शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

नांदेड-अर्धापूर रस्त्यावर खड्डय़ांचेच साम्राज्य

By admin | Updated: October 21, 2014 13:33 IST

नांदेड-अर्धापूर या महामार्गावर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत असून यामुळे किरकोळ अपघातामध्ये वाढ होत आहे.

नांदेड : नांदेड-अर्धापूर या महामार्गावर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत असून यामुळे किरकोळ अपघातामध्ये वाढ होत आहे. परंतु याकडे मात्र संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.

नांदेड -अर्धापूर हा राज्य महामार्ग असून या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आलेले आहे. या रस्त्यावर अँाटो, बस, दुचाकी यासह मोठय़ा प्रमाणात जड वाहने धावतात. यामुळे रस्त्याची नियमित डागडुजी करणे आवश्यक आहे, परंतु तसे केले जात नाही. 
या महामार्गावर आसना नदीपासून अर्धापूर येथील बसस्थानकापर्यंत शेकडो खड्डे पडलेले आहेत. यामुळे वाहनधारकांना वाहन चालविणे कठीण झाले असून खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक छोटे-मोठे अपघात घडत आहेत. यावर्षी म्हणावा तेवढा पावसाळा झाला नसताना रस्त्याची ही अवस्था झाली असल्याने वाहनधारकांतून संपात व्यक्त केला जात आहे. 
रस्त्यावर गुडघ्याएवढे मोठे खड्डे पडले आहेत, परंतु ते बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तसेच संबंधित गुत्तेदाराकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली नाहीत. याचा परिणाम वाहनधारक त्रस्त झाले आहेत. संबंधित रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे. (प्रतिनिधी)