शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

सहा एकर क्षेत्रात घेतले मिरचीचे ५०० क्विंटल उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:27 IST

शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील युवा शेतकरी अविनाश युवराज पाटील यांनी सहा एकर क्षेत्रात मिरची पिकाची लागवड करण्याचे ठरवले. त्यांना ...

शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील युवा शेतकरी अविनाश युवराज पाटील यांनी सहा एकर क्षेत्रात मिरची पिकाची लागवड करण्याचे ठरवले. त्यांना गुजरात राज्यातील पिंपळोद, ता. निझर येथील सुविधा ग्रुपचे मिरची उत्पादक शेतकरी योगेश पटेल यांचे मार्गदर्शन लाभले. मिरची पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी योग्य नियोजन करून योगेश पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली फवारणी, खत, सूक्ष्म अन्यद्रव्ये याचे योग्य नियोजन केले. पाण्याची बचत व्हावी यासाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्यात आले.

अविनाश पाटील हे पदवीधर असून, त्यांनी नोकरी न करता गावातच उत्पन्नाचे साधन तयार केले. पारंपरिक शेतीला बगल देत आधुनिक शेतीकडे पावले टाकत शेतात मिरची पिकाची लागवड केली. मिरची विक्रीतून त्यांना भरघोस उत्पन्न मिळत आहे.

आखाती देशात मिरची निर्यात

अविनाश पाटील यांच्या मिरचीला विदेशातूनही मागणी येत आहे. पिंपळोद येथील योगेश पटेल यांच्या मदतीने त्यांची मिरची मुंबईसह आखाती देशातही निर्यात केली जात आहे. स्थानिक बाजारभावापेक्षा अधिकचा भाव त्यांना मिळाला. त्यांनी सुरू केलेल्या या प्रयोगाचा परिसरातील शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. गुजरात राज्यातील पिंपळोद, ता.निझर येथील योगेश पटेल यांच्या सुविधा ग्रुपच्या माध्यमातून निर्यातीसाठी योग्य असणाऱ्या मिरचीची लागवड पाटील यांनी केली आहे. मिरचीचे पीक तयार झाले की याच ग्रुपच्या माध्यमातून तोडणी करून आवश्यक ती खबरदारी घेऊन लाल रंगाच्या कट्ट्यांमध्ये पॅकिंग केले जाते.

शिमला मिरचीची लागवड

ब्राह्मणपुरी येथील शेतकरी अविनाश पाटील यांनी एकरभर क्षेत्रात नर्सरीची उभारणी करीत शिमला मिरचीचीही लागवड केली आहे. शिमला मिरचीच्या लागवडीनंतर ४५ ते ५० दिवसांत तोडणी करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.