शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
3
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
4
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
5
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
6
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
7
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
8
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
9
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
10
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
11
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
12
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
13
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
14
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
15
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
16
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
17
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
18
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
19
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
20
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?

शेतकऱ्यांच्या हाती ‘सॉईल हेल्थ कार्ड’

By admin | Updated: May 30, 2017 01:54 IST

आज माणसाच्या आरोग्याप्रमाणेच शेतकऱ्यांच्या जमिनीच्या आरोग्याचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

पहिला टप्पा पूर्ण : १ लाख ९० हजार शेतकऱ्यांना मिळाले कार्ड जीवन रामावत । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आज माणसाच्या आरोग्याप्रमाणेच शेतकऱ्यांच्या जमिनीच्या आरोग्याचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रासायनिक खते, जहाल विषारी औषधे आणि पाण्याच्या अतिवापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडले आहे. जमीन निकस होऊ लागली आहे. शेतकऱ्यांची या संकटातून सुटका करण्यासाठी केंद्र शासनातर्फे मागील तीन वर्षांपासून ‘जमीन आरोग्य पत्रिका’ (सॉईल हेल्थ कार्ड) अभियान राबविले जात आहे. या अभियानात जिल्ह्यातील एकूण २ लाख ६८ हजार खातेधारक शेतकऱ्यांपैकी तब्बल १ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या हातात त्यांच्या जमिनीच्या आरोग्य पत्रिका (सॉईल हेल्थ कार्ड) देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या अभियानाचा नुकताच पहिला टप्प्पा पूर्ण झाला आहे. या पहिल्या टप्प्यात २०१५-१६ मध्ये ८२४ गावांतील एकूण २६ हजार ४६ शेतकऱ्यांना आरोग्य पत्रिका वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार वर्षअखेरीस ४३ हजार ९५६ आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले. यानंतर २०१६-१७ या दुसऱ्या वर्षी ५२ हजार ९१ आरोग्य पत्रिकांचे उद्दिष्ट होते, त्यानुसार ५१ हजार ६६ आरोग्य पत्रिका वाटप करण्यात आल्या आहेत. आता २०१७-१८ पासून या मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालयाने या दुसऱ्या टप्प्यात वाटप करण्यात येणाऱ्या आरोग्य पत्रिकांचे नियोजन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात एकूण १८९९ गावे असून, त्यापैकी पहिल्या वर्षासाठी ९४९ गावांची निवड करण्यात आली आहे. या सर्व गावातील एकूण १ लाख ३४ हजार २०० शेतकऱ्यांना पुन्हा ‘आरोग्य पत्रिका’ वाटप केल्या जाणार आहेत. शिवाय पुढील वर्षी उर्वरित शेतकऱ्यांना आरोग्य पत्रिका देण्यात येईल. अशाप्रकारे येत्या २०२१ पर्यंत तिन्ही टप्पे पूर्ण करण्यात येणार आहे. यानंतर तिन्ही टप्प्यातील शेतकऱ्यांच्या आरोग्य पत्रिकांचे सूक्ष्म अध्ययन करून जमिनीत कोणती सुधारणा झाली की बिघाड झाला, याचा निष्कर्ष काढला जाणार आहे. अलीकडे जिल्ह्यातील शेतकरी हा आपल्या जमिनीच्या आरोग्यासंबंधी प्रचंड सजग झाला आहे. अनेक शेतकरी स्वत:हून जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालयातून माती परीक्षण करून घेत आहेत. त्याचा चांगला परिणामसुद्धा दिसू लागला आहे. शेतकरी जागृत झाला पूर्वी जिल्ह्यातील शेतकरी माती परीक्षणासाठी फारसा उत्सुक दिसून येत नव्हता. मात्र मागील दोन-तीन वर्षांत प्रचंड बदल झाला आहे. आज शेतकरी हा जागृत झाला असून, तो स्वत: माती परीक्षणासाठी पुढे येत आहे. हे चांगले संकेत आहे. मागील दोन वर्षांत आम्ही जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या हाती त्याच्या जमिनीची ‘आरोग्य पत्रिका’ पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात आम्हाला यशही मिळाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली असून, यात एकूण ७४,८२६ मातीचे नमुने परीक्षण केले जाणार आहे. त्यापैकी मागील एप्रिल आणि मे महिन्यात प्रत्येकी ११,२२४ नमुन्यांचे परीक्षण करण्यात आले आहेत. तसेच पुढील जून आणि जुलै महिन्यात प्रत्येकी ७,४८३ नमुन्यांचे परीक्षण केले जाणार आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेत, आपल्या शेतातील मातीचे नि:शुल्क परीक्षण करून घ्यावे. अर्चना कोचरे, जिल्हा मृद सर्र्वेक्षण अधिकारी.