शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
2
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
3
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
4
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
5
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
6
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
7
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
8
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
9
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
10
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

बदल्यांचा भुलभुलय्या : वरिष्ठ अधिकाऱ्यात अस्वस्थता - कुछ मेसेज है क्या ?

By admin | Updated: June 21, 2014 02:38 IST

राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सध्या सर्वत्र एकाच प्रश्नाची चर्चा आहे.

नरेश डोंगरे । नागपूरराज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सध्या सर्वत्र एकाच प्रश्नाची चर्चा आहे. तो प्रश्न म्हणजे, कुछ मेसेज है क्या? जवळपास रोजच हा प्रश्न अनेक अधिकारी आपापल्या बॅचमेटस्ना विचारत आहे. रखडलेल्या बदल्यांमुळे अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, याच अस्वस्थतेतून रोज हा प्रश्न विचारला जात आहे. पाच-सात वर्षांपूर्वीपर्यंत मार्च महिन्याच्या प्रारंभापासून पोलीस दलात बदल्यांचे वारे वाहायला सुरुवात होत होती. फायनली ३१ मेच्या आत गृहविभागातर्फे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याची यादी जाहीर केली जायची. काही वर्षांपासून बदल्यांचे ठिकाण आणि वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावावर (एसपी/ डीसीपी) शीर्षस्थ पोलीस अधिकारी आणि नेत्यांमधील मतभिन्नता वाढीस लागली. त्यामुळे बदलीसाठी ‘ट्रान्सफर अ‍ॅक्ट’च्या तरतुदीचा वापर होऊ लागला. त्यानुसार, दरवर्षी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ३१ मेपर्यंत बदल्या झाल्या नाही तर विशेष बाब म्हणून कॅबिनेटची मंजुरी घेऊन पुढे (३१ मेनंतर) १५ दिवसांच्या आत या बदल्यांची यादी जाहीर करावी लागायची. मात्र, दोन वर्षांपासून त्यालाही छेद बसला. विशिष्ट अधिकाऱ्यांसाठी लॉबिंग झाल्यामुळे २०१२ ला बदल्यांचा मोठाच घोळ झाला. परिणामी २०१२ मध्ये १३ जूनला बदल्यांची यादी जाहीर झाली. गेल्या वर्षी तर अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्याच झाल्या नाहीत. त्यात नागपूरच्याही ४ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. अर्थात गेल्या वर्षी ट्रान्सफर अ‍ॅक्टची मुदतदेखील गुंडाळली गेली. अध्यादेश निघाले अन् वरिष्ठ सूत्रांच्या मते अधिकाऱ्यांची कुचंबणा टाळण्यासाठी फेब्रुवारी २०१४ मध्ये एक अध्यादेश काढण्यात आला. त्यानुसार, एका ठिकाणी दोन वर्षे कार्य करणाऱ्या एसपी/ डीसीपी आणि त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, असे त्यात नमूद होते. मात्र, त्याला मंजुरीच मिळाली नाही. त्यानंतर दुसरा असाच अध्यादेश एप्रिल २०१४ ला निघाला. त्यालाही मंजुरी मिळाली नाही. दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे आदेश आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. मात्र, त्यात तीन वर्षांचा कालावधी गृहित धरण्यात आला.यामुळे तीन वर्षांला काही दिवस कमी असल्याने अनेक अधिकारी आहे तेथेच राहिले. त्यांच्या बदल्या निवडणुका आटोपल्यानंतर लगेच केल्या जातील, असे अपेक्षित होते. मात्र, निवडणुकांचा निकाल लागून आता महिना झाला तरीसुद्धा एसपी/डीसीपी आणि त्याउपर दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या नाही. त्यामुळे राज्यभरातील वरिष्ठ पोलीस अधिकारी अक्षरश: उद्विग्न झाले आहेत. त्यातील अनेक जण रोजच एकमेकांना प्रश्न विचारत आहे, कुछ मेसेज है क्या ?