ हजार २८० हेक्टर क्षेत्रातील बागायतदार शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यांवर टाकण्यात आलेली ही रक्कम त्यांना प्राप्त झाल्यानंतर काढण्यासाठी गर्दी होत आहे.