शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

तळोदा उपजिल्हा रुग्णालयात रक्त साठवणूक केंद्राची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:33 IST

तळोदा : येथील उपजिल्हा रुग्णालयात रक्त साठवणूक केंद्र नसल्यामुळे सातपुड्यातील रुग्णांची अत्यंत गैरसोय होत असून, गंभीर रुग्णांना नाइलाजास्तव जिल्ह्याच्या ...

तळोदा : येथील उपजिल्हा रुग्णालयात रक्त साठवणूक केंद्र नसल्यामुळे सातपुड्यातील रुग्णांची अत्यंत गैरसोय होत असून, गंभीर रुग्णांना नाइलाजास्तव जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत असते. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन या केंद्रासाठी ठोस प्रयत्न करावे. यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्र्यांना नागरिकांनी साकडे घातले होते. त्यांनी यावर तत्काळ कार्यवाही करण्याचे ठोस आश्वासन दिले आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. भारती पवार या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने तळोद्यात आल्या होत्या. त्यावेळी पंचायत समितीचे सभापती यशवंत ठाकरे यांच्यासमवेत सातपुड्यातील आदिवासी नागरिकांनी भेट घेऊन तळोदा उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांबाबत त्यांना अवगत केले होते. त्यांना निवेदनदेखील देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तळोदा कुटीर रुग्णालयालाच सन २००४ मध्ये उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे. तथापि, रुग्णालयात आजही रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कारण, अद्ययावत प्रयोगशाळा, एक्स रे, रक्त साठवणूक केंद्रे या प्रमुख बाबींची उणीव भासत असते. त्यामुळे रुग्णांना या सुविधांपासून उपेक्षित राहावे लागत असते. त्यासाठी नाइलाजास्तव बाहेर अधिक पैसे मोजावे लागत असतात. या सुविधांअभावी अत्यंत गंभीर रुग्णांनादेखील येथील आरोग्य प्रशासन सरळ जिल्हा रुग्णालय येथे पाठवावे लागत असते, अशावेळी काही रुग्णांना जीव गमावण्याची शक्यता नाकारता येत नाही. वास्तविक, तळोदा उपजिल्हा रुग्णालय हे तळोद्यासह अक्कलकुवा व धडगाव या तिन्ही तालुक्यांतील ग्रामीण भागातील आदिवासी जनतेच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण आहे. कारण, पुढील उपचारासाठी येथेच रुग्ण दाखल होत असतात. अशावेळी त्यांना येथे रक्त मिळत नाही. त्यांना आर्थिक भुर्दंड सोसून पुढे जावे लागत असते. येथे रक्त साठवणूक केंद्र उभारण्यात आले, तर सर्वांचीच गैरसोय दूर होईल.

या प्रकरणी आरोग्य विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. परंतु, राजकीय इच्छशक्तीच्या अभावामुळे कोणीही लक्ष घालायला तयार नाही. निदान तळोदा, अक्कलकुवा, धडगाव या तीन तालुक्यांसाठी तरी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात अद्ययावत साधनांसह रक्त साठवणूक केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी ग्रामीण जनतेने केली आहे.

रिक्त पदेही तातडीने भरावीत

तळोदा उपजिल्हा रुग्णालयात महत्त्वाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबतच रुग्णसेविका व इतर कर्मचाऱ्यांची पदे गेल्या अनेक वर्षंपासून रिक्तच आहेत. याकडे राज्य शासनाचा आरोग्य विभाग अगदी पाठपुरावा करूनही लक्ष घालत नसल्याचा आरोप आहे. स्पेशल वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांना ती सेवा मिळत नाही. वास्तविक, या रुग्णालयात गोरगरीब रुग्णच उपचारासाठी येत असतात. परंतु, त्यांना आपल्या उपचारापासून वंचित राहावे लागत असते, अशी व्यथाही त्यांनी बोलून दाखवली आहे. आपण तातडीने याबाबत कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तळोदा उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा गेल्या १५ वर्षांपासून प्राप्त झाला आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या बरीच असते. मात्र, येथे रक्त साठवण केंद्र नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होते. नाइलाजास्तव त्यांना बाहेर जावे लागते. त्यात पैसा व वेळ जातो. हे रुग्णालय अक्कलकुवा, धडगाव व तळोदा येथील रुग्णांसाठी मध्यवर्ती आहे. त्यामुळे येथे रक्तसाठवण केंद्र उभारण्यात यावे, तशी मागणी आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. - यशवंत ठाकरे, सभापती, पंचायत समिती तळोदा