शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

आंदोलकांना मिळेल का न्याय?

By admin | Updated: December 7, 2015 06:30 IST

जनतेच्या तक्रारी, समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे, उपोषणाचा हक्क घटनेच्या कलम १९ अंतर्गत मिळाला आहे.

मंगेश व्यवहारे ल्ल नागपूरजनतेच्या तक्रारी, समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे, उपोषणाचा हक्क घटनेच्या कलम १९ अंतर्गत मिळाला आहे. परंतु प्रशासनाने सरकार आणि आंदोलकात अकारण अंतर वाढविल्याने, आंदोलकांचा आवाज दाबल्या जात आहे. कितीही ओरडले तरी सरकार दरबारी त्यांचा आवाज पोहचत नाही तर दुखणे जाणून घेण्यासाठी सरकारचा प्रतिनिधी त्यांच्यापर्यंत पोहचत नाही. घटनेने आंदोलनाचे अधिकार मिळवून दिले असताना, सरकार जर आमच्याकडे दुर्लक्ष करीत असेल तर सरकारचा हा प्रकार घटनेवर घाला घालणारा आहे. हिवाळी अधिवेशनात हिस्लॉप कॉलेज ते आमदार निवास चौकात धरणे उपोषणासाठी प्रशासन जागा द्यायचे. स्थानिक लोकांना अधिवेशन काळात उपोषणकर्त्यांमुळे त्रास होत असल्याने, येथील धरणे मंडप इतरत्र हलवावे यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने हिस्लॉप कॉलेज जवळील उपोषणाची परवानगी नाकारली. त्यामुळे प्रशासनाने उपोषणासाठी मॉरिस कॉलेज मैदानाची जागा निश्चित केली. मात्र ही जागा विधिमंडळापासून फार दूर आहे. येथे प्रशासकीय व राजकीय हालचाली नाही. पोलिसांचा गराडा आणि भिंतीने वेढलेल्या या मैदानात आंदोलकांना कैदेत ठेवल्याचा भास होतो. कितीही ओरडलो तरी सरकारपर्यंत आवाज पोहचत नाही तर लोकप्रतिनिधींना आमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. २०१४ च्या संपूर्ण अधिवेशनादरम्यान केवळ एका मंत्र्याने धरण्यांना भेट दिली. त्यांनी निवेदन स्वीकारून संबंधित विभागाला पाठविण्याचे आश्वासन दिले. काही आंदोलकांनी मंत्र्यांशी भेटण्याचा आग्रह धरला असता, पोलीस संघटनेच्या निवडक प्रतिनिधींना विधिमंडळ परिसरात घेऊन जातात. तिथे मंत्र्यांकडे वेळ नसल्याने, संबंधित विभागाचे सचिव निवेदन स्वीकारून परत पाठवितात. मात्र समस्या काही सुटत नाही. हिस्लॉप कॉलेजची जागा ही उपोषणकर्त्यांसाठी अतिशय सोयीस्कर होती. त्यांना आमदार निवासातील लोकप्रतिनिधींना सहज भेटता येत होते. रविभवनात राहणाऱ्या मंत्र्यांशी संपर्क करता येत होता. शिवाय अधिवेशनाची इमारतही जवळ होती. परंतु लोकप्रतिनिधी, मंत्री व प्रशासनासाठी ही जागा डोकेदुखी होती. त्यामुळे अतिशय सोयीस्करपणे प्रशासनाने आंदोलकांना दूर केले. गावकुसाबाहेर बसविलेघटनेने जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी आंदोलन, उपोषणाचे अधिकार दिले. मात्र, प्रशासन जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. उपोषणकर्त्यांना मॉरिस कॉलेजच्या मैदानावर बसवून आंदोलकांची हवाच काढली आहे. मॉरिस कॉलेजच्या मैदानाच्या सभोवताली मोठमोठ्या भिंतीत, पोलिसांच्या चोख बंदोबस्तात आंदोलकांचा आवाज दाबला जात आहे. उपोषणकर्त्यांना सरकारने गावकुसाबाहेर बसविले आहे, कोंडवाड्यात दाबले आहे. -विलास भोंगाडे, सचिव, विदर्भ मोलकरीण संघटनाराज्यकर्ते संवाद साधण्यास इच्छूक नाहीतप्रशासन ऐकत नसल्याने, सरकारशी संवाद साधण्यासाठी आंदोलनकर्ते धरणे देतात, उपोषण करतात. राज्यकर्त्यांनी दूरदूरून येणाऱ्या गोरगरीब जनतेशी संवाद साधण्याची गरज आहे. परंतु राज्यकर्ते संवाद साधण्यास इच्छूक नसतील, तर आंदोलकांना न्याय मिळणार नाही. त्यामुळे अशा सरकारला कल्याणकारी सरकार म्हणता येणार नाही. -दीनानाथ वाघमारे, संयोजक, संघर्ष वाहिनी