शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या हाती ‘सॉईल हेल्थ कार्ड’

By admin | Updated: May 30, 2017 01:54 IST

आज माणसाच्या आरोग्याप्रमाणेच शेतकऱ्यांच्या जमिनीच्या आरोग्याचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

पहिला टप्पा पूर्ण : १ लाख ९० हजार शेतकऱ्यांना मिळाले कार्ड जीवन रामावत । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आज माणसाच्या आरोग्याप्रमाणेच शेतकऱ्यांच्या जमिनीच्या आरोग्याचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रासायनिक खते, जहाल विषारी औषधे आणि पाण्याच्या अतिवापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडले आहे. जमीन निकस होऊ लागली आहे. शेतकऱ्यांची या संकटातून सुटका करण्यासाठी केंद्र शासनातर्फे मागील तीन वर्षांपासून ‘जमीन आरोग्य पत्रिका’ (सॉईल हेल्थ कार्ड) अभियान राबविले जात आहे. या अभियानात जिल्ह्यातील एकूण २ लाख ६८ हजार खातेधारक शेतकऱ्यांपैकी तब्बल १ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या हातात त्यांच्या जमिनीच्या आरोग्य पत्रिका (सॉईल हेल्थ कार्ड) देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या अभियानाचा नुकताच पहिला टप्प्पा पूर्ण झाला आहे. या पहिल्या टप्प्यात २०१५-१६ मध्ये ८२४ गावांतील एकूण २६ हजार ४६ शेतकऱ्यांना आरोग्य पत्रिका वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार वर्षअखेरीस ४३ हजार ९५६ आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले. यानंतर २०१६-१७ या दुसऱ्या वर्षी ५२ हजार ९१ आरोग्य पत्रिकांचे उद्दिष्ट होते, त्यानुसार ५१ हजार ६६ आरोग्य पत्रिका वाटप करण्यात आल्या आहेत. आता २०१७-१८ पासून या मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालयाने या दुसऱ्या टप्प्यात वाटप करण्यात येणाऱ्या आरोग्य पत्रिकांचे नियोजन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात एकूण १८९९ गावे असून, त्यापैकी पहिल्या वर्षासाठी ९४९ गावांची निवड करण्यात आली आहे. या सर्व गावातील एकूण १ लाख ३४ हजार २०० शेतकऱ्यांना पुन्हा ‘आरोग्य पत्रिका’ वाटप केल्या जाणार आहेत. शिवाय पुढील वर्षी उर्वरित शेतकऱ्यांना आरोग्य पत्रिका देण्यात येईल. अशाप्रकारे येत्या २०२१ पर्यंत तिन्ही टप्पे पूर्ण करण्यात येणार आहे. यानंतर तिन्ही टप्प्यातील शेतकऱ्यांच्या आरोग्य पत्रिकांचे सूक्ष्म अध्ययन करून जमिनीत कोणती सुधारणा झाली की बिघाड झाला, याचा निष्कर्ष काढला जाणार आहे. अलीकडे जिल्ह्यातील शेतकरी हा आपल्या जमिनीच्या आरोग्यासंबंधी प्रचंड सजग झाला आहे. अनेक शेतकरी स्वत:हून जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालयातून माती परीक्षण करून घेत आहेत. त्याचा चांगला परिणामसुद्धा दिसू लागला आहे. शेतकरी जागृत झाला पूर्वी जिल्ह्यातील शेतकरी माती परीक्षणासाठी फारसा उत्सुक दिसून येत नव्हता. मात्र मागील दोन-तीन वर्षांत प्रचंड बदल झाला आहे. आज शेतकरी हा जागृत झाला असून, तो स्वत: माती परीक्षणासाठी पुढे येत आहे. हे चांगले संकेत आहे. मागील दोन वर्षांत आम्ही जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या हाती त्याच्या जमिनीची ‘आरोग्य पत्रिका’ पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात आम्हाला यशही मिळाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली असून, यात एकूण ७४,८२६ मातीचे नमुने परीक्षण केले जाणार आहे. त्यापैकी मागील एप्रिल आणि मे महिन्यात प्रत्येकी ११,२२४ नमुन्यांचे परीक्षण करण्यात आले आहेत. तसेच पुढील जून आणि जुलै महिन्यात प्रत्येकी ७,४८३ नमुन्यांचे परीक्षण केले जाणार आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेत, आपल्या शेतातील मातीचे नि:शुल्क परीक्षण करून घ्यावे. अर्चना कोचरे, जिल्हा मृद सर्र्वेक्षण अधिकारी.