शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीबाबत संभ्रमावस्था कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:22 IST

वास्तविक जागा रिक्त झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत निवडणुका घेणे आवश्यक असते. त्या दृष्टीने निवडणूक आयोगाने आपली प्रक्रिया सुरू केली ...

वास्तविक जागा रिक्त झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत निवडणुका घेणे आवश्यक असते. त्या दृष्टीने निवडणूक आयोगाने आपली प्रक्रिया सुरू केली आहे. याआधीच निवडणुका याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. महिला आरक्षणही काढण्यात आलेले आहे. आता केवळ निवडणुका घेण्याचेच बाकी आहे. त्यासाठीची घोषणा निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी केली आहे. २९ जून रोजी अधिकृत अध्यादेश निघाल्यानंतर त्याच दिवसापासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. परंतु निवडणुका होणार की नाही? या संभ्रमावस्थेत राजकीय पक्षांसह प्रशासन आणि जनतादेखील आहे.

असे असले तरी जिल्हा निवडणूक विभागाने या निवडणुकीच्या दृष्टीने प्रशासकीय तयारीला सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाने काहीही निर्णय घेतला तरी प्रशासनाने तयारी व सज्जता कायम ठेवली आहे.

दुसरीकडे, राजकीय पक्षांनीही तयारी सुरू केली आहे. उमेदवारांच्या चाचपणीसह इतर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना उमेदवारी दाखल करताना लागणारी कागदपत्रे तयार ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या त्या गट व गणांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.

जुलै महिना म्हणजे खरीप हंगामाच्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा महिना असतो. पेरण्यांसह निंदणी, कोळपणी, खते देणे, कीटकनाशकांची फवारणी करणे, आदी कामांत शेतकरी, शेतमजूर व्यस्त असतात. जुलै महिन्यातच जिल्ह्यात पावसाचा जोरदेखील अधिक असतो. अशा काळात प्रचार कसा करणार हा प्रश्न निर्माण होतो. शिवाय कोरोनाचा धोकादेखील अद्याप कमी झालेला नाही. अनेक निर्बंध कायम आहेत; त्यामुळेही निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे बोलले जात आहे.