शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

९ लाख ३१ हजार क्विंटल साखर उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 12:01 IST

साखर हंगाम समारोपाकडे : आणखी महिनाभर चालतील साखर कारखाने

नंदुरबार : जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आता समारोपाकडे वाटचाल करू लागला आहे. साधारणत: मार्च अखेरपर्यंत गाळप संपण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सव्वातीन महिन्यात तिन्ही साखर कारखान्यांनी नऊ लाख ३१ हजार क्विंटल साखर उत्पादीत केली आहे.जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्यांनी दिवाळीच्या वेळी गाळप हंगामाला सुरुवात केली होती. गेल्या सव्वातीन महिन्यात या कारखान्यांनी पुर्ण क्षमतेने ऊस गाळप केला. यंदा अपेक्षीत ऊस उत्पादन असल्यामुळे ऊस पळवापळवी फारशी झाली नाही. त्यामुळे तिन्ही साखर कारखान्यांनी अपेक्षीत ऊस गाळप केले आहे. सर्वाधिक गाळप आयन शुगर या खाजगी साखर कारखान्याने केले आहे. त्या खालोखाल सातपुडा साखर कारखान्याने गाळप केले आहे.दहा लाखाच्या घरातयंदा तिन्ही साखर कारखान्यांनी सरासरी ११० दिवस गाळप केले आहे. एकुण नऊ लाख ३१ हजार क्विंटल साखर उत्पादीत झाली आहे. सातपुडा साखर कारखान्याने १०७ दिवसात तीन लाख ४८ हजार ८८० मे.टन ऊस गाळप केले आहे. त्यातून तीन लाख ५१ हजार क्विंटल साखर उत्पादीत केली आहे. सरासरी साखर उतारा १०.१७ इतका मिळाला आहे.आयन शुगर या कारखान्याने १११ दिवस गाळप हंगाम घेतला आहे. चार लाख १६ हजार ५७० मे.टन ऊस गाळप करून चार लाख ३७ हजार २८६ क्विंटल साखर उत्पादीत केली आहे. या कारखान्याचा सरासरी साखर उतारा १०.५६ इतका मिळाला आहे.आदिवासी साखर कारखान्याने ११३ दिवस गाळप हंगाम घेतला आहे. कारखान्याने एक लाख ४५ हजार ३४ मे.टन ऊस गाळप करून एक लाख ४३ हजार २०० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा १०.५ इतका मिळाला आहे.तिन्ही कारखान्यांनी आतापर्यंत एकुण नऊ लाख दहा हजार ४८४ मे.टन. ऊस गाळप केला असून त्यातून नऊ लाख ३१ हजार क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.गेल्या वर्षाच्या तुलनेत साखर उत्पादन बरोबरीत आहे. त्यामुळे यंदा तिन्ही साखर कारखाने मिळून एकुण ११ लाखापर्यंत साखर उत्पादन घेणार अशी शक्यता वर्तविली जात आहे. साधारणत: दोन लाख मे.टन ऊस अद्यापही गाळपाचा शिल्लक आहे. त्याला २० ते २५ दिवस लागण्याची शक्यता आहे.भावही समाधानकारकतिन्ही साखर कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे भाव जाहीर केलेला आहे. आधी घोषीत केल्याप्रमाणे हप्त्याची रक्कमही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जात आहे. हंगामाच्या सुरुवातीच्या काळात ऊस दरावरून वातावरण काहीसे गढूळ झाले होते. परंतु समन्वयातून तोडगा निघाल्याने हंगाम सुरळीत सुरू राहिला आहे.खान्देशात सर्वाधिकसाखर हंगाम घेणाºया साखर कारखान्यांमध्ये सर्वाधिक अर्थात तीन कारखाने एकट्या नंदुरबार जिल्ह्यातील आहेत.यंदा खान्देशातून चार कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला आहे. त्यात नंदुरबारातील दोन सहकारी तर एक खाजगी तत्वावरील साखर कारखाना तर जळगाव जिल्ह्यातून केवळ मधुकर सहकारी साखर कारखान्याने यंदाचा गाळप हंगाम घेतला आहे. त्यामुळे ऊसाची पळवापळवी फारशी झाली नसल्याची स्थिती आहे.