शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

आंदोलकांना मिळेल का न्याय?

By admin | Updated: December 7, 2015 06:30 IST

जनतेच्या तक्रारी, समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे, उपोषणाचा हक्क घटनेच्या कलम १९ अंतर्गत मिळाला आहे.

मंगेश व्यवहारे ल्ल नागपूरजनतेच्या तक्रारी, समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे, उपोषणाचा हक्क घटनेच्या कलम १९ अंतर्गत मिळाला आहे. परंतु प्रशासनाने सरकार आणि आंदोलकात अकारण अंतर वाढविल्याने, आंदोलकांचा आवाज दाबल्या जात आहे. कितीही ओरडले तरी सरकार दरबारी त्यांचा आवाज पोहचत नाही तर दुखणे जाणून घेण्यासाठी सरकारचा प्रतिनिधी त्यांच्यापर्यंत पोहचत नाही. घटनेने आंदोलनाचे अधिकार मिळवून दिले असताना, सरकार जर आमच्याकडे दुर्लक्ष करीत असेल तर सरकारचा हा प्रकार घटनेवर घाला घालणारा आहे. हिवाळी अधिवेशनात हिस्लॉप कॉलेज ते आमदार निवास चौकात धरणे उपोषणासाठी प्रशासन जागा द्यायचे. स्थानिक लोकांना अधिवेशन काळात उपोषणकर्त्यांमुळे त्रास होत असल्याने, येथील धरणे मंडप इतरत्र हलवावे यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने हिस्लॉप कॉलेज जवळील उपोषणाची परवानगी नाकारली. त्यामुळे प्रशासनाने उपोषणासाठी मॉरिस कॉलेज मैदानाची जागा निश्चित केली. मात्र ही जागा विधिमंडळापासून फार दूर आहे. येथे प्रशासकीय व राजकीय हालचाली नाही. पोलिसांचा गराडा आणि भिंतीने वेढलेल्या या मैदानात आंदोलकांना कैदेत ठेवल्याचा भास होतो. कितीही ओरडलो तरी सरकारपर्यंत आवाज पोहचत नाही तर लोकप्रतिनिधींना आमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. २०१४ च्या संपूर्ण अधिवेशनादरम्यान केवळ एका मंत्र्याने धरण्यांना भेट दिली. त्यांनी निवेदन स्वीकारून संबंधित विभागाला पाठविण्याचे आश्वासन दिले. काही आंदोलकांनी मंत्र्यांशी भेटण्याचा आग्रह धरला असता, पोलीस संघटनेच्या निवडक प्रतिनिधींना विधिमंडळ परिसरात घेऊन जातात. तिथे मंत्र्यांकडे वेळ नसल्याने, संबंधित विभागाचे सचिव निवेदन स्वीकारून परत पाठवितात. मात्र समस्या काही सुटत नाही. हिस्लॉप कॉलेजची जागा ही उपोषणकर्त्यांसाठी अतिशय सोयीस्कर होती. त्यांना आमदार निवासातील लोकप्रतिनिधींना सहज भेटता येत होते. रविभवनात राहणाऱ्या मंत्र्यांशी संपर्क करता येत होता. शिवाय अधिवेशनाची इमारतही जवळ होती. परंतु लोकप्रतिनिधी, मंत्री व प्रशासनासाठी ही जागा डोकेदुखी होती. त्यामुळे अतिशय सोयीस्करपणे प्रशासनाने आंदोलकांना दूर केले. गावकुसाबाहेर बसविलेघटनेने जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी आंदोलन, उपोषणाचे अधिकार दिले. मात्र, प्रशासन जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. उपोषणकर्त्यांना मॉरिस कॉलेजच्या मैदानावर बसवून आंदोलकांची हवाच काढली आहे. मॉरिस कॉलेजच्या मैदानाच्या सभोवताली मोठमोठ्या भिंतीत, पोलिसांच्या चोख बंदोबस्तात आंदोलकांचा आवाज दाबला जात आहे. उपोषणकर्त्यांना सरकारने गावकुसाबाहेर बसविले आहे, कोंडवाड्यात दाबले आहे. -विलास भोंगाडे, सचिव, विदर्भ मोलकरीण संघटनाराज्यकर्ते संवाद साधण्यास इच्छूक नाहीतप्रशासन ऐकत नसल्याने, सरकारशी संवाद साधण्यासाठी आंदोलनकर्ते धरणे देतात, उपोषण करतात. राज्यकर्त्यांनी दूरदूरून येणाऱ्या गोरगरीब जनतेशी संवाद साधण्याची गरज आहे. परंतु राज्यकर्ते संवाद साधण्यास इच्छूक नसतील, तर आंदोलकांना न्याय मिळणार नाही. त्यामुळे अशा सरकारला कल्याणकारी सरकार म्हणता येणार नाही. -दीनानाथ वाघमारे, संयोजक, संघर्ष वाहिनी