शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

नीट न देता मेडिकल प्रवेश, तज्ज्ञ, विद्यार्थ्यांना काय वाटते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:23 IST

नांदेड जिल्ह्यातून तब्बल १९ हजार ५५० विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली आहे. त्यात तामिळनाडू सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रम ...

नांदेड जिल्ह्यातून तब्बल १९ हजार ५५० विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली आहे. त्यात तामिळनाडू सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु, राज्य पातळीवर परीक्षा घेणे अथवा बारावी गुणांवर मेडिकलला प्रवेश देणे चुकीचेच ठरेल, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

परीक्षेची गुणवत्ता पाहता व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करणे आवश्यक आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांची परीक्षेबद्दलची विश्वासार्हता कायम राहील.

नीटशिवाय मेडिकल प्रवेश सुरू केल्यास, गुणवत्ता असलेले डॉक्टर घडणे कठीण होईल. ‘वन नेशन वन एक्झाम’ हे तत्त्व डोळ्यासमोर ठेवून प्रांतिक परीक्षांमध्ये होणारे घोटाळे, विलंब, गैरसोय दूर करण्यासाठी नीट (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) ही परीक्षा सुरू करण्यात आली होती. नीट परीक्षेसाठी दरवर्षी लाखो

विद्यार्थी बसतात. परंतु, या परीक्षेतही घोटाळे, पेपरफुटीसारखी प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे यावर ठोस पाऊल उचलून परीक्षा व्यवस्थापन सुधारण्यावर भर द्यावा, जेणेकरून विद्यार्थी आणि पालकांचे मनोबल स्थिर होईल आणि एनटीए वरचा विश्वास कायम राहण्यास मदत होईल, असे मत आयआयबीचे संचालक दशरथ पाटील यांनी व्यक्त केले.

चाैकट...

कोणतीही परीक्षा ही परीक्षार्थी विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी असते. ‘वन नेशन वन एक्झाम’ तत्त्वावर आधारित नीट परीक्षेसाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी बसतात. त्यातून देशभरात जवळपास ७० हजार विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळतो. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ही परीक्षा असून, एनटीएकडून दरवर्षी ही परीक्षा घेते. बारावीवर परीक्षा घेतली तर देशाला गुणवत्तापूर्ण डॉक्टर मिळणार नाहीत. - दशरथ पाटील, नांदेड.

देशातील काही ठराविक परीक्षा देशपातळीवर घेतल्या जातात. त्यातून गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांची निवड होते. त्याच धर्तीवर नीट असून वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण परीक्षा आहे. ती टाळून बारावीच्या आधारावर मेडिकल प्रवेश देणे चुकीचे आणि देशासाठी, आरोग्य विभागासाठी धोक्याचे ठरेल. - गजानन मोरे, शैक्षणिक सल्लागार, नांदेड.

चौकट...

बारावीच्या गुणांवर मेडिकलला प्रवेश दिल्यास गुणवत्तापूर्ण डॉक्टर निर्माण होणार नाहीत. परीक्षा राज्यपातळीवर घेण्याऐवजी पेपरफुटी, वेळेवर परीक्षा न होणे, विद्यार्थ्यांनी निवडलेले सेंटर सोडून इतर सेंटर देणे आदी बाबींवर लक्ष केंद्रित करून व्यवस्थापन सुधारण्यावर भर द्यावा. -निकिता गावंडे, विद्यार्थिनी.

बारावी परीक्षेत पैकीच्या पैकी गुण घेणे सोपे आहे. त्यात ग्रामीण भागात अथवा ज्या सेंटरवर कॉप्या चालतात, त्या ठिकाणी घेतले तर मग अपेक्षित मार्क मिळणे सोईचे होते. त्यात बहुतांश संस्था राजकीय पुढाऱ्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे बारावीच्या गुणांवर मेडिकलला प्रवेश देऊ नये. नीट हाच फाॅर्म्युला ठेवावा. - वैष्णवी पगारे, विद्यार्थिनी.