शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
5
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
6
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
7
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
8
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
9
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
10
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
11
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
12
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
13
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
14
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
15
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
16
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
17
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीबाबत संभ्रमावस्था कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:22 IST

वास्तविक जागा रिक्त झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत निवडणुका घेणे आवश्यक असते. त्या दृष्टीने निवडणूक आयोगाने आपली प्रक्रिया सुरू केली ...

वास्तविक जागा रिक्त झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत निवडणुका घेणे आवश्यक असते. त्या दृष्टीने निवडणूक आयोगाने आपली प्रक्रिया सुरू केली आहे. याआधीच निवडणुका याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. महिला आरक्षणही काढण्यात आलेले आहे. आता केवळ निवडणुका घेण्याचेच बाकी आहे. त्यासाठीची घोषणा निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी केली आहे. २९ जून रोजी अधिकृत अध्यादेश निघाल्यानंतर त्याच दिवसापासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. परंतु निवडणुका होणार की नाही? या संभ्रमावस्थेत राजकीय पक्षांसह प्रशासन आणि जनतादेखील आहे.

असे असले तरी जिल्हा निवडणूक विभागाने या निवडणुकीच्या दृष्टीने प्रशासकीय तयारीला सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाने काहीही निर्णय घेतला तरी प्रशासनाने तयारी व सज्जता कायम ठेवली आहे.

दुसरीकडे, राजकीय पक्षांनीही तयारी सुरू केली आहे. उमेदवारांच्या चाचपणीसह इतर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना उमेदवारी दाखल करताना लागणारी कागदपत्रे तयार ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या त्या गट व गणांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.

जुलै महिना म्हणजे खरीप हंगामाच्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा महिना असतो. पेरण्यांसह निंदणी, कोळपणी, खते देणे, कीटकनाशकांची फवारणी करणे, आदी कामांत शेतकरी, शेतमजूर व्यस्त असतात. जुलै महिन्यातच जिल्ह्यात पावसाचा जोरदेखील अधिक असतो. अशा काळात प्रचार कसा करणार हा प्रश्न निर्माण होतो. शिवाय कोरोनाचा धोकादेखील अद्याप कमी झालेला नाही. अनेक निर्बंध कायम आहेत; त्यामुळेही निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे बोलले जात आहे.