शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांचा वारसा अन् विद्युलतेचा वेग

By admin | Updated: September 30, 2016 03:21 IST

भारतीय लष्कराने बुधवारी रात्री नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवादी तळांवर हल्ले केले. ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या माध्यमातून हे हल्ले झाले.

शत्रूच्या वर्मावर हल्ला करणारा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : कमी काळात शत्रूचे जास्तीत जास्त नुकसान करण्यावर असतो भरयोगेश पांडे   नागपूर भारतीय लष्कराने बुधवारी रात्री नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवादी तळांवर हल्ले केले. ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या माध्यमातून हे हल्ले झाले. साधारणत: प्रगत देशांतर्फे युद्धाची ही प्रणाली वापरण्यात येते असा समज आहे. परंतु युद्धाची ही प्रणाली भारतीयांसाठी अजिबात नवीन नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर केलेला हल्ला हा एक प्रकारचा ‘सर्जिकल स्ट्राईक’च होता. आधुनिक युद्धकौशल्यातील हा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. शत्रूच्या तळात विद्युलत्तेच्या वेगाने प्रवेश करायचा आणि कमी वेळात जास्तीत जास्त नुकसान होईल याप्रकारे हल्ला करायचा अशी ही प्रणाली असून जास्तीत जास्त अर्धा तासात ही मोहीम आटोपती घ्यावी लागते.यासंदर्भात ‘लोकमत’ने भारतीय सैन्यदलातून ‘कमांडो’चे प्रशिक्षण घेतलेले व विविध मोहिमांमध्ये सहभागी झालेले निवृत्त कर्नल सुनील देशपांडे यांच्याकडून ‘सर्जिकल स्ट्राईक’बाबत जाणून घेतले. शत्रूवर हल्ला करा, त्याला संपवा व परत फिरा, अशी या हल्ल्याची संकल्पना आहे. ‘सर्जिकल स्ट्राईक’ची संकल्पना आपल्या देशात अगोदरपासून वापरली जाते. शिवाजी महाराजांनी लाल महालात बेसावध असलेल्या शाहिस्तेखानावर हल्ला केला होता. या हल्ल्यात मुघलांचे नुकसान झाले होते. हे या युद्धप्रणालीचे सर्वात चांगले उदाहरण म्हणता येईल, असे कर्नल देशपांडे यांनी सांगितले.जास्तीत जास्त अर्धा तास चालते मोहीम‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब असते ती शत्रूच्या तळांची अचूक माहिती. ही माहिती मिळाल्यानंतर या मोहिमेचे नियोजन केले जाते. आजच्या काळात दोन प्रकारे ‘सर्जिकल स्ट्राईक’ केले जाऊ शकतात. जमिनीवरूनच शत्रूच्या क्षेत्रात प्रवेश करायचा आणि प्रचंड वेगाने त्यांच्या तळावर हल्ला करायचा. दुसरा प्रकार असतो हवाईमार्गाने शत्रूच्या क्षेत्रात प्रवेश करायचा. ‘चॉपर’ तळापासून सुरक्षित अंतरावर उतरवायचे आणि तेथून विजेच्या गतीने शत्रूच्या तळावर हल्लाबोल करायचा. म्यानमारमध्ये झालेल्या मोहिमेत भारतीय सैन्याने दुसऱ्या प्रकाराचा उपयोग केला होता. ‘सर्जिकल स्ट्राईक’ हा कमी कालावधीचा हल्ला असतो. जास्तीत जास्त अर्धा तास ही मोहीम चालू शकते. त्याहून अधिक वेळ थांबल्यास हल्ला करणाऱ्यांचे नुकसान होऊ शकते.‘स्ट्राईक’साठी योग्य नियोजन आवश्यकप्रचंड वेगाने शत्रूच्या छावणीत प्रवेश करणे, कमी काळात जास्तीत जास्त नुकसान कसे होईल यादृष्टीने हल्ला करणे व जवळील सर्व शस्त्रांचा उपयोग करून विजेच्या गतीने परत जाणे ही ‘सर्जिकल स्ट्राईक’ची विशेषता असते. अशा हल्ल्यामुळे शत्रूला सावरायला वेळ मिळत नाही. ‘सर्जिकल स्ट्राईक’ अगोदर नियोजन आवश्यक असते. आत शिरण्याचा मार्ग व बाहेर पडण्याचा मार्ग अगोदरच ठरवून ठेवावे लागतात, असे कर्नल देशपांडे यांनी स्पष्ट केले.