शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

मणिबेली येथील ७० प्रकल्पग्रस्त घर प्लाॅटच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या मणिबेली, ता.अक्कलकुवा येथील ७० विस्थापितांना जमिनी मिळूनही स्थलांतर केलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या मणिबेली, ता.अक्कलकुवा येथील ७० विस्थापितांना जमिनी मिळूनही स्थलांतर केलेल्या ठिकाणी घर, प्लाॅट उपलब्ध नसल्यामुळे हक्काच्या जमिनी खेडता येत नाही. परिणामी नाईलाजास्तव भाडे, बटाईने जमिनी घ्याव्या लागत आहे. घर प्लाॅटसाठी प्रशासन पाच वर्षांपासून वायदेच देत असून, जिल्हा प्रशासनाने तरी याबाबत गांभीर्याने दखल घेण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे.महाकाय सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या मणिबेली, ता.अक्कलकुवा येथील ७० विस्थापितांना शासनाने शहादा तालुक्यातील काथर्देदिगर परिसरात सन २०१५ साली जमिनी दिल्या आहेत. तथापि त्यांना घर प्लाॅटची जागा संबंधित प्रशासनाने गेल्या पाच वर्षानंतरही उपलब्ध करून न दिल्यामुळे त्यांना आपल्या हक्काच्या जमिनी नाईलाजास्तव दुसऱ्या शेतकऱ्यांना भाडे-बटाईने द्याव्या लागत आहेत. यातील काहीजण १५० कि,मी. अंतरावरून येवून जमिनी कसत असल्याचे म्हटले जात        आहे. वास्तविक या कुटुंबांना सातत्याने प्रकल्पाच्या बॅक वाॅटरच्या पाण्याचा पाण्याच्या फुगवट्यामुळे बुडीतांच्या समस्येस तोंड द्यावे लागत असते. साहजिकच त्यांनी स्थलांतराच्या ठिकाणी घर प्लाॅटच्या जागेचा तगादा संबंधित यंत्रणेकडे लावला आहे. मात्र त्यांना आतापावेतो वायदेच दिले जात असल्याचे विस्थापितांचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे गेल्या वर्षी विद्यमान जिल्हा प्रशासनाने काथर्दे दिगर वसाहतीस भेट दिली होती. त्या वेळी या बाधितांनी घर प्लाॅटची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी           केली होती. त्यानंतरही अजून            पावेतो कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यांच्या आदेशालाही               केराची टोपली दाखविण्यात आल्याचा आरोप विस्थापितांनी केला          आहे.वास्तविक इतर विस्थापीतांचे यापूर्वी जेथे पुनर्वसन करण्यात आले आहे. त्या आशिष नगर जवळ खाजगी शेतकऱ्याने जमीन देण्याची समर्थता दाखविली आहे. तसेच कागदपत्रे सुद्धा संबंधित यंत्रणेकडे जमा केली आहे. तथापि या यंत्रणेच्या उदासिन धोरणामुळे सदर प्रकल्पग्रस्तांच्या स्थलांतराचा प्रश्न रखडला आहे. यामुळे त्यांना आपल्या हक्काच्या जमिनी खेडण्यापासूनदेखील उपेक्षित राहावे लागत आसल्याची व्यथा काहींनी बोलून दाखविली आहे. निदान     जिल्हा प्रशासनाने तरी त्यांचा हा रखडलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधितांना कडक तंबी द्यावी, अशी मागणी विस्थािपितांनी केली आहे. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला   आहे.

कृषी पंपाचे साहित्यही गेले चोरीसशासनाने या विस्थापितांना शहादा तालुक्यातील काथर्दे दिगर परिसरात जमिनी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचे त्यांना सातबारेदेखील दिले आहेत. शिवाय या जमिनींमध्ये विद्युत प्रवाहासह कृषी पंपही बसवून दिले आहेत. मात्र शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे साहित्य म्हणजे मोटार, केबल, स्टार्टर आदी संपूर्ण साहित्य चोरीस गेल्याचे विस्थापितांनी सांगितले. कृषी पंपाच्यादेखरेखीसाठी कुणीच राहत नसल्यामुळे चोरट्यांनी या संबंधिचा फायदा घेतला आहे. शासनाने सिंचनाची सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी कृषी पंपाच्या नवीन साहित्यासाठी आम्हा शेतकऱ्यांनाच आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे, अशीही व्यथा त्यांनी व्यक्त केली आहे.