शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
6
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
7
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
8
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
9
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
10
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
11
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
12
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
14
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
15
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
16
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
17
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
18
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
19
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
20
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?

हे तर ‘पलटूराम’ सरकार; शिवसेनेच्या भगव्यात भेसळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 22:19 IST

Devendra Fadanvis Nagpur News राज्यातील महाविकास आघाडी शासनाने जनतेची घोर फसवणूक केली आहे. लोकांना खोटी आश्वासने देऊन वेळ आल्यावर सरकारकडून ‘यू टर्न’ घेण्यात येतो. हे तर ‘पलटूराम’ सरकारच आहे, या शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडले.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यातील महाविकास आघाडी शासनाने जनतेची घोर फसवणूक केली आहे. लोकांना खोटी आश्वासने देऊन वेळ आल्यावर सरकारकडून ‘यू टर्न’ घेण्यात येतो. हे तर ‘पलटूराम’ सरकारच आहे, या शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडले. नागपुरात आयोजित कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

महाविकास आघाडीच्या शासनात तीन प्रमुख पक्ष आहेत. मात्र काँग्रेसच्या मंत्र्यांना कुणीच विचारत नसल्याचे चित्र आहे. शिवसेनेला तर बाळासाहेबांच्या भगव्याचा विसर पडला आहे. आता सेनेचा भगवा खरा राहिला नसून त्यात भेसळ झाली आहे. काश्मीरमध्ये चीनच्या मदतीने कलम ३७० परत आणू असे म्हणणाऱ्या, स्वातंत्र्यवीर सावरकरांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या व गुपकारांचे समर्थन करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून ते सत्तेत बसले आहेत. शिवसेना भगव्याचा अपमानच करत आहे, असे फडणवीस म्हणाले.

वीज बिलांच्या चौकशीचे सरकारचे इशारे हास्यास्पद आहेत. अगोदर म्हणाले वीज बिल माफ करू आणि आता लक्षात आलं देता येत नाही म्हणून चौकशी करू म्हणतात. त्यांना जी चौकशी करायची आहे ती करावी. सरकार आता थोबाडावर पडले आहे. चौकशीत लक्षात येईल की थकबाकी ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातील आहे.

मुंबईत भाजप स्वबळावर लढणार

दरम्यान, फडणवीस यांना मनसेशी युतीसंदर्भात विचारले असता त्यांनी मुंबईत भाजप स्वबळावरच लढणार असल्याचे स्पष्ट केले. ‘बीएमसी’च्या निवडणुकीत भाजप मनसेसोबत हातमिळावणी करू शकते, या चर्चेवर त्यांनी पडदा पाडला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस