शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

सुविधांपासून कोसोदूर

By admin | Updated: November 6, 2014 13:43 IST

शहरापासून ३-४ कि.मी. अंतरावर असलेला व नगर परिषदेअंतर्गत येणारा हुलकानेतांडा स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे.

 हदगाव : शहरापासून ३-४ कि.मी. अंतरावर असलेला व नगर परिषदेअंतर्गत येणारा हुलकानेतांडा स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. गावाला साधा रस्ताही नसल्यामुळे येथील नागरिकांना आपण शहरालगत राहत नसून एखाद्या जंगलात राहत असल्याचाच अनुभव येतो.५0 ते ६0 घरे असलेला हा तांडा शहरालगतच आहे. हदगावच्या मोठमोठय़ा हस्तीचे शिवार येथे आहे. हुलकाने यांच्या शेतात सालगडी म्हणून राहत असणारे पूर्वीचे बंजारी यांचे एकच घर होते. हळूहळू येथे वस्ती वाढली. आजूबाजूला जंगल असल्यामुळे जंगलातील शिकार करुन आपली व कुटुंबाची उपजीविका भागविणारे बंजारी येथील शेतकर्‍यांच्या संपर्कात आले व त्यांनी शेती कसायला सरुवात केली.देशाला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे उलटले परंतु या तांड्याच्या मूलभूत सुविधा अपूर्णच आहेत. येथे शासनाची फक्त जि.प. शाळा आहे. बाकी कोणत्याच सुविधा नाहीत. प्रत्येक गावाच्या शेजारी तांडा असतो. तो त्या गावाच्या ग्रामपंचायतीस जोडला गेला व त्याचा विकासही झाला. गावात नळयोजना, वीज, आरोग्य, शिक्षण या सुविधा आल्या परंतु येथे मात्र कोणतीच सोय नाही. येथे नेहमीच गुडघ्याएवढे उंचीचे गवत असते व परिसर निर्जन्य असल्यामुळे साप, विंचू यांचेही प्रमाण भरपूर असते. बाहेरगावी पाहुण्यांकडे गेल्याने आमचे गाव हदगाव म्हणून सांगणार्‍या या ग्रामस्थांना शहरातील कोणतीच सुविधा मिळत नाही. शहराचा होणारा विकास पाहून यांचाही ऊर भरुन येतो. दिवसभर येथील ग्रामस्थ मोठय़ा दिमाखाने शहरात फिरतात व रात्री गावाकडे जाताना मात्र त्यांना रस्त्याचा होणारा त्रास सहन करण्याशिवाय पर्याय नाही. तांड्यावरील एखादा नाईक एका पार्टीचे वाजवितो तर दुसरा नाईक दुसर्‍या पार्टीचे वाजवितो. एकमेकाच्या जिवावर उठतात, परंतु विकासासाठी एकत्र येऊन मागणी करीत नाही. त्यामुळे प्रतिनिधीचे फावते. निवडणुकीवेळी दारु-मटनच्या ओल्या पाटर्य़ाही होतात. निवडणूक संपली की, रस्त्याच्या चर्चाही संपतात. आता तरी नवीन आमदार याकडे लक्ष घालतील का? अशी चर्चा रंगत आहे./ ■ येथे बाकी सुविधांची आवश्यकता नाही. फक्त दळणवळाची सोय झाली तरी हदगाव शहरातील सर्वच सुविधांचा त्यांना फायदा घेता येईल. परंतु शेतीकडे जाण्यासाठी पाणंदरस्ता चांगला असतो परंतु या तांड्याकडे जाण्यासाठी तसाही रस्ता उपलब्ध नाही. हा रस्ता करुन देतो म्हणून प्रत्येक लोकप्रतिनिधींनी त्यांना शब्द दिला खरा परंतु पाळला कोणीही नाही. पावसाळा व हिवाळ्यात ही मंडळी पायी चालण्यासाठी अंतर कमी व्हावे यासाठी सिंचन विभागाच्या कार्यालयातून ये-जा करतात.