शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

सरकारने प्राथमिक शाळांचे शुल्क का थकवले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:11 IST

नागपूर : शहरातील २५ विनाअनुदानित शाळांना शिक्षण हक्क कायद्यांतर्गत देणे असलेले १० लाख रुपयावर शिक्षण शुल्क थकवण्यात आल्यामुळे ...

नागपूर : शहरातील २५ विनाअनुदानित शाळांना शिक्षण हक्क कायद्यांतर्गत देणे असलेले १० लाख रुपयावर शिक्षण शुल्क थकवण्यात आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकार, केंद्र सरकार, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. शिक्षण हक्क कायद्यानुसार विनाअनुदानित शाळांना २५ टक्के जागांवर गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश देणे आवश्यक आहे. या विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क राज्य सरकारद्वारे अदा केले जाते. परंतु, राज्य सरकारने ओम श्री लक्ष्मी नारायण विद्या मंदिर व इतर २४ विनाअनुदानित प्राथमिक शाळांना २०१७-१८ पासून या विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क अदा केले नाही. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शाळांतर्फे ॲड. भानुदास कुलकर्णी व ॲड. अमेय मोहरीर यांनी कामकाज पाहिले.

-----------

सरकार अपारदर्शी, चौकशीची मागणी

३ सप्टेंबर २०२० रोजीच्या परिपत्रकानुसार, केंद्र सरकारने शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राज्य सरकारला २०१४-१५ ते २०१९-२० या कालावधीत एकूण ४ हजार ४०१ कोटी रुपये अनुदान दिले. परंतु, केंद्र सरकारकडून केवळ ४८४ कोटी रुपयेच मिळाले, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. राज्य सरकारने याविषयी १८ नोव्हेंबर २०२० रोजी परिपत्रक जारी केले आहे. याशिवाय राज्य सरकारने २०१२-१३ ते २०२०-२१ या कालावधीत शिक्षण शुल्क परताव्यासाठी २ हजार ३१० कोटी रुपये मंजूर केले होते. परंतु, प्रत्यक्षात ७१७ कोटी रुपयेच वितरित करण्यात आले. परिणामी, उर्वरित रक्कम कुठे गेली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शाळांनी केली आहे.

---------

शुल्क कमी करण्याला आव्हान

केंद्र सरकारने २०१८ पासून प्रति विद्यार्थी शुल्क वाढवून २८ हजार रुपये केले. परंतु, राज्य सरकारने आतापर्यंत प्रति विद्यार्थी केवळ १७ हजार ६७० रुपयेच वितरित केले. तसेच, चालू शैक्षणिक वर्षात ही रक्कम कमी करून प्रति विद्यार्थी केवळ ८ हजार रुपये करण्यात आली, असे शाळांचे म्हणणे आहे. त्यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाच्या वैधतेला आव्हान दिले आहे. शुल्क पूर्ववत करण्याची त्यांची मागणी आहे.