शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:23 IST

उमरी तालुक्यातील सिंधी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सध्या पर्यावरणात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत असून त्यामुळे पृथ्वीतलावर ...

उमरी तालुक्यातील सिंधी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सध्या पर्यावरणात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत असून त्यामुळे पृथ्वीतलावर मानव जात नष्ट होण्याची भीती निर्माण झाल्याने वनस्पतींचे संवर्धन हे अत्यंत आवश्यक झाले. कसल्याच खर्चाविना अमाप उत्पादन देणारा बांबू लागवडीचा उत्तम पर्याय असून वातावरणातील ३० टक्के कार्बन घेऊन ३२० किलो ऑक्सिजन बांबू बाहेर सोडते. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी बांबू लागवडीचा पर्याय पुढे येत आहे. अत्यल्प लागवड खर्च व कमी पावसात अवघ्या तीन वर्षांत तब्बल ६० फूट वाढ होणाऱ्या या बांबूची एका एकरमध्ये २२० झाडे तयार होतात. बांबूपासून इंधनाचा पर्याय असलेले इथेनॉल त्यापासून डिझेल, पेट्रोल, सीएनजी, कागद, कापड, फर्निचर आदी अनेक वस्तूंची निर्मिती होते. आता प्लास्टिक बंद होणार असल्याने बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार आहे . लागवडीसाठी कसलाच खर्च नसलेले बांबू हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत किफायतशीर व अधिक पैसा मिळवून देणारे उत्पादन ठरणार आहे. बांबू लागवडीसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती यावेळी पाशा पटेल यांनी दिली. कार्यक्रमाचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते गोविंदराव पाटील सिंधीकर यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शिंदे, शिरीषराव देशमुख गोरठेकर, पांडुरंग देशमुख गोरठेकर, सुभाष पाटील कोळगावकर, प्रल्हाद पाटील ढगे, रावसाहेब शिंदे, मल्लिकार्जुन चंदापुरे, साहेबराव शिंदे, सतीश देशमुख तळेगावकर आदींसह परिसरातील असंख्य शेतकरी कार्यक्रमास उपस्थित होते.