शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

महाराष्ट्रातील वनपर्यटन व्यवसाय वळला मध्य प्रदेशाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 11:41 IST

सुट्या आणि पर्यटन याचा संबंध कायम असला तरी यंदाच्या दिवाळीतील सुट्यांमधील वनपर्यटनाचा व्यवसाय पावसामुळे बराच अडचणीत आला.

ठळक मुद्देदिवाळीतील वनपर्यटनाला फटका ताडोबातील व्यवसाय सर्वाधिक

गोपालकृष्ण मांडवकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुट्या आणि पर्यटन याचा संबंध कायम असला तरी यंदाच्या दिवाळीतील सुट्यांमधील वनपर्यटनाचा व्यवसाय पावसामुळे बराच अडचणीत आला. नागपूरलगतचे व्याघ्र प्रकल्प पावसामुळे बाधित झाल्याने येथील ऑफलाईनचा व्यवसाय लगतच्या मध्य प्रदेशाकडे वळला. असे असले तरी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रक ल्पाने मात्र राज्यातून सर्वाधिक व्यवसाय केला.दरवर्षी १ ऑक्टोबरपासून सुरू होणारा वनपर्यटनाचा हंगाम यंदा अतिवृष्टी व खराब रस्त्यांच्या अडसराने १५ दिवस विलंबाने सुरू झाला. १६ ऑक्टोबरपासून संरक्षित वनक्षेत्रातील आणि अभयारण्यातील पर्यटन ऑफलाईन पद्धतीने सुरू होणार होते. १६ ते ३१ ऑक्टोबर या काळात उमरेड-पवनी-कºहांडला, बोर व्याघ्र प्र्रकल्प, टिपेश्वर अभयारण्य, पेंच व्याघ्र प्रकल्पातही ऑफलाईन पद्धतीने वन पर्यटन सुरू झाले. सिल्लारी गेट (पूर्व पेंच) तसेच सुरेवानी (नागलवाडी) गेटवरून वन पर्यटन बंद ठेवण्यात आले होते. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात त्यावरील पर्यटन सुरू झाले. मात्र त्यातही ऑनलाईन-ऑफलाईनचा घोळ असल्याने अनेक पर्यटकांचा हिरमोड झाला. खुर्सापार गेटवरील ऑनलाईन रद्द झालेल्या पर्यटकांना तिथेच ऑफलाईनसाठी प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे अन्य पर्यटकांनी मध्य प्रदेशातील कान्हा, बांधवगड, पेंच (बॉर्डर खवासा)चा पर्याय निवडला. परिणामत: महाराष्ट्रात येऊ पहाणारा व्यवसाय मध्य प्रदेशात गेला.नागपुरात येणाऱ्या पर्यटकांना खुर्सापार गेटचे आकर्षण अधिक असते. मात्र अधिक समस्या याच गेटवरून आल्या. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला. परिणामत: या गेटवरून दिवाळीच्या हंगामात फक्त १८ ते २० टक्के व्यवसाय मिळाला. येथील रिसॉर्टचालकांनी बरीच तयारी करून ठेवली असली तरी पर्यटकांची गर्दी कमी झाल्याने व्यवसायावर परिणाम झाल्याचे येथील रिसॉर्टचालक संदीप सिंग यांनी सांगितले.या संदर्भात वनविभागाकडे विचारणा केली असता, पेंच प्रकल्पाच्या सहा गेटपैकी सिल्लारी गेटही सुरू करण्यात आले असून तिथे पर्यटकांची गर्दी वाढल्याचे सांगण्यात आले. २९ आणि ३० ऑक्टोबरला येथे बरीच गर्दी जाणवली. पावसामुळे अनेक रिसॉर्टस्मधील बुकिंग कमी झाले. या तुलनेत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीत दररोज वाढच होत आहे. येथील ७५ टक्के रस्ते सुरू आहेत. पावसामुळे व्याघ्रदर्शन न घडल्याने या वेळी अनेकांची निराशा मात्र झाली. येथे कोअर सहा आणि बफरमध्ये नव्याने सुरू झालेले दोन मिळून १२ असे १८ गेट आहेत. सोमवारपर्यंत बहुतेक रिसॉर्ट बुक असल्याची माहिती येथील रिसॉर्टचालक निखील अभ्यंकरयांनी दिली.

गर्रा खुर्सापारने केली निराशागर्रा खुर्सापार गेटवर ४८ वाहने रजिस्टर्ड असली तरी त्यातील सध्या फक्त २१ ते २५ वाहनेच उपलब्ध आहेत. रस्ते बंद असल्याने ऑनलाईन पर्यटन रद्द झाले. ऑफलाईन वरून येणाऱ्या पर्यटकांचीही गर्दी म्हणावी तशी नसल्याने येथील पर्यटनावर बराच ताण पडला. त्याचा परिणाम स्थानिक पातळीवरही झाला. गाईड, वाहनचालक, हॉटेल्स यांचाही व्यवसाय बराच कमी झाला. ऐन दिवाळीच्या दिवसात स्थानिकांची निराशा झाली.

ताडोबात रोज दीड हजारांवर पर्यटकराज्यात सर्वात चांगली स्थिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची आहे. या व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक प्रवीण यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोअरचे सहा आणि बफरचे १२ गेट पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. पावसाचा अल्प परिणाम असला तरी पर्यटकांच्या गर्दीवर परिणाम झालेला नाही. मागील वर्षी पर्यटकांच्या प्रवेश शुल्कातून येथे ११ कोटी रुपयांचा व्यवसाय झाला होता. यावर्षीही पर्यटनाचा व्यवसाय चांगला राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.गतवर्षीपेक्षा यंदा प्रतिसाद कमी मिळाला, यामागे अतिवृष्टीने खराब झालेले रस्ते हे कारण आहे. या आठवड्यात पाऊस थांबताच सुमारे ११० किलोमीटर लांबीच्या रस्ते दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले जाईल.- अतुल देवकर, सहायक वनसंरक्षक,पेंच प्रकल्प

टॅग्स :Tigerवाघtourismपर्यटन