शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
2
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
3
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
4
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
5
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
6
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
7
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
8
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
9
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
10
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
11
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
12
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
13
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
15
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
16
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
17
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
18
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
19
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
20
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस

सण, उत्सवांमध्ये ‘कोरोना’ वरचढ ठरू नये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:32 IST

मनोज शेलार कोरोनामुक्त जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला आहे. सलग दोन दिवस रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात मोजक्याच जिल्ह्यात ...

मनोज शेलार

कोरोनामुक्त जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला आहे. सलग दोन दिवस रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात मोजक्याच जिल्ह्यात असलेला डेल्टा प्लसचा शिरकाव जिल्ह्यात आधीच झालेला आहे. आता येत्या काळात गणेशोत्सव, नवरात्रोत्सवासह इतर विविध सण, उत्सवांची रेलचेल राहणार आहे. त्यात सहभागी होताना आवश्यक दक्षता पाळून ‘कोरोना’ पुन्हा वरचढ ठरणार नाही यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात ३ ऑगस्टनंतर तब्बल १८ दिवसांनी कोरोना रुग्ण आढळून आला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा दुसरा रुग्ण आढळून आला. याचा अर्थ जिल्ह्यात कोरोना अद्यापही सक्रिय आहेच हे सिद्ध होते. गेल्या दोन ते तीन आठवड्यांत साजरे झालेले विविध सण, उत्सव आणि सार्वजनिक कार्यक्रम यामुळे कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. शिवाय कोरोना कायमचाच गेला या अविर्भावात नागरिक राहू लागले. गर्दी करणे, तोंडाला मास्क न लावणे, सोशल डिस्टंन्सिंग न पाळणे, हात वारंवार स्वच्छ न करणे यासह कोरोनाच्या दक्षतेच्या इतर बाबींकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आणि व्हायचा तो परिणाम झालाच. शासन, प्रशासनाने विविध निर्बध शिथिल केले आहेत. त्याचा एकाप्रकारे दुरूपयोगच होत असल्याचे चित्र जिल्हाभरात आहे. हॉटेल, खानावळ, बार, विविध वस्तू विक्रीची दुकाने या ठिकाणी शासनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. प्रत्येक ठिकाणी शासन, प्रशासन, पोलीस लक्ष देऊ शकणार नाही हे खरेच आहे. परंतु नागरिकांनी स्वत:हून स्वयंशिस्त लावून घेतल्या तर कोरोनाला अटकाव करता येऊ शकणार आहे.

ज्या डेल्टा प्लसची भीती दाखविली जात आहे तो नंदुरबारात याआधीच शिरकाव करून गेलेला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात डेल्टाचा रुग्ण नंदुरबार जिल्ह्यात आढळला होता. अतिशय गोपनीय ठेवण्यात आलेली ही बाब शासनाच्या आकडेवारीतून बाहेर आलीच. सुदैवाने संबंधित रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील सर्व रुग्ण ठणठणीत बरे झालेले आहेत. त्यामुळे डेल्टाने नंतर जिल्ह्यात हातपाय पसरले नाहीत ही सुदैवाची बाब आहे. राज्यातील मोजक्याच जिल्ह्यात डेल्टाचे रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यात नंदुरबारचाही समावेश असल्याने आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे ठरणार आहे.

येत्या काळात गणेशोत्सव, नवरात्रोत्सवासह इतर विविध सण, उत्सव साजरे होणार आहेत. अशा वेळी गर्दीवर नियंत्रण ठेवून सार्वजनिक उत्सवांवरील शासनाने घालून दिलेल्या मर्यादांचे पालन होणे आवश्यक आहे. केवळ श्रद्धा, धर्म आणि उत्सवांचा उन्माद ही आपलीच मक्तेदारी आहे असे काही संघटना, संस्थांची मानसिकता आहे. ती बदलणे अशावेळी क्रमप्राप्त आहे. कोरोनात ज्यांचे सर्वस्व गेले अशा कुटुंबांना, व्यक्तींना कशा मानसिकतेला, परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे त्याचे चित्र भयानक आहे. त्यामुळे पुन्हा कोरोनाचा शिरकाव होऊ नये आणि गेल्या वेळची दुर्दैवी परिस्थिती येऊ नये यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे.

देश व राज्य सरकारे, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व इतर विविध अहवाल हे तिसऱ्या लाटेचा इशारा देत आहेत. त्यासाठी ऑॅक्सिजनचा पुरेसा साठा, आवश्यक बेड तयार करण्याच्याही सूचना आहेच. जिल्ह्यात ऑक्सिजनबाबत ७० टक्के स्वयंपूर्णत: असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. दुसरीकडे मात्र जिल्हा रुग्णालयासह तालुका पातळीवर असलेले कोविड केअर सेंटर बंद झाले आहेत. तेथील डॅाक्टर, कर्मचाऱ्यांना ‘नारळ’ देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनही काहीसे रिलॅक्स असल्याचे चित्र आहे. हा विरोधाभास दूर होणेही गरजेचे आहे.

एकूणच कोरोनाला सहजतेने घेण्याची चूक पुन्हा करू नका, अन्यथा दुसऱ्या लाटेपेक्षा तिसरी लाट जिल्ह्यात अधिक वेदनादायी ठरेल आणि तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल.