शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील वनपर्यटन व्यवसाय वळला मध्य प्रदेशाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 11:41 IST

सुट्या आणि पर्यटन याचा संबंध कायम असला तरी यंदाच्या दिवाळीतील सुट्यांमधील वनपर्यटनाचा व्यवसाय पावसामुळे बराच अडचणीत आला.

ठळक मुद्देदिवाळीतील वनपर्यटनाला फटका ताडोबातील व्यवसाय सर्वाधिक

गोपालकृष्ण मांडवकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुट्या आणि पर्यटन याचा संबंध कायम असला तरी यंदाच्या दिवाळीतील सुट्यांमधील वनपर्यटनाचा व्यवसाय पावसामुळे बराच अडचणीत आला. नागपूरलगतचे व्याघ्र प्रकल्प पावसामुळे बाधित झाल्याने येथील ऑफलाईनचा व्यवसाय लगतच्या मध्य प्रदेशाकडे वळला. असे असले तरी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रक ल्पाने मात्र राज्यातून सर्वाधिक व्यवसाय केला.दरवर्षी १ ऑक्टोबरपासून सुरू होणारा वनपर्यटनाचा हंगाम यंदा अतिवृष्टी व खराब रस्त्यांच्या अडसराने १५ दिवस विलंबाने सुरू झाला. १६ ऑक्टोबरपासून संरक्षित वनक्षेत्रातील आणि अभयारण्यातील पर्यटन ऑफलाईन पद्धतीने सुरू होणार होते. १६ ते ३१ ऑक्टोबर या काळात उमरेड-पवनी-कºहांडला, बोर व्याघ्र प्र्रकल्प, टिपेश्वर अभयारण्य, पेंच व्याघ्र प्रकल्पातही ऑफलाईन पद्धतीने वन पर्यटन सुरू झाले. सिल्लारी गेट (पूर्व पेंच) तसेच सुरेवानी (नागलवाडी) गेटवरून वन पर्यटन बंद ठेवण्यात आले होते. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात त्यावरील पर्यटन सुरू झाले. मात्र त्यातही ऑनलाईन-ऑफलाईनचा घोळ असल्याने अनेक पर्यटकांचा हिरमोड झाला. खुर्सापार गेटवरील ऑनलाईन रद्द झालेल्या पर्यटकांना तिथेच ऑफलाईनसाठी प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे अन्य पर्यटकांनी मध्य प्रदेशातील कान्हा, बांधवगड, पेंच (बॉर्डर खवासा)चा पर्याय निवडला. परिणामत: महाराष्ट्रात येऊ पहाणारा व्यवसाय मध्य प्रदेशात गेला.नागपुरात येणाऱ्या पर्यटकांना खुर्सापार गेटचे आकर्षण अधिक असते. मात्र अधिक समस्या याच गेटवरून आल्या. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला. परिणामत: या गेटवरून दिवाळीच्या हंगामात फक्त १८ ते २० टक्के व्यवसाय मिळाला. येथील रिसॉर्टचालकांनी बरीच तयारी करून ठेवली असली तरी पर्यटकांची गर्दी कमी झाल्याने व्यवसायावर परिणाम झाल्याचे येथील रिसॉर्टचालक संदीप सिंग यांनी सांगितले.या संदर्भात वनविभागाकडे विचारणा केली असता, पेंच प्रकल्पाच्या सहा गेटपैकी सिल्लारी गेटही सुरू करण्यात आले असून तिथे पर्यटकांची गर्दी वाढल्याचे सांगण्यात आले. २९ आणि ३० ऑक्टोबरला येथे बरीच गर्दी जाणवली. पावसामुळे अनेक रिसॉर्टस्मधील बुकिंग कमी झाले. या तुलनेत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीत दररोज वाढच होत आहे. येथील ७५ टक्के रस्ते सुरू आहेत. पावसामुळे व्याघ्रदर्शन न घडल्याने या वेळी अनेकांची निराशा मात्र झाली. येथे कोअर सहा आणि बफरमध्ये नव्याने सुरू झालेले दोन मिळून १२ असे १८ गेट आहेत. सोमवारपर्यंत बहुतेक रिसॉर्ट बुक असल्याची माहिती येथील रिसॉर्टचालक निखील अभ्यंकरयांनी दिली.

गर्रा खुर्सापारने केली निराशागर्रा खुर्सापार गेटवर ४८ वाहने रजिस्टर्ड असली तरी त्यातील सध्या फक्त २१ ते २५ वाहनेच उपलब्ध आहेत. रस्ते बंद असल्याने ऑनलाईन पर्यटन रद्द झाले. ऑफलाईन वरून येणाऱ्या पर्यटकांचीही गर्दी म्हणावी तशी नसल्याने येथील पर्यटनावर बराच ताण पडला. त्याचा परिणाम स्थानिक पातळीवरही झाला. गाईड, वाहनचालक, हॉटेल्स यांचाही व्यवसाय बराच कमी झाला. ऐन दिवाळीच्या दिवसात स्थानिकांची निराशा झाली.

ताडोबात रोज दीड हजारांवर पर्यटकराज्यात सर्वात चांगली स्थिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची आहे. या व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक प्रवीण यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोअरचे सहा आणि बफरचे १२ गेट पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. पावसाचा अल्प परिणाम असला तरी पर्यटकांच्या गर्दीवर परिणाम झालेला नाही. मागील वर्षी पर्यटकांच्या प्रवेश शुल्कातून येथे ११ कोटी रुपयांचा व्यवसाय झाला होता. यावर्षीही पर्यटनाचा व्यवसाय चांगला राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.गतवर्षीपेक्षा यंदा प्रतिसाद कमी मिळाला, यामागे अतिवृष्टीने खराब झालेले रस्ते हे कारण आहे. या आठवड्यात पाऊस थांबताच सुमारे ११० किलोमीटर लांबीच्या रस्ते दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले जाईल.- अतुल देवकर, सहायक वनसंरक्षक,पेंच प्रकल्प

टॅग्स :Tigerवाघtourismपर्यटन