नांदेड : जिल्ह्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी होणाऱ्या खर्चासाठी प्रशासनाला १ कोटी ४ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. हा निधी पहिल्या टप्प्यातील असून प्रति ग्रामपंचायत १० हजार ३०० रुपये खर्चासाठी प्राप्त झाले असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ. शरद मंडलिक यांनी सांगितले.
जिल्ह्यात १ हजार १४ ग्रामपंचायतीची निवडणूक रणधुमाळी सुरू आहे. अर्ज भरण्यासाठी ३० डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक ते साहित्य, वाहने, कर्मचारी भत्ता यासाठी निधीची उपलब्धता झाली आहे. पहिल्या टप्प्यात हा निधी मिळाला आहे. मार्च २०२० मध्ये जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी हाती घेण्यात आली होती. यामध्ये उमेदवारांनी अर्जही भरले होते. मात्र कोरोना संकटामुळे निवडणूकच रद्द करावी लागली. त्या काळात झालेला खर्च मात्र प्रशासनाला उपलब्ध झाला नाही.लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्ह्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी होणाऱ्या खर्चासाठी प्रशासनाला १ कोटी ४ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. हा निधी पहिल्या टप्प्यातील असून प्रति ग्रामपंचायत १० हजार ३०० रुपये खर्चासाठी प्राप्त झाले असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ. शरद मंडलिक यांनी सांगितले.
जिल्ह्यात १ हजार १४ ग्रामपंचायतीची निवडणूक रणधुमाळी सुरू आहे. अर्ज भरण्यासाठी ३० डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक ते साहित्य, वाहने, कर्मचारी भत्ता यासाठी निधीची उपलब्धता झाली आहे. पहिल्या टप्प्यात हा निधी मिळाला आहे. मार्च २०२० मध्ये जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी हाती घेण्यात आली होती. यामध्ये उमेदवारांनी अर्जही भरले होते. मात्र कोरोना संकटामुळे निवडणूकच रद्द करावी लागली. त्या काळात झालेला खर्च मात्र प्रशासनाला उपलब्ध झाला नाही.
वाहनावर होतो सर्वाधिक खर्च
ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत सर्वाधिक खर्च हा वाहनावर होतो. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र लक्षात घेता इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वाहनांची संख्या व त्यांचा खर्च अधिक आहे. त्या पाठोपाठ निवडणूक साहित्यावरील खर्चही मोठा आहे. ही निवडणूक प्रक्रिया पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांना मंजूर असलेल्या भत्यावरही मोठा खर्च होतो. मात्र राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्रति ग्रामपंचायत ४९ हजार रुपयेच खर्च मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे यातच सर्व खर्च भागवावा लागतो.वाहनावर होतो सर्वाधिक खर्च
ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत सर्वाधिक खर्च हा वाहनावर होतो. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र लक्षात घेता इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वाहनांची संख्या व त्यांचा खर्च अधिक आहे. त्या पाठोपाठ निवडणूक साहित्यावरील खर्चही मोठा आहे. ही निवडणूक प्रक्रिया पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांना मंजूर असलेल्या भत्यावरही मोठा खर्च होतो. मात्र राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्रति ग्रामपंचायत ४९ हजार रुपयेच खर्च मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे यातच सर्व खर्च भागवावा लागतो.
२०१५ मध्ये झाल्या ९०० ग्रा.पं.च्या निवडणुका
जिल्ह्यात २०१५ मध्ये जवळपास ९०० ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकीत झालेला खर्च तेंव्हाच प्राप्त झाला आहे. २०१७ च्या निकषानुसार त्यावेळी प्रति ग्रामपंचायत निवडणूक खर्च हा २० हजार रुपये अदा करण्यात आला होता. त्यामुळे मागील काळातील ग्रा.पं. निवडणूक खर्चाची कोणतीही थकबाकी नाही.२०१५ मध्ये झाल्या ९०० ग्रा.पं.च्या निवडणुका
जिल्ह्यात २०१५ मध्ये जवळपास ९०० ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकीत झालेला खर्च तेंव्हाच प्राप्त झाला आहे. २०१७ च्या निकषानुसार त्यावेळी प्रति ग्रामपंचायत निवडणूक खर्च हा २० हजार रुपये अदा करण्यात आला होता. त्यामुळे मागील काळातील ग्रा.पं. निवडणूक खर्चाची कोणतीही थकबाकी नाही.
जिल्ह्यात १०१४ ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुका पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. निवडणुकीसाठीचा आवश्यक निधी शासनस्तरावर दिला जातो. पहिला हप्ताही उपलब्ध झाला आहे.
- डॉ.विपीन इटणकर,
निवडणूक अधिकारीजिल्ह्यात १०१४ ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुका पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. निवडणुकीसाठीचा आवश्यक निधी शासनस्तरावर दिला जातो. पहिला हप्ताही उपलब्ध झाला आहे.
- डॉ.विपीन इटणकर,
निवडणूक अधिकारी