शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलकांना मिळेल का न्याय?

By admin | Updated: December 7, 2015 06:30 IST

जनतेच्या तक्रारी, समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे, उपोषणाचा हक्क घटनेच्या कलम १९ अंतर्गत मिळाला आहे.

मंगेश व्यवहारे ल्ल नागपूरजनतेच्या तक्रारी, समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे, उपोषणाचा हक्क घटनेच्या कलम १९ अंतर्गत मिळाला आहे. परंतु प्रशासनाने सरकार आणि आंदोलकात अकारण अंतर वाढविल्याने, आंदोलकांचा आवाज दाबल्या जात आहे. कितीही ओरडले तरी सरकार दरबारी त्यांचा आवाज पोहचत नाही तर दुखणे जाणून घेण्यासाठी सरकारचा प्रतिनिधी त्यांच्यापर्यंत पोहचत नाही. घटनेने आंदोलनाचे अधिकार मिळवून दिले असताना, सरकार जर आमच्याकडे दुर्लक्ष करीत असेल तर सरकारचा हा प्रकार घटनेवर घाला घालणारा आहे. हिवाळी अधिवेशनात हिस्लॉप कॉलेज ते आमदार निवास चौकात धरणे उपोषणासाठी प्रशासन जागा द्यायचे. स्थानिक लोकांना अधिवेशन काळात उपोषणकर्त्यांमुळे त्रास होत असल्याने, येथील धरणे मंडप इतरत्र हलवावे यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने हिस्लॉप कॉलेज जवळील उपोषणाची परवानगी नाकारली. त्यामुळे प्रशासनाने उपोषणासाठी मॉरिस कॉलेज मैदानाची जागा निश्चित केली. मात्र ही जागा विधिमंडळापासून फार दूर आहे. येथे प्रशासकीय व राजकीय हालचाली नाही. पोलिसांचा गराडा आणि भिंतीने वेढलेल्या या मैदानात आंदोलकांना कैदेत ठेवल्याचा भास होतो. कितीही ओरडलो तरी सरकारपर्यंत आवाज पोहचत नाही तर लोकप्रतिनिधींना आमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. २०१४ च्या संपूर्ण अधिवेशनादरम्यान केवळ एका मंत्र्याने धरण्यांना भेट दिली. त्यांनी निवेदन स्वीकारून संबंधित विभागाला पाठविण्याचे आश्वासन दिले. काही आंदोलकांनी मंत्र्यांशी भेटण्याचा आग्रह धरला असता, पोलीस संघटनेच्या निवडक प्रतिनिधींना विधिमंडळ परिसरात घेऊन जातात. तिथे मंत्र्यांकडे वेळ नसल्याने, संबंधित विभागाचे सचिव निवेदन स्वीकारून परत पाठवितात. मात्र समस्या काही सुटत नाही. हिस्लॉप कॉलेजची जागा ही उपोषणकर्त्यांसाठी अतिशय सोयीस्कर होती. त्यांना आमदार निवासातील लोकप्रतिनिधींना सहज भेटता येत होते. रविभवनात राहणाऱ्या मंत्र्यांशी संपर्क करता येत होता. शिवाय अधिवेशनाची इमारतही जवळ होती. परंतु लोकप्रतिनिधी, मंत्री व प्रशासनासाठी ही जागा डोकेदुखी होती. त्यामुळे अतिशय सोयीस्करपणे प्रशासनाने आंदोलकांना दूर केले. गावकुसाबाहेर बसविलेघटनेने जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी आंदोलन, उपोषणाचे अधिकार दिले. मात्र, प्रशासन जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. उपोषणकर्त्यांना मॉरिस कॉलेजच्या मैदानावर बसवून आंदोलकांची हवाच काढली आहे. मॉरिस कॉलेजच्या मैदानाच्या सभोवताली मोठमोठ्या भिंतीत, पोलिसांच्या चोख बंदोबस्तात आंदोलकांचा आवाज दाबला जात आहे. उपोषणकर्त्यांना सरकारने गावकुसाबाहेर बसविले आहे, कोंडवाड्यात दाबले आहे. -विलास भोंगाडे, सचिव, विदर्भ मोलकरीण संघटनाराज्यकर्ते संवाद साधण्यास इच्छूक नाहीतप्रशासन ऐकत नसल्याने, सरकारशी संवाद साधण्यासाठी आंदोलनकर्ते धरणे देतात, उपोषण करतात. राज्यकर्त्यांनी दूरदूरून येणाऱ्या गोरगरीब जनतेशी संवाद साधण्याची गरज आहे. परंतु राज्यकर्ते संवाद साधण्यास इच्छूक नसतील, तर आंदोलकांना न्याय मिळणार नाही. त्यामुळे अशा सरकारला कल्याणकारी सरकार म्हणता येणार नाही. -दीनानाथ वाघमारे, संयोजक, संघर्ष वाहिनी