शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांची तब्ब्येत बिघडली ; ओपीडीमध्ये तिप्पट वाढ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:35 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागात सध्या लहान बालकांना मात्र किरकोळ आजारांनी घेरले आहे. वातावरणीय बदलांमुळे हे आजार वाढीस ...

नंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागात सध्या लहान बालकांना मात्र किरकोळ आजारांनी घेरले आहे. वातावरणीय बदलांमुळे हे आजार वाढीस लागले असून यामुळे बालरोग तज्ज्ञांकडील ओपीडी सध्यातरी हाऊस फुल्ल अशीच आहे.

प्रामुख्याने लहान बालकांमध्ये सर्दी, खोकला, ताप यासह मलेरिया, टायफाॅईड, डेंग्यू आणि न्यूमोनियाची लागण झाल्याचे दिसून येत आहे. व्हायरल फिवर असलेल्या या बालकांवर उपचार सुरु आहेत. औषधी वेळेवर घेतल्यास हे आजार बरे होत असल्याने नागरीकांनी वैद्यकीय सल्ला नियमित घेत, उपाययोजना कराव्यात असेही सांगण्यात येत आहे. गत १५ दिवसांपासून रुग्णालयांमध्ये लहान मुले आढळून येत असली तरी यातील एकासही कोरोनाची लागण झालेली नसल्याने भीतीचे कोणतेही कारण नसल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यात दरवर्षी डेंग्यूसदृश तापाचे तसेच मलेरियाचे रुग्ण नियमित आढळून येतात. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यू सदृश तापाचे रुग्ण समोर आले आहेत. त्यांच्या चाचण्या केल्यानंतर त्या निगेटिव्ह आल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान मलेरिया व टायफाॅईडची लागण झालेल्या बालकांची अधिक संख्या असल्याने त्यांच्या चाचण्या केल्या जात आहेत. चाचण्या केल्यानंतरच त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याची माहिती देण्यात येत आहे.

लहान बालकांमध्ये किरकोळ आजार दिसून येत असले तरी त्यांची कोरोना चाचणी करण्यावर मात्र भर देण्यात येत नाही.

लहान बालकांमध्ये कोरोनाची कोणतही लक्षणे आढळून येत नसल्याने त्यांच्या चाचण्या करणे तूर्तास तरी टाळले जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात काही अंशी शारीरिक क्षमता कमी होते. यातून बालकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. पालकांनी योग्य ते उपाय केल्यास अडचण येणार नाही.

-डाॅ. के.डी.सातपुते,

अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक.

किरकोळ आजारांची लागण होऊ नये, यासाठी नागरिकांनी घर आणि परिसरात स्वच्छता पाळली पाहिजे. बालकांचे लसीकरण वेळेत करुन घेतले पाहिजे. सध्या केवळ व्हायरल फिवरचे रुग्ण समोर येत आहेत. त्यांना योग्य उपचार केल्याने ते बरे होत आहेत.

-भूषण पाटील,

बालरोग तज्ञ, नंदुरबार.

गार पाणी आणि थंड वस्तू टाळव्यात, पाणी उकळून गार करून प्यावे, कोरडा दिवस पाळवा.

पाण्यावर डास बसणार नाही याची काळजी घ्यावी, पिण्याच्या पाण्याची भांडी झाकून ठेवावी.

मुलांना लक्षणे आढळून आल्यास डॉक्टरांशी संपर्क करावा, वैद्यकीय सल्लानुसार विश्रांती आवश्यक आहे.