शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

असलोद-मंदाणे भागात कापसाचे क्षेत्र घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:34 IST

असलोद व मंदाणे भागात मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड केली जाते. या भागातील हे प्रमुख पीक म्हणून त्याची ओळख आहे; ...

असलोद व मंदाणे भागात मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड केली जाते. या भागातील हे प्रमुख पीक म्हणून त्याची ओळख आहे; परंतु गेल्या दोन-तीन वर्षांपासून कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने कापूस पिकाचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न कमी होऊन शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांना कापूस पिकासाठी लागलेला खर्चही गेल्यावर्षी निघाला नाही. म्हणून यंदा पर्यायी पिकाचा शोध घेऊन कापसाच्या लागवडीत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी मका, मूग, सोयाबीन, मिरची, पपई, ऊस, कांदा आदी पिकांची लागवड केली आहे. त्यातच यंदा सुरुवातीपासून पावसाचे प्रमाण अतिअल्प असल्याने पेरण्या उशिरा झाल्या. त्यामुळे कापूस व इतर पिकांची वाढ खुंटली. त्यामुळे हंगामही उशिरा जाणार आहे. आता आठवडाभरापासून पावसाचा जोर वाढला. या पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचले असून, कापसाचे पीक वाया गेले आहे. पपई पिकाचेही बऱ्याच ठिकाणी नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. इतर पिकांनाही जास्त पावसामुळे शेतामध्ये पाणी साचल्याने नुकसान होत आहे. गेल्यावर्षी कापसाला जेमतेम पाच ते सहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने यंदा कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत. अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांवर उलट कर्जबाजारी होण्याची वेळ आली, अशी स्थिती आहे.