शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
5
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
6
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
7
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
8
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
9
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
10
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
11
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
13
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
14
घरातल्या कमोडमध्ये झाला मोठा धमाका, वेस्टर्न टॉयलेटचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी!
15
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
16
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
17
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
18
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
19
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
20
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ

यंदा कृषी उत्पादकता वाढीवर भर

By admin | Updated: May 3, 2015 02:07 IST

नागपूर जिल्ह्यात रब्बीसोबतच खरीप हंगामात प्रति हेक्टर उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.

नागपूर : नागपूर जिल्ह्यात रब्बीसोबतच खरीप हंगामात प्रति हेक्टर उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात शनिवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा खरीप आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील आमदारांसह जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू उपस्थित होते. बैठकीत २०१४-१५ या वर्षाचा कृषी उत्पादनाचा आढावा आणि २०१५-१६ च्या खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले. उत्पादकता कशी वाढविता येईल, यावर चर्चा करण्यात आली व उपाययोजनाही सुचविण्यात आल्या. महाराष्ट्राच्या शेजारी राज्यांमध्ये कृषी उत्पादकतेचा दर अधिक आहे. त्याचा अभ्यास करून जिल्ह्यातील कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करा, तालुका कृषी अधिकार व कृषी सहायकांनी सूक्ष्म नियोजन करून सोमवारपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे आराखडे सादर करावे आणि १५ मेपासून त्यावर काम सुरू करावे, असे बावनकुळे यांनी सांगितले.आराखडे तयार करताना ग्रामसभा घेऊन शेतकऱ्यांशी चर्चा करावी, त्यांना जलयुक्त शिवारसह शासनाच्या इतर योजनांची माहिती द्यावी आणि पेरणी पद्धत समजावून सांगावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांना यासाठी जबाबदारी देण्यात आली असून, कामात हयगय करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला. बैठकीला खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, आशिष देशमुख, सुधीर पारवे, समीर मेघे, मल्लिकार्जुन रेड्डी, डॉ. मिलिंद माने, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, कृषी सभापती आशा गायकवाड, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी शिवाजी जोंधळे, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. विजय घावटे आणि जिल्हा कृषी अधिकारी सुबोध मोहरील उपस्थित होते. (प्रतिनिधी) तीन महिन्यात देणार ३५२४ वीज जोडण्याखरीप हंगामात सिंचनाची सोय व्हावी म्हणून तीन ते चार महिन्यात ३५२४ वीज जोडण्याचे वाटप करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. वीज जोडण्यांसाठी प्रलंबित असलेल्या अर्जांचा निपटारा करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.मुख्यमंत्री करणार अकस्मात पाहणीखरीप हंगामादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता ते आकस्मिकपणे काही गावांना भेटी देणार असून तेथील पिकांची पाहणी करतील. या भेटी दरम्यान कृषी सहायक, कृषी अधिकारी, तलाठी अनुपस्थित आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाईबोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत दिले. दरवर्षी जिल्ह्यात काही कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. याबाबत कृषी खाते आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे व विक्रेत्यांवर कारवाई करावी. बोगस बियाणांचे प्रकार उघडकीस आल्यास अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.