ग्रामपंचायत निवडणुकीचे १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास बुधवार दि. २३ पासून सुरुवात झाली आहे. पहिला व दुसरा दिवस निरंक गेला, तर तिसऱ्या दिवशी ११ ग्रामपंचायतींतून ४६ अर्ज व चौथ्या दिवशी २४ ग्रामपंचायती ३०६, पाचव्या दिवशी ४० ग्रामपंचायतींसाठी ६६९ अर्ज दाखल झाले आहेत. त्यासाठी तहसील कार्यालय परिसरात इच्छुकांसह समर्थकांची एकच गर्दी झाली होती.
३० डिसेंबर नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर ऑफलाइन कागदपत्रे जमा केली. निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने निवडणूक विभागाच्या वतीने तयारी करण्यात आली होती. दि.३१ डिसेंबर रोजी नामनिर्देशनपत्राची छाननी होणार आहे. ४ जानेवारी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. ३७७ सदस्यांसाठी १०२१ अर्ज दाखल
सोमवारी ११ ग्रामपंचायतींसाठी ४६ व मंगळवारी २४ ग्रामपंचायतीसाठी ३०६, बुधवारी ६६९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
यात चोरंबा-३१, रोडगी-१५, मेंढला खु.-१७, मेंढला बु.-१५, जांभरून-१७, लहान-४४, आंबेगाव-२८, शहापूर-अमरापूर-हमकरापूर-१०, येळेगाव-४५, चेणापूर-२२, लोणी बु. -४३, लोणी खु.-१९, पांगरी-१९, धामदरी-२१, पार्डी-२४, पिंपळगाव म.-७, गणपूर -३३, देळूब बु.-२८, निमगाव-३३, खैरगाव खु.-बु. -१७, खैरगाव म. -१०, कामठा बु.-५९, सांगवी खु./खडकी - १५, दाभड -८, मालेगाव-६९, भोगाव-१५, उमरी-२३, शेलगाव बु. २६, शेलगाव खु.१३, शेणी ३२, देळूब खु.५, चाभरा-३६, बारसगाव-३१, पाटणूर-२७, कोंढा-३६, देगाव बु.-, सावरगाव-१९, बामणी-वाहेदपूर वाडी-निजामपूरवाडी २७, बेलसर-३२, अमराबाद-४, अमराबाद तांडा-६, सोनाळा-७, दिग्रस-नांदला, १६ असे एकूण १०२१ अर्ज दाखल झाले आहेत.
पाच ग्रामपंचायती बिनविरोध होण्याचे संकेत
आमराबाद ७ सदस्य ४ अर्ज, खैरगाव म. ७ सदस्य १० अर्ज, सोनाळा ७ सदस्य ७ अर्ज, देळूब खु. ७ सदस्य ५ अर्ज, आमराबाद तांडा ७ सदस्य ६ अर्ज दाखल झाले आहेत.