शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
4
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
5
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
6
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
7
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
8
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
9
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
10
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
11
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
12
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
13
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
15
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
16
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
17
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
18
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
19
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
20
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव

गावबंदी करणा-यांकडूनच निमंञणाच्या पायघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:24 IST

बिलोली - कोरोनाच्या काळात आपल्या कुटुंबीयांकडे परत आलेल्या बाहेर गावातील लोकांना गाव वेशीवर थांबवत गावबंदी करणा-यांकडूनच नियंञणाच्या पायघड्या अंबरल्या ...

बिलोली - कोरोनाच्या काळात आपल्या कुटुंबीयांकडे परत आलेल्या बाहेर गावातील लोकांना गाव वेशीवर थांबवत गावबंदी करणा-यांकडूनच नियंञणाच्या पायघड्या अंबरल्या जात असून इलेक्शनसाठी गावाकडे या, अशी मनधरणी केली जात असल्याचा प्रकार गाव-खेड्यांमधुन पहावयास मिळत आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्याकरीता अनेक क्लृप्त्या वापरल्या जात असुन हळुहळु निवडणुकीचा ज्वर थंडीतही चढू लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात पोटापाण्यासाठी बाहेरगावी गेलेले नागरिक कुटुंबीयांच्या सुरक्षिततेच्या काळजीच्या इराद्याने आपल्या गावाची वाट धरली खरी;परंतु गावातील नागरिकांनी गावच्या वेशी व रस्ते आडवल्याचा कटु अनुभवास सामोरे जावे लागले होते. गावक-यांसमोर गावातील प्रवेशाकरिता हातपाय पसरवुनदेखील त्यांच्या याचनेची कोणी दखल घ्यायला तयार नव्हते.इतकेच काय पोलीसांना पाचारण करण्याच्या धमकीवजा भाषेचा वापर करण्यात आला.कोरोनापासुन जीव वाचवण्यासाठी आपल्या गावात मोठ्या अपेक्षेने परतणा-या नागरीकांना माञ गावबंदी करण्यात आली होती.आपला गाव त्यांना परका झाल्यासारखा होता. आता याच हाकलुन देणा-या नागरिकांची आठवण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने येत असल्याने एकेक मताला किती महत्व प्राप्त होत आहे, याची प्रचिती येताना दिसत आहे. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचा हंगाम सुरु आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहून आपले नशीब आजमावणारे उमेदवार सध्या निवडणुकीपूर्वीच एकेक मतांची जुळवा-जुवळ करण्याची बेरीज गावक-यांकडुन आखण्यात येत आहे.त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनिमित्त बाहेरगावी गेलेल्या मतदारांना व त्यांच्या मतांना महत्व आले आहे.यासाठी कोण कुठे राहायला गेलेले आहे,किती जणांचे मतदान आपल्याला पडेल,याचे नियोजन करण्यावर भर दिले जात असल्याचे दिसत आहे.त्यासाठी त्यांच्या वाहतुकीच्या खर्चासह विविध प्रलोभने दाखवले जात आहे.कोरोनाकाळात जिवाच्या आकांताने भीतीपोटी तालुक्यातील नागरीक मुंबई,पुणे,औरंगाबाद,पुणेसह इतरञ नोकरी,व्यवसायासाठी गेलेले आहेत.अचानक कोरोना महामारीने डोके वर काढल्याने शहरी भागात वास्तव्य करणा-यांना गावाची आठवण झाली.कुटुंबांना घेऊन ते गावाकडे आले;परंतु कोरोनाच्या भीतीने आधीच हादरुन गेलेल्या गावक-यांनी गावात बाहेरच्यांना प्रवेशबंदी केली. राञी-अपराञी तरुणांनी गावाबाहेर खडा पहारा देऊन शहरातील येणा-या लोढ्यांना गावाबाहेर थोपवले होते.आता वाढले महत्व आता याच पाहुण्यांचे ग्रामपंचायत निवडणुकीत महत्व वाढले आहे.ज्यांनी गावबंदी केली,आता तेच मतासाठी इलेक्शनला गावाकडे या म्हणुन पायघड्या घालत आहेत.