शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

९ लाख ३१ हजार क्विंटल साखर उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 12:01 IST

साखर हंगाम समारोपाकडे : आणखी महिनाभर चालतील साखर कारखाने

नंदुरबार : जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आता समारोपाकडे वाटचाल करू लागला आहे. साधारणत: मार्च अखेरपर्यंत गाळप संपण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सव्वातीन महिन्यात तिन्ही साखर कारखान्यांनी नऊ लाख ३१ हजार क्विंटल साखर उत्पादीत केली आहे.जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्यांनी दिवाळीच्या वेळी गाळप हंगामाला सुरुवात केली होती. गेल्या सव्वातीन महिन्यात या कारखान्यांनी पुर्ण क्षमतेने ऊस गाळप केला. यंदा अपेक्षीत ऊस उत्पादन असल्यामुळे ऊस पळवापळवी फारशी झाली नाही. त्यामुळे तिन्ही साखर कारखान्यांनी अपेक्षीत ऊस गाळप केले आहे. सर्वाधिक गाळप आयन शुगर या खाजगी साखर कारखान्याने केले आहे. त्या खालोखाल सातपुडा साखर कारखान्याने गाळप केले आहे.दहा लाखाच्या घरातयंदा तिन्ही साखर कारखान्यांनी सरासरी ११० दिवस गाळप केले आहे. एकुण नऊ लाख ३१ हजार क्विंटल साखर उत्पादीत झाली आहे. सातपुडा साखर कारखान्याने १०७ दिवसात तीन लाख ४८ हजार ८८० मे.टन ऊस गाळप केले आहे. त्यातून तीन लाख ५१ हजार क्विंटल साखर उत्पादीत केली आहे. सरासरी साखर उतारा १०.१७ इतका मिळाला आहे.आयन शुगर या कारखान्याने १११ दिवस गाळप हंगाम घेतला आहे. चार लाख १६ हजार ५७० मे.टन ऊस गाळप करून चार लाख ३७ हजार २८६ क्विंटल साखर उत्पादीत केली आहे. या कारखान्याचा सरासरी साखर उतारा १०.५६ इतका मिळाला आहे.आदिवासी साखर कारखान्याने ११३ दिवस गाळप हंगाम घेतला आहे. कारखान्याने एक लाख ४५ हजार ३४ मे.टन ऊस गाळप करून एक लाख ४३ हजार २०० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा १०.५ इतका मिळाला आहे.तिन्ही कारखान्यांनी आतापर्यंत एकुण नऊ लाख दहा हजार ४८४ मे.टन. ऊस गाळप केला असून त्यातून नऊ लाख ३१ हजार क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.गेल्या वर्षाच्या तुलनेत साखर उत्पादन बरोबरीत आहे. त्यामुळे यंदा तिन्ही साखर कारखाने मिळून एकुण ११ लाखापर्यंत साखर उत्पादन घेणार अशी शक्यता वर्तविली जात आहे. साधारणत: दोन लाख मे.टन ऊस अद्यापही गाळपाचा शिल्लक आहे. त्याला २० ते २५ दिवस लागण्याची शक्यता आहे.भावही समाधानकारकतिन्ही साखर कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे भाव जाहीर केलेला आहे. आधी घोषीत केल्याप्रमाणे हप्त्याची रक्कमही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जात आहे. हंगामाच्या सुरुवातीच्या काळात ऊस दरावरून वातावरण काहीसे गढूळ झाले होते. परंतु समन्वयातून तोडगा निघाल्याने हंगाम सुरळीत सुरू राहिला आहे.खान्देशात सर्वाधिकसाखर हंगाम घेणाºया साखर कारखान्यांमध्ये सर्वाधिक अर्थात तीन कारखाने एकट्या नंदुरबार जिल्ह्यातील आहेत.यंदा खान्देशातून चार कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला आहे. त्यात नंदुरबारातील दोन सहकारी तर एक खाजगी तत्वावरील साखर कारखाना तर जळगाव जिल्ह्यातून केवळ मधुकर सहकारी साखर कारखान्याने यंदाचा गाळप हंगाम घेतला आहे. त्यामुळे ऊसाची पळवापळवी फारशी झाली नसल्याची स्थिती आहे.