शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
3
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
4
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
5
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
6
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
7
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
8
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
9
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
10
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
11
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
12
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
13
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
14
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
15
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
16
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
17
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
18
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
19
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
20
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!

कंधार तालुक्यात कुपोषित बालकांचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:46 IST

तालुक्यात आॅक्टोबर महिन्यात कुपोषित बालकांची संख्या ३३७ होती़ परंतु तीन महिन्यांत वयानुसार तीव्र कमी वजनाचे बालके वरच्या श्रेणीत आणण्यात यश आले़ जानेवारीअखेर २७० बालके कुपोषित असल्याचे समोर आले आहे़ ६७ बालकांच्या वजनात सुधारणा करण्यासाठी लोकसहभागातील बालगोपाळ पंगत, आरोग्य शिबिरे, आहाराचे प्रात्यक्षिके आदीची मात्रा लागू झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे़

गंगाधर तोगरे।लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : तालुक्यात आॅक्टोबर महिन्यात कुपोषित बालकांची संख्या ३३७ होती़ परंतु तीन महिन्यांत वयानुसार तीव्र कमी वजनाचे बालके वरच्या श्रेणीत आणण्यात यश आले़ जानेवारीअखेर २७० बालके कुपोषित असल्याचे समोर आले आहे़ ६७ बालकांच्या वजनात सुधारणा करण्यासाठी लोकसहभागातील बालगोपाळ पंगत, आरोग्य शिबिरे, आहाराचे प्रात्यक्षिके आदीची मात्रा लागू झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे़तालुक्यात १० विभागांगर्तत अंगणवाडी व मिनी अंगणवाडीची संख्या ३२० आहे़ पूर्व प्राथमिक शिक्षण आहार, आरोग्य आदी सोयी-सुविधा अंगणवाडी केंद्रातून शून्य ते सहा वयोगटातील बालकांना पुरविल्या जातात़ यातून सक्षम व संस्कारक्षम पिढी निर्माण होण्यासाठी केंद्राची उपयुक्तता आहे़ तरीही नानाविध पायाभूत सुविधा, शुद्ध पाणी, स्वतंत्र इमारत, स्वच्छतागृह आदीची मोठ्या प्रमाणात वाणवा आहे़ त्यातच सकस आहार, मनोरंजनाची अत्यंत आवश्यकता आहे़ सर्वसमस्यावर मात करत कुपोषणमुक्ती करण्याचे मोठे आव्हान असते़ त्यातून सर्वसाधारण श्रेणीत बालके आणण्याचा प्रयत्न केला जातो़ आॅक्टोबर महिन्यात असलेली कुपोषित बालकांची संख्या आता जाने अखेरमध्ये कमी झाली आहे़ संपामुळेही बालकाकडे थोडे दुर्लक्ष झाले होते़सर्वसाधारण श्रेणीत बालके आणण्याचा प्रयत्नसर्वाधिक कुपोषित बालक संख्या उस्माननगर मध्ये आहे़ सर्वात कमी कुपोषित बालकसंख्या रुई विभागात आहे़ कुपोषणमुक्तीसाठी बालविकास प्रकल्प अधिकारी कैलास बळवंत यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी संजय मेडपलवाड, पर्यवेक्षिका एऩएच़सर्केलवाड, विजया नागरगोजे, एस़डी़सूर्य, आशा धोंडगे, भारती पाटील, उषा चव्हाण, गंगासागर नरवाडे, सी़आऱघोडजकर, युक़े़गिरी, मदतनीस कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले़सर्वसमस्यावर मात करत कुपोषणमुक्ती करण्याचे मोठे आव्हान असते़ त्यातून सर्वसाधारण श्रेणीत बालके आणण्याचा प्रयत्न केला जातो़ आॅक्टो. महिन्यात असलेली कुपोषित बालकांची संख्या आता जानेवारी अखेरमध्ये कमी झाली आहे़ संपामुळेही बालकाकडे थोडे दुर्लक्ष झाले होते़० ते ६ वयोगटातील बालकांची संख्या २० हजार ९३४ अशी जाने़ महिन्यातील आहे़ त्यात वजन घेतलेले १८ हजार ६४४ बालक संख्या होती़ साधारण श्रेणीत १७ हजार १३६ होती़वयानुसार मध्यम तीव्र वजनाचे १२३८ तर तीव्र कमी वजनाचे २७० बालके आढळली़ आॅक्टो़ २०१७ मध्ये तीव्र कमी वजनाचे ३३८ बालके होती़ त्यात आता ६७ ने घट झाली आहे़कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रातील ० ते सहा वयोगटातील बालकांना दिला जाणारा पोषण आहार योग्य वेळी मिळत नसल्याने कुपोषित बालकांचे प्रमाण वाढत आहे़ त्यासाठी कुपोषित बालकांसाठी गावात बालविकास केंद्र स्थापन करण्याची गरज आहे़ याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे़