शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

हे तर ‘पलटूराम’ सरकार; शिवसेनेच्या भगव्यात भेसळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 22:19 IST

Devendra Fadanvis Nagpur News राज्यातील महाविकास आघाडी शासनाने जनतेची घोर फसवणूक केली आहे. लोकांना खोटी आश्वासने देऊन वेळ आल्यावर सरकारकडून ‘यू टर्न’ घेण्यात येतो. हे तर ‘पलटूराम’ सरकारच आहे, या शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडले.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यातील महाविकास आघाडी शासनाने जनतेची घोर फसवणूक केली आहे. लोकांना खोटी आश्वासने देऊन वेळ आल्यावर सरकारकडून ‘यू टर्न’ घेण्यात येतो. हे तर ‘पलटूराम’ सरकारच आहे, या शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडले. नागपुरात आयोजित कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

महाविकास आघाडीच्या शासनात तीन प्रमुख पक्ष आहेत. मात्र काँग्रेसच्या मंत्र्यांना कुणीच विचारत नसल्याचे चित्र आहे. शिवसेनेला तर बाळासाहेबांच्या भगव्याचा विसर पडला आहे. आता सेनेचा भगवा खरा राहिला नसून त्यात भेसळ झाली आहे. काश्मीरमध्ये चीनच्या मदतीने कलम ३७० परत आणू असे म्हणणाऱ्या, स्वातंत्र्यवीर सावरकरांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या व गुपकारांचे समर्थन करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून ते सत्तेत बसले आहेत. शिवसेना भगव्याचा अपमानच करत आहे, असे फडणवीस म्हणाले.

वीज बिलांच्या चौकशीचे सरकारचे इशारे हास्यास्पद आहेत. अगोदर म्हणाले वीज बिल माफ करू आणि आता लक्षात आलं देता येत नाही म्हणून चौकशी करू म्हणतात. त्यांना जी चौकशी करायची आहे ती करावी. सरकार आता थोबाडावर पडले आहे. चौकशीत लक्षात येईल की थकबाकी ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातील आहे.

मुंबईत भाजप स्वबळावर लढणार

दरम्यान, फडणवीस यांना मनसेशी युतीसंदर्भात विचारले असता त्यांनी मुंबईत भाजप स्वबळावरच लढणार असल्याचे स्पष्ट केले. ‘बीएमसी’च्या निवडणुकीत भाजप मनसेसोबत हातमिळावणी करू शकते, या चर्चेवर त्यांनी पडदा पाडला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस