शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

चांदसैली घाटमार्ग खचल्याने अपघाती धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 15:56 IST

चांदसैली घाट : रिपरिप पावसामुळे समस्या, जीव मुठीत घेऊन होतोय प्रवास

कोठार :  कोठार ते धडगाव दरम्यानचा चांदसैली घाटरस्ता ठिकठिकाणी खचल्याने जीवघेणा ठरत आहे.त्यामुळे प्रवाशांना घाटातील प्रवास जीव मुठीत घेऊनच करावा लागत असल्याचे चित्र आहे.सातपुडा पर्वत रांगेतील धोकेदायक असणा:या घाटांपैकी चांदसैलीचा घाट ओळखला जातो. धडगाव तालुक्याला जिल्हा मुख्यालयाला कमी वेळात तसेच कमी अंतराच्या रस्त्याने जोडण्यासाठी चांदसैली घाट महत्वाचा व मोक्याचा आहे. इंधन, वेळ व श्रमाची बचत व्हावी म्हणून वाहनधारक धडगाव येथे जाण्यासाठी चांदसैली घाटाचा अवलंब करतात, त्यामुळे दिवसभर या घाटात वाहनांची मोठय़ा संख्येने वर्दळ असते.धडगाव तालुक्यातील जनतेसाठी महत्वपूर्ण असणा:या या चांदसैली घाटातील रस्त्याची मोठी वाताहत झाली आहे. कोठारपासून पुढे धडगावकडे जाणारा रस्ता पावसाच्या रिपरिपमुळे  ठिकठिकाणी खचलेला दिसून येत आहे. सातपायरी घाटाच्या पायथ्याशी असणा:या नागमोडी वळणावरील रस्ता मोठय़ा प्रमाणात खचला आहे. रस्ता खचल्यामुळे संरक्षक कठडय़ांची दुरावस्था झाली आहे. दुरावस्था झालेल्या संरक्षक कठडय़ांची दुरुस्ती तात्पुरत्या स्वरूपात प्रशासनाकडून करण्यात आली होती़ मात्र पावसाची रिपरिप व दिवसभर शेकडो वाहनाची वर्दळ यामुळे या ठिकाणचा रस्ता दिवसेंदिवस अधिकच खचत जात आहे. मात्र प्रशासनाने याकडे कानाडोळा केल्याची स्थिती आहे. साधारणत: या ठिकाणचा रस्ता खचायला मे महिन्यात सुरुवात झाली असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी रस्ता खचण्याच्या प्रकारावर उपाययोजना करणे प्रशासनाला शक्य होत़े मात्र प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. अशीच स्थिती चांदसैली गाव येण्यापूर्वीच्या उताराच्या रस्त्यालगतची आहे. वळण व रस्त्यालगतची झाडे-झुडपे यामुळे या ठिकाणचा खचलेला रस्ता वाहनधारकांना सहसा लक्षात येत नाही.या परिस्थितीमुळे चांदसैली घाटातील वाट अधिक बिकट बनली आहे. त्यामुळे घाटातील प्रवासात प्रवाश्यांचा जीव टांगणीलाच असतो. तीव्र चढ-उतार, जीवघेणी वळणे, खोल द:या, यामुळे चांदसैली घाट हा निसर्गत:च धोकादायक आहे. त्यात संरक्षक कठडय़ांची दुरावस्था, खचलेला रस्ता यामुळे  घाटातील प्रवास अधिकच धोकेदायक बनतो. त्यामुळे प्रशासनाने घाटातील रस्त्याच्या दुरावस्थेकडे कानाडोळा न करता गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.