शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक किडनी दिवस; मूत्रसंसर्गाकडे दुर्लक्ष केल्यास मूत्रपिंडांचे नुकसान होण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 08:45 IST

Nagpur News मूत्रमार्गाच्या संसर्गाच्या कोणत्याही लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करू नये कारण उपचारात उशीर झाल्यास किडनीला कधीही भरून न येणारे नुकसान होऊ शकते, असे प्रतिपादन सुपर स्पेशालिटीतील युरोलॉजिस्ट डॉ.धनंजय सेलुकर यांनी केले.

 

मेहा शर्मा

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील बालरोग ओपीडीमध्ये प्रत्येक १०० रुग्णांपैकी ५-६ मुले मूत्रसंसर्गाची तक्रार करतात. लक्ष न दिल्यास हा संसर्ग अनेकदा मूत्रपिंडांना नुकसान पोहोचविण्यास कारणीभूत ठरतो. ‘युटीआय’चे (युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन) लवकर निदान आणि उपचार केल्यास किडनीच्या भविष्यातील समस्या टाळता येतात.

मुलांमध्ये ‘नेफ्रोटिक सिंड्रोम’ नावाची स्थिती असते. हा एक किडनीचा विकार आहे, ज्यामुळे तुमच्या शरीरात तुमच्या लघवीत जास्त प्रमाणात प्रथिने जातात. नेफ्रोटिक सिंड्रोम सामान्यतः तुमच्या मूत्रपिंडातील लहान रक्तवाहिन्यांच्या क्लस्टर्सच्या नुकसानीमुळे होतो. यामुळे १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढीची समस्या उद्भवते.

मूत्रमार्गाच्या संसर्गाच्या कोणत्याही लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करू नये कारण उपचारात उशीर झाल्यास किडनीला कधीही भरून न येणारे नुकसान होऊ शकते, असे प्रतिपादन सुपर स्पेशालिटीतील युरोलॉजिस्ट डॉ.धनंजय सेलुकर यांनी केले.

ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. सतीश देवपुजारी यांच्या मते, काही औषधे घेतल्याने मुलांना किडनीचा विकार होऊ शकतो. मूत्रपिंडाच्या सहभागाबद्दल औषधांची सुरक्षितता तपासली पाहिजे. काही अँटीबायोटिक्स किडनीला हानी पोहोचवू शकतात, असे ते म्हणाले.

मुलांपेक्षा मुलींमध्ये युरिन इन्फेक्शन जास्त आढळते. प्रौढ जीवनात मूत्रपिंड निकामी टाळण्यासाठी पाठपुरावा आणि योग्य निदान करणे महत्त्वाचे आहे. अनेक रुग्णांना बालपणी मूत्रसंसर्गाचे निदान होत नाही आणि ते मोठे झाल्यावर किडनीच्या गंभीर समस्या निर्माण करतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

युरोलॉजिस्ट डॉ. आचार्य शिवनारायण यांनी मुलांमध्ये किडनी निकामी होण्याची विविध कारणे सांगितली. व्हेसीकोरेटरल रिफ्लेक्स म्हणजे मूत्राशयातून मूत्र परत वाहणे व यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. या परिस्थितीमुळे बालपण किंवा किशोरवयीन जीवनात मूत्रपिंड निकामी होऊ शकतात, असे ते म्हणाले.

ग्रामीण भागात जास्त तपासाचा खर्च, संपर्काचा अभाव यामुळे प्रकरणे जास्त असतात, ते घरगुती उपचारांवर किंवा पर्यायी औषधांवर अवलंबून असतात व ज्यावेळी ते इस्पितळात पोहोचतात तोपर्यंत प्रकरण गुंतागुंतीचे होते. ग्रामीण भागात युटीआयबाबत जागृती आवश्यक आहे, असे मत युरोलॉजिस्ट डॉ.प्रकाश खेतान यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Healthआरोग्य