शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

भापकरांचा अधिकाऱ्यांवर भडका

By admin | Updated: January 23, 2016 02:58 IST

शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाचा आढावा घेण्यासाठी शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी नागपुरात शिक्षण अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

नागपूरपेक्षा गडचिरोलीचे काम उत्तम : एकही मुलगा शाळाबाह्य रहायला नकोनागपूर : शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाचा आढावा घेण्यासाठी शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी नागपुरात शिक्षण अधिकाऱ्यांची बैठक घेतली. १५ जानेवारीपासून राज्यात शाळाबाह्य मुलांचा सर्वे सुरू झाला आहे. परंतु सर्वेक्षणाची आकडेवारी १०-२० च्यावर वाढत नसल्याचे बघितल्यावर भापकरांचा अधिकाऱ्यांवर चांगलाच भडका उडाला. शिक्षण उपसंचालकासह, शिक्षण अधिकाऱ्यांना झोपा काय काढता, काम करा काम, असा दम त्यांनी दिला. यावेळी शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांच्यासह शिक्षण अधिकारीही बैठकीत उपस्थित होते. गेल्या चार दिवसांपासून भापकर हे गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते. त्यांनी गडचिरोलीतील शाळांची स्थिती, शिक्षणाची अवस्था, वसतिगृहांना, आश्रम शाळांना भेटी दिल्या. गडचिरोलीचा दौरा आटोपून त्यांनी शुक्रवारी नागपुरात शाळाबाह्य मुलांच्या संदर्भात सुरू असलेल्या सर्वेक्षणाची आढावा बैठक घेतली. बैठकीत शिक्षण अधिकाऱ्यांना किती मुलांचा शोध घेतला, हंगामी वसतिगृहाची अवस्था काय, एज्युकेशन गॅरंटी कार्ड कुणाला दिले यासंदर्भात विचारणा केली असता अधिकाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर न मिळाल्याने, ते चांगलेच संतापले. नागपुरात शिक्षण उपसंचालक असतांनाही नागपूरचे काम अतिशय सुस्त असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. नागपूरपेक्षा गडचिरोली तरी उत्तम असल्याचा टोला त्यांनी अधिकाऱ्यांना लगावला. दररोज झालेल्या सर्वेक्षणाची आकडेवारी माझ्याकडे पाठविण्याचा आदेश त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना दिला. यावेळी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शासनाने राबविलेल्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरण राबविले आहे. राज्यात शाळेत जाणारा एकही विद्यार्थी अप्रगत राहणार नाही, यासाठी वर्षभरात ३ बेसलाईन चाचणी घेण्यात येत असल्याबद्दल त्यांनी सांगितले. सरलच्या माध्यमातून २.२५ कोटी शालेय विद्यार्थ्यांची नोंद संगणकात झाली आहे. याचा फायदा प्रगत शैक्षणिक धोरण राबविण्यात होणार असल्याचे ते म्हणाले. विद्यार्थ्यांची गुणवत्ता आॅनलाईन तपासण्यात येणार आहे. त्याचबरोबर शिक्षणाचाही आढावा सरलच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. १५ जानेवारीपासून शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण सुरू झाले असून, यासाठी ७० एनएसएसचे समन्वयक व साडेतीन लाख विद्यार्थी महाराष्ट्रात सर्वे करणार आहे. जिल्हास्तरावर माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात समिती गठित करून सर्वेक्षण करायचे आहे. मुलांचे स्थलांतरण रोखणे, शिक्षण हमी कार्ड देणे यासाठी ४६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)