शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

९ लाख ३१ हजार क्विंटल साखर उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 12:01 IST

साखर हंगाम समारोपाकडे : आणखी महिनाभर चालतील साखर कारखाने

नंदुरबार : जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आता समारोपाकडे वाटचाल करू लागला आहे. साधारणत: मार्च अखेरपर्यंत गाळप संपण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सव्वातीन महिन्यात तिन्ही साखर कारखान्यांनी नऊ लाख ३१ हजार क्विंटल साखर उत्पादीत केली आहे.जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्यांनी दिवाळीच्या वेळी गाळप हंगामाला सुरुवात केली होती. गेल्या सव्वातीन महिन्यात या कारखान्यांनी पुर्ण क्षमतेने ऊस गाळप केला. यंदा अपेक्षीत ऊस उत्पादन असल्यामुळे ऊस पळवापळवी फारशी झाली नाही. त्यामुळे तिन्ही साखर कारखान्यांनी अपेक्षीत ऊस गाळप केले आहे. सर्वाधिक गाळप आयन शुगर या खाजगी साखर कारखान्याने केले आहे. त्या खालोखाल सातपुडा साखर कारखान्याने गाळप केले आहे.दहा लाखाच्या घरातयंदा तिन्ही साखर कारखान्यांनी सरासरी ११० दिवस गाळप केले आहे. एकुण नऊ लाख ३१ हजार क्विंटल साखर उत्पादीत झाली आहे. सातपुडा साखर कारखान्याने १०७ दिवसात तीन लाख ४८ हजार ८८० मे.टन ऊस गाळप केले आहे. त्यातून तीन लाख ५१ हजार क्विंटल साखर उत्पादीत केली आहे. सरासरी साखर उतारा १०.१७ इतका मिळाला आहे.आयन शुगर या कारखान्याने १११ दिवस गाळप हंगाम घेतला आहे. चार लाख १६ हजार ५७० मे.टन ऊस गाळप करून चार लाख ३७ हजार २८६ क्विंटल साखर उत्पादीत केली आहे. या कारखान्याचा सरासरी साखर उतारा १०.५६ इतका मिळाला आहे.आदिवासी साखर कारखान्याने ११३ दिवस गाळप हंगाम घेतला आहे. कारखान्याने एक लाख ४५ हजार ३४ मे.टन ऊस गाळप करून एक लाख ४३ हजार २०० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा १०.५ इतका मिळाला आहे.तिन्ही कारखान्यांनी आतापर्यंत एकुण नऊ लाख दहा हजार ४८४ मे.टन. ऊस गाळप केला असून त्यातून नऊ लाख ३१ हजार क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.गेल्या वर्षाच्या तुलनेत साखर उत्पादन बरोबरीत आहे. त्यामुळे यंदा तिन्ही साखर कारखाने मिळून एकुण ११ लाखापर्यंत साखर उत्पादन घेणार अशी शक्यता वर्तविली जात आहे. साधारणत: दोन लाख मे.टन ऊस अद्यापही गाळपाचा शिल्लक आहे. त्याला २० ते २५ दिवस लागण्याची शक्यता आहे.भावही समाधानकारकतिन्ही साखर कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे भाव जाहीर केलेला आहे. आधी घोषीत केल्याप्रमाणे हप्त्याची रक्कमही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जात आहे. हंगामाच्या सुरुवातीच्या काळात ऊस दरावरून वातावरण काहीसे गढूळ झाले होते. परंतु समन्वयातून तोडगा निघाल्याने हंगाम सुरळीत सुरू राहिला आहे.खान्देशात सर्वाधिकसाखर हंगाम घेणाºया साखर कारखान्यांमध्ये सर्वाधिक अर्थात तीन कारखाने एकट्या नंदुरबार जिल्ह्यातील आहेत.यंदा खान्देशातून चार कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला आहे. त्यात नंदुरबारातील दोन सहकारी तर एक खाजगी तत्वावरील साखर कारखाना तर जळगाव जिल्ह्यातून केवळ मधुकर सहकारी साखर कारखान्याने यंदाचा गाळप हंगाम घेतला आहे. त्यामुळे ऊसाची पळवापळवी फारशी झाली नसल्याची स्थिती आहे.