शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

अपहरण झाले कुणाचे? दुसऱ्या दिवशीही शोध नाही

By admin | Updated: July 18, 2014 00:58 IST

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे तीन शाळकरी मुलींचे अपहरण झाल्याच्या माहितीने संपूर्ण तालुका हादरला असताना दुसऱ्या दिवशी देखील कुणाचेही पालक पोलिसात तक्रार देण्यासाठी आले नाही.

अचलपुरातील अपहरण प्रकरण : पोलिसांची तपास मोहीम सुरूचअचलपूर (अमरावती) : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे तीन शाळकरी मुलींचे अपहरण झाल्याच्या माहितीने संपूर्ण तालुका हादरला असताना दुसऱ्या दिवशी देखील कुणाचेही पालक पोलिसात तक्रार देण्यासाठी आले नाही. त्यामुळे अपहरण झाले कुणाचे हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांचे तपासचक्र सुरुच आहे. दुपारपर्यंत पोलिसांनी एकूण ६४ मारोती व्हॅनची तपासणी केली होती. अचलपूर येथील व्यंकटेश विद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. ६४ व्हॅनची तपासणीपांढऱ्या रंगाच्या मारोती ओमनी व्हॅनमधून बुरखाधारी इसमांनी तीन मुलींना चाकूचा धाक दाखवून अपहरण केल्याच्या चर्चेने सर्वत्र खळबळ माजली. पोलिसांनी आतापर्यंत प्रत्यक्षदर्शी मुलींनी सांगितल्यानुसार ६४ मारोती ओमनी कारची तपासणी केली. परतवाड्यात २९, पथ्रोट १२, आसेगाव ७, अचलपूर ११ व सरमसपुरा पोलीस स्टेशन हद्दीत १० वाहनांची तपासणी करण्यात आली. जिल्हा व जिल्ह्याबाहेरील मारोती व्हॅनच्या याद्या पोलिसांनी परिवहन विभागाकडून बोलाविल्या. तोंडावर दुपट्टा बंदीपरतवाडा-अचलपूर या जुळ्या नगरीतील मुलींच्या तोंडाला स्कार्फ बांधण्यावर बंदी घालण्यात आली आहे. आज शहरात पोलिसांनी चौकाचौकात, रस्त्यावर उभे राहून मुलींना तोंडाला दुपट्टा बांधण्यास मनाई केली. शाळा-महाविद्यालयांपुढे बंदोबस्तशाळा-महाविद्यालये सुरू होण्याच्या वेळेवर दोन्ही शहरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही ठिकाणी नाकाबंदी करीत वाहनांची तपासणी केली जात आहे. घटनेने सर्वत्र संभ्रमज्या मुलींनी हा प्रकार बघितला त्यांच्यावर विश्वास ठेवून पोलिसांनी आतापर्यंत तपास कामात कुठलीच कुचराई केली नाही. सर्वत्र जिल्हाबंदी करण्यात आली. सीमारेषेवर पोलिसांना तैनात करण्यात आले. शाळा-महाविद्यालयांची अंतर्गत सुरक्षा वाढविण्यात आली. तरीही अपहरण अखेर झाले कुणाचे हा संभ्रम कायम आहे. या घटनेने पालक मात्र आपल्या पाल्यांविषयी जास्त सतर्क झाल्याचे दिसून आले. (तालुका प्रतिनिधी)