शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने प्राथमिक शाळांचे शुल्क का थकवले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:11 IST

नागपूर : शहरातील २५ विनाअनुदानित शाळांना शिक्षण हक्क कायद्यांतर्गत देणे असलेले १० लाख रुपयावर शिक्षण शुल्क थकवण्यात आल्यामुळे ...

नागपूर : शहरातील २५ विनाअनुदानित शाळांना शिक्षण हक्क कायद्यांतर्गत देणे असलेले १० लाख रुपयावर शिक्षण शुल्क थकवण्यात आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकार, केंद्र सरकार, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. शिक्षण हक्क कायद्यानुसार विनाअनुदानित शाळांना २५ टक्के जागांवर गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश देणे आवश्यक आहे. या विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क राज्य सरकारद्वारे अदा केले जाते. परंतु, राज्य सरकारने ओम श्री लक्ष्मी नारायण विद्या मंदिर व इतर २४ विनाअनुदानित प्राथमिक शाळांना २०१७-१८ पासून या विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क अदा केले नाही. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शाळांतर्फे ॲड. भानुदास कुलकर्णी व ॲड. अमेय मोहरीर यांनी कामकाज पाहिले.

-----------

सरकार अपारदर्शी, चौकशीची मागणी

३ सप्टेंबर २०२० रोजीच्या परिपत्रकानुसार, केंद्र सरकारने शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राज्य सरकारला २०१४-१५ ते २०१९-२० या कालावधीत एकूण ४ हजार ४०१ कोटी रुपये अनुदान दिले. परंतु, केंद्र सरकारकडून केवळ ४८४ कोटी रुपयेच मिळाले, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. राज्य सरकारने याविषयी १८ नोव्हेंबर २०२० रोजी परिपत्रक जारी केले आहे. याशिवाय राज्य सरकारने २०१२-१३ ते २०२०-२१ या कालावधीत शिक्षण शुल्क परताव्यासाठी २ हजार ३१० कोटी रुपये मंजूर केले होते. परंतु, प्रत्यक्षात ७१७ कोटी रुपयेच वितरित करण्यात आले. परिणामी, उर्वरित रक्कम कुठे गेली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शाळांनी केली आहे.

---------

शुल्क कमी करण्याला आव्हान

केंद्र सरकारने २०१८ पासून प्रति विद्यार्थी शुल्क वाढवून २८ हजार रुपये केले. परंतु, राज्य सरकारने आतापर्यंत प्रति विद्यार्थी केवळ १७ हजार ६७० रुपयेच वितरित केले. तसेच, चालू शैक्षणिक वर्षात ही रक्कम कमी करून प्रति विद्यार्थी केवळ ८ हजार रुपये करण्यात आली, असे शाळांचे म्हणणे आहे. त्यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाच्या वैधतेला आव्हान दिले आहे. शुल्क पूर्ववत करण्याची त्यांची मागणी आहे.