शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

यंदा कृषी उत्पादकता वाढीवर भर

By admin | Updated: May 3, 2015 02:07 IST

नागपूर जिल्ह्यात रब्बीसोबतच खरीप हंगामात प्रति हेक्टर उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.

नागपूर : नागपूर जिल्ह्यात रब्बीसोबतच खरीप हंगामात प्रति हेक्टर उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात शनिवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा खरीप आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील आमदारांसह जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू उपस्थित होते. बैठकीत २०१४-१५ या वर्षाचा कृषी उत्पादनाचा आढावा आणि २०१५-१६ च्या खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले. उत्पादकता कशी वाढविता येईल, यावर चर्चा करण्यात आली व उपाययोजनाही सुचविण्यात आल्या. महाराष्ट्राच्या शेजारी राज्यांमध्ये कृषी उत्पादकतेचा दर अधिक आहे. त्याचा अभ्यास करून जिल्ह्यातील कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करा, तालुका कृषी अधिकार व कृषी सहायकांनी सूक्ष्म नियोजन करून सोमवारपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे आराखडे सादर करावे आणि १५ मेपासून त्यावर काम सुरू करावे, असे बावनकुळे यांनी सांगितले.आराखडे तयार करताना ग्रामसभा घेऊन शेतकऱ्यांशी चर्चा करावी, त्यांना जलयुक्त शिवारसह शासनाच्या इतर योजनांची माहिती द्यावी आणि पेरणी पद्धत समजावून सांगावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांना यासाठी जबाबदारी देण्यात आली असून, कामात हयगय करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला. बैठकीला खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, आशिष देशमुख, सुधीर पारवे, समीर मेघे, मल्लिकार्जुन रेड्डी, डॉ. मिलिंद माने, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, कृषी सभापती आशा गायकवाड, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी शिवाजी जोंधळे, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. विजय घावटे आणि जिल्हा कृषी अधिकारी सुबोध मोहरील उपस्थित होते. (प्रतिनिधी) तीन महिन्यात देणार ३५२४ वीज जोडण्याखरीप हंगामात सिंचनाची सोय व्हावी म्हणून तीन ते चार महिन्यात ३५२४ वीज जोडण्याचे वाटप करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. वीज जोडण्यांसाठी प्रलंबित असलेल्या अर्जांचा निपटारा करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.मुख्यमंत्री करणार अकस्मात पाहणीखरीप हंगामादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता ते आकस्मिकपणे काही गावांना भेटी देणार असून तेथील पिकांची पाहणी करतील. या भेटी दरम्यान कृषी सहायक, कृषी अधिकारी, तलाठी अनुपस्थित आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाईबोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत दिले. दरवर्षी जिल्ह्यात काही कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. याबाबत कृषी खाते आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे व विक्रेत्यांवर कारवाई करावी. बोगस बियाणांचे प्रकार उघडकीस आल्यास अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.