शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

बर्ड फ्ल्यू : प्रशासन आणि उद्योजकांचीही परीक्षा पाहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:26 IST

मनोज शेलार बर्ड फ्ल्यूची दस्तक पुन्हा जिल्ह्याच्या सीमेवर बसली आहे. २००६ मध्ये जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूने हाहाकार माजविला होता. त्यावेळी ...

मनोज शेलार

बर्ड फ्ल्यूची दस्तक पुन्हा जिल्ह्याच्या सीमेवर बसली आहे. २००६ मध्ये जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूने हाहाकार माजविला होता. त्यावेळी देशात ईशान्यकडील राज्यांमध्ये पहिल्यांदा या आजाराचे विषाणू आढळून आले होते. त्यानंतर थेट महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे कोंबडींमध्ये हे विषाणू आढळून आल्याने देशाचे व राज्याचे लक्ष नवापूरकडे वेधले गेले होते. आता देखील पूर्वीची पार्श्वभूमी लक्षात घेता भीतीचे वातावरण असले तरी प्रशासन सतर्क आहे. पशुसंवर्धन विभागाच्या रिक्त पदांची अडचण हे आव्हान पेलण्यासाठी कसरतीचे ठरणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना व तयारीला वेग देणे आवश्यक ठरणार आहे. दुसरीकडे लाखो रुपयांचे कर्ज घेऊन पोल्ट्री व्यवसाय सुरू केलेल्या बेरोजगारांना चिंता सतावू लागली आहे.

पक्ष्यांमध्ये आढळून येणारा बर्ड फ्ल्यू हा आजार पक्ष्यांपासून माणसांना होऊ शकतो. त्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक असते. नंदुरबार जिल्हा गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाशी निकराने लढत आहे. दोन राज्यांच्या सीमेवर असतानाही जिल्ह्याने कोरोनाला चांगला अटकाव केला आहे. शेजारील जिल्हे व राज्याच्या तुलनेत जिल्ह्यातील कोरोनाचे प्रमाण निम्म्याहून कमी आहे. कोरोनाचे आव्हान यशस्वी पेलल्यानंतर आता बर्ड फ्ल्यूने डोके वर काढले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत आणि शेजारील गुजरातमधील जिल्ह्यांत या आजाराचे विषाणू आढळून आल्याने विशेष सतर्कता बाळगली जात आहे.

पोल्ट्री हब म्हणून राज्यात नवापूरचे नाव अग्रभागी होते. ३० पेक्षा अधिक पोल्ट्री येथे होते. एका पोल्ट्रीमध्ये किमान एक लाख व जास्तीत जास्त दोन लाख पक्षी अर्थात कोंबड्या येथे राहत होत्या. अर्थात जवळपास ५० ते ६० लाख कोंबड्या, त्यापासून मिळणारी अंडी हे पहाता कोट्यवधींचा टर्नओव्हर त्यातून होत होता. परंतु, २००६ मधील बर्ड फ्ल्यूने या उद्योगाचे कंबरडेच मोडले. कोट्यवधींचे नुकसान उद्योजकांचे झाले. लाखो कोंबड्या मारून पुराव्या लागल्या. लाखो अंडी नष्ट करावी लागली. त्यानंतर हा उद्योग अद्यापही पुरेशा प्रमाणात उभा राहू शकला नाही. सद्यस्थितीत केवळ १३ पोल्ट्री या ठिकाणी आहेत. जवळपास १८ ते २० लाख कोंबड्या त्यामध्ये आहेत. जिल्ह्याचा विचार करता जवळपास ७० पोल्ट्री उद्योग आहेत. त्यातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असते.

बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. राज्य शासनाच्या कृती आराखडाअंतर्गत तालकुा स्तरावर सहा पथके व जिल्हास्तरावर एक अशी सात पथके तयार केली आहेत. प्रत्येक पथकात पशुधन अधिकाऱ्यापासून इतर कर्मचारी आहेत. त्यांना शासनाच्या कृती आराखड्याचे दोन वेळा प्रशिक्षण दिले गेले आहे. उपाययोजना सुरू असल्या तरी पशुसंवर्धन विभागाला रिक्त जागांचा प्रश्न सतावत आहे. सहायक पशुसंवर्धन अधिकाऱ्यांचे प्रत्येक तालुक्याला एक पद असते. अशी सहा पदे जिल्ह्याला आवश्यक असताना केवळ एकच पद भरले असून पाच पदे रिक्त आहेत. पशुधन अधिकारी यांची ७० पदे मंजूर असून त्यातील ५० पदे रिक्त आहेत. वर्ग तीन व चारची देखील ५० टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. अशीच स्थिती जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाची आहे. अशा तोकड्या संख्येने असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बळावर जिल्हा प्रशासन कशा पद्धतीने बर्ड फ्ल्यूला अटकाव आणू शकते, याचाही विचार होणे आवश्यक आहे. २००६ ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आधीपासूनच ही रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा का केला गेला नाही? कुणी गांभीर्याने का घेतले नाही? आता तहान लागल्यावर विहीर खोदण्याच्या या प्रकाराबाबत मात्र नाराजी व्यक्त होत आहे.

पोल्ट्री उद्योग सुरू केलेल्या अनेक बेरोजगारांनी बँकांची कर्जे काढून, शेती, घरे गहान ठेऊन हा उद्योग सुरू केला आहे. आता बर्ड फ्ल्यूच्या संकटामुळे या बेरोजगारांनाही चिंता सतावू लागली आहे. आताच्या स्थितीतच ३० ते ४० टक्के व्यवसायावर परिणाम झाला आहे. पुढे काय होते याची चिंता त्यांना सतावत आहे. एकूणच बर्ड फ्ल्यू आता जिल्हा प्रशासन आणि उद्योजकांचीही परीक्षा पाहणारा ठरणार असून त्यात प्रशासन किती प्रमाणात उत्तीर्ण होते याकडे लक्ष लागून राहिले आहे.