शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

पूल छोटा, धोका मोठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:07 IST

कमी उंचीचे पूल ठरताहेत धोकादायक विजय नागपुरे कळमेश्वर : कमी उंचीच्या पुलावर पाण्याचा अंदाज न आल्याने कळमेश्वर तालुक्यातील गोवरी ...

कमी उंचीचे पूल ठरताहेत धोकादायक

विजय नागपुरे

कळमेश्वर : कमी उंचीच्या पुलावर पाण्याचा अंदाज न आल्याने कळमेश्वर तालुक्यातील गोवरी पुलावर वाहून गेलेल्या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे जीवघेणे ठरत असलेल्या तालुक्यातील पुलांची उंची वाढविण्याच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील कमी उंचीच्या पुलांचा घेतलेला हा आढावा.

---

ग्रामीण भागात गावांना जोडणारा सेतू म्हणजे मार्गातील पूल. मात्र कळमेश्वर तालुक्यातील बहुतांशी पूल पावसाळ्याच्या दिवसांत पाण्याखाली जात असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटतो. यात कमी उंचीचे पूल ग्रामस्थांसाठी डोकेदुखी ठरत आहे. संततधार पावसामुळे पूर येऊन पुलावरून नेहमी पाणी वाहते. त्यामुळे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. तालुक्यातील पुलांची उंची वाढविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. मात्र लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे या समस्यांची दखल घेतली नाही. गोवरी येथील शेतकरी अन्नाजी निंबाळकर व प्रवीण शिंदे यांचा दि. ८ जुलैला कळमेश्वर (गावरी)जवळील पुलावर आलेल्या पुरात वाहून मृत्यू झाला. त्यामुळे पुलांची उंची वाढविण्यासाठी अजून किती नागरिकांचा बळी द्यावा लागणार, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. तालुक्यात १०६ गावांचा समावेश आहे. या गावांना रस्त्यांच्या माध्यमातून कळमेश्वर या तालुक्याच्या ठिकाणाला जोडले गेले आहे. या मार्गात येणाऱ्या नदीनाल्यांवर संबंधित विभागाकडून पूल बांधण्यात आले. मात्र हे पूल रस्त्यांच्या उंचीपेक्षा कमी उंचीचे असल्याने पावसाळ्यात नेहमी पाण्याखाली येतात. कळमेश्वर ते उपरवाही, निंबोली ते उपरवाही, उपरवाही ते खैरी (हर्जी), दहेगाव ते खडगाव, गोवरी ते सिंदी, सुसुंद्री ते वाठोडा, वरोडा शिवारातील शेतात जाणारा पूल, सोनेगाव ते पोही, आदी मार्गावर कमी उंचीचे पूल बांधण्यात आले आहेत. यामुळे पावसाळ्यात संततधार पाऊस झाल्यास या गावांचा तालुक्यासोबत नेहमी संपर्क तुटतो. शिवाय कळमेश्वर तालुक्याचे ठिकाण असल्याने बँक, तहसील कार्यालय, पंचायत समिती, दवाखाने, आठवडी बाजार, आदी कामांसाठी येथे वारंवार ये-जा करावी लागते. मात्र पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असल्याने त्यांना पूर ओसरण्याची प्रतीक्षा करावी लागते. अनेकदा संततधार पावसात नागरिकांना अडकून पडावे लागते. विद्यार्थ्यांनाही शाळेला सुट्टी मारावी लागते. या व्यतिरिक्त प्रवासी वाहनांची वाहतूक प्रभावित होते. या समस्यांची दखल घेत तालुक्यातील पुलांची उंची वाढविण्याची मागणी खैरी (लखमा) चे सरपंच सचिन निंबाळकर, उपसरपंच देवराव काळे, पंकज झोड, राहुल निंबाळकर, उपरवाहीचे सरपंच चंद्रप्रकाश साठवने, सावंगीचे माजी सरपंच संजय तभाने, लोणाराच्या सरपंच सरला दुपारे, उपसरपंच साहेबराव डेहणकर, देवेंद्र पन्नासे, वरोड्याचे सरपंच दिलीप डाखोळे, उपसरपंच नरेश काकडे, अंकित राऊत, ग्रामपंचायत मोहगावचे सदस्य प्रशांत मडावी, मनसेचे तालुकाध्यक्ष स्वप्निल चौधरी, प्रहारचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत अतकरी, आदींनी केली आहे.

दहा गावांचा तुटतो संपर्क

कळमेश्वर-गोवरी मार्गावर असलेल्या पुलाची उंची खूपच कमी असल्याने दोन-तीन तास जरी संततधार पाऊस झाला तरी या पुलावरून नेहमी पाणी वाहत असते. अशा वेळी कळमेश्वरसह तोंडाखैरी, बेल्लोरी, बोरगाव (खुर्द), गोवरी, वलनी, पारडी, खंडाळा, खैरी (लखमा), आदी आठ ते दहा गावांचा संपर्क तुटतो. पुरामुळे ही गावे प्रभावित होत असून, जनजीवन विस्कळीत होते. या सर्व गावांतील नागरिकांचा कळमेश्वर शहराशी सतत संपर्क येतो. या समस्येबाबत ग्रामस्थांनी अनेकदा स्थानिक लोकप्रतिनिधींजवळ तक्रारी केल्या; परंतु अद्यापही त्यावर तोडगा निघाला नसल्याने ग्रामस्थांत रोष निर्माण होत आहे.

किमान कचरा साफ करा

कमी उंचीच्या पुलाखालील घाण व कचरा किमान पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करणे गरजेचे आहे. मात्र त्याकडेही संबंधित विभागाचे दुर्लक्ष असते. सध्या पावसाळा सुरू असतानाही अनेक पुलांखाली मोठ्या प्रमाणात कचरा व घाण साचली आहे. त्यामुळे नदीनाल्यांवरील पाण्याचा प्रवाह थांबतो. याचा पुलांच्या मजबुतीवर परिणाम होत आहे. वरोडा-घोराड मार्गालगत असलेल्या नाल्यावर शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांनी लोकसहभागातून पूल बांधला आहे. या पुलावरून परिसरातील शेतकरी वहिवाट करतात; परंतु पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पूल पाण्याखाली येतो.