शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कामाचा ताण वाढतोय!

By admin | Updated: October 7, 2015 03:38 IST

पूर्वी राज्यभरात २२ लाख जि.प. कर्मचारी होते. मात्र आज ती संख्या १४ लाखांपर्यंत कमी झाली आहे.

रिक्त पदे कधी भरणार ? : जि.प. कर्मचारी कृती समितीचा सवाल नागपूर : पूर्वी राज्यभरात २२ लाख जि.प. कर्मचारी होते. मात्र आज ती संख्या १४ लाखांपर्यंत कमी झाली आहे. यामुळे अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. यातून प्रत्येक कर्मचारी रोज नव्या समस्येला तोंड देत आहे. रिक्त झालेली पदे वेळीच न भरल्यामुळे आज ही स्थिती निर्माण झाली आहे. या रिक्त पदांच्या कामाचा भार इतर कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. अनेक कर्मचाऱ्यांना तीन-तीन पदांचा कार्यभार सांभाळावा लागत आहे. दुसरीकडे रोज नवनवीन योजना येत आहेत. या सर्व चक्रात जि.प.तील कर्मचारी भरडला जात असल्याची व्यथा नागपूर जिल्हा परिषद कर्मचारी संघटना कृती समितीने मंगळवारी ‘लोकमत व्यासपीठ’च्या मंचावर व्यक्त केली. आजपर्यंत जि.प.तील सर्व कर्मचारी वेगवेगळ्या संघटनांमध्ये विखुरलेले होते. काही लोकांनी स्वत:च्या स्वार्थापोटी वेगवेगळी दुकाने थाटली होती. परंतु आता त्या सर्व संघटनांनी आपसातील मतभेद दूर करू न ‘नागपूर जिल्हा परिषद कर्मचारी संघटना कृती समिती’ तयार केली आहे. यात नागपूर जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ (जिल्हा शाखा, नागपूर) व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन (ओंकारप्रणीत) अशा तीन संघटनांमधील सुमारे दहा हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कृती समितीच्या माध्यमातून मागील २ सप्टेंबर रोजी संप पुकारण्यात आला होता. तो या कृती समितीचा पहिला लढा असून, शंभर टक्के यशस्वी झाला आहे. विशेष म्हणजे, या संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून जि.प. कर्मचाऱ्यांची सर्व शक्ती एकजूट झाली आहे. यामधील सर्व संघटनांचा उद्देश एकच आहे. ृती समितीने त्यांना एकत्र बांधण्याचे काम केले आहे. या चर्चेत कृती समितीचे अध्यक्ष विलास बारापात्रे, कार्याध्यक्ष गोपिचंद कातुरे, कोषाध्यक्ष संजय तांबडे व सल्लागार संजय सिंग आणि संजय धोटे यांनी भाग घेतला होता. (प्रतिनिधी)अगोदर मुख्यालयी सोयी-सुविधा द्या राज्य शासनाकडून जि.प. कर्मचाऱ्यांना मुख्यालयी थांबण्याची सक्ती केली जात आहे. परंतु गावखेड्यातील कर्मचाऱ्यांसाठी तेथे कोणत्याही सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. मग अशा स्थितीत तो कर्मचारी मुख्यालयी कसा थांबणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे सरकार मुख्यालयी थांबले नाही, तर घरभाड्यासह इतर लाभ बंद करण्याची धमकी देत आहे. शासनाची ही सक्ती चुकीची असून, अगोदर मुख्यालयी राहण्यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करा आणि नंतरच अशा जाचक अटी लागू करा, अशी मागणी यावेळी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. पगारासाठी पायपीटआतापर्यंत जि.प. कर्मचाऱ्यांना महिन्याच्या १ तारखेला पगार मिळत होता. परंतु राज्य शासनाने अलीकडेच सेवार्थ प्रणाली सुरू करू न पगाराची सर्व देयके आॅनलाईन भरणे अनिवार्य केले आहे. मात्र यासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध नसल्याने कर्मचाऱ्यांना सहा-सहा महिने पगाराची प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेक गावात इंटरनेट सुविधा नसल्याने त्यांना पगार बिल तयार करण्यासाठी नागपुरात यावे लागत आहे. शिवाय अनेकदा लिंक फेलचा फटका सहन करावा लागतो. विशेष म्हणजे, अनेक कर्मचाऱ्यांनी घर बांधण्यासाठी लाखो रुपयांचे कर्ज घेतले आहे. परंतु वेळेवर पगार मिळत नसल्याने ते कर्जाचा हप्ता वेळेवर भरू शकत नसल्याने अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत आहे. राज्य शासनाची ही सर्व चलाखी असून मुद्दाम कर्मचाऱ्यांना वेठीस धरत असल्याचा आरोप यावेळी कर्मचाऱ्यांनी केला.