शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

शायनिंग नागपूर

By admin | Updated: December 20, 2014 02:27 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या विकासाबाबत विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्याच्या दिशेने आश्वासक आणि दमदार पावले टाकली असून

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या विकासाबाबत विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्याच्या दिशेने आश्वासक आणि दमदार पावले टाकली असून आज त्यांनी विधिमंडळात नागपूरच्या विकासाबाबत विविध कल्याणकारी योजना व प्रकल्पांचा अक्षरश: पाऊस पाडला. मुख्यमंत्र्यांच्या या शायनिंग नागपूरच्या घोषणेने सर्वपक्षीय आमदारही सुखावले. नागपूर विकास प्राधिकरण नागपूर सुधार प्रन्यास कायम ठेवत महानगर क्षेत्राच्या विकासासाठी प्राधिकरण करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. या अंतर्गत नासुप्रला वाढीव वित्तीय अधिकार दिले जाणार आहेत. यामुळे महापालिकेच्या हद्दीबाहेरील क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास होईल. सुविधायुक्त नवे नागपूर वसविण्यास मदत होईल. यातून नागपूरवरील शहरीकरणाचा भार कमी होईल. गृहनिर्माण प्रकल्पांना चालना मिळून नागरिकांना शहरालगत कमी दरात घर उपलब्ध होईल. पाच किलोमीटरवर उद्योग नागपूर शहरापासून पाच किलोमीटरनंतर उद्योग उभारणीला मंजुरी दिली जाईल. आधी ही अट २० किलोमीटरची होती. यामुळे शहराच्या हद्दीपासून दूरवर उद्योग उभारले जात होते. या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना प्रवासावर अधिक खर्च करावा लागत होता. आता त्याची बचत होईल. शहरालगत उद्योग उभारल्या गेल्यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील. नोगा फॅक्टरी बुटीबोरीलासध्या हिंगणा औद्योगिक वसाहतीत असलेली नोगा ही फळप्रक्रिया फॅक्टरी बुटीबोरीला हलवून तिचा विस्तार करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची सध्याची तीन हजार टन क्षमता पाच हजार टनांपर्यंत नेली जाईल. यामुळे येथील फलोत्पादनाला चालना मिळेल. शिवाय फळांना चांगले दर मिळण्यासही मदत होईल. गोरेवाडा येथे रेस्क्यू सेंटरगोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात तातडीने रेस्क्यू सेंटरचे काम सुरू केले जाईल. यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रेस्क्यु सेंटरमुळे वन्यजीवांवर तातडीने उपचार होतील. यातून वन्यजीव संवर्धन होईल. यातून वन पर्यटनाला चालना मिळेल व रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. नागपूर परिसरात बुद्धिस्ट सर्किटनागपूर व परिसरात बुद्धिस्ट सर्किटची उभारणी करण्यासाठी आराखडा तयार करण्याची घोषणा करण्यात आली. नागपूर परिसरात दीक्षाभूमी, चिचोली, कामठी येथील ड्रॅगन पॅलेस, नागलोक, मनसर येथे उत्खननात सापडलेले बौद्धस्तूप, महाबोधी महाविहार, पवनी येथील स्तूप आदी बौद्धस्थळे आहेत. येथे जगभरातील बौद्ध बांधव येतात. या सर्व ठिकाणांचा एकत्रित विचार करून ‘बुद्धिस्ट सर्किट’ तयार केले गेले तर याचा धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने मोठा उपयोग होईल. यामुळे पर्यटकांना या स्थळांपर्यंत सहज पोहचता येईल व यातून स्थानिकांना रोजगार मिळेल. एम्ससाठी जमीन नागपुरात एम्स स्थापन करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यासाठी आता राज्य सरकार जागा उपलब्ध करून देणार आहे. यामुळे प्रत्यक्षात एम्सच्या कामाला गती मिळेल. या प्रकल्पामुळे दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतील व वैद्यकीय संशोधनास चालना मिळेल. सीएम विथ कमिटमेंटमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात असलेली विदर्भ आणि नागपूरच्या विकासाची तळमळ आज क्षणोक्षणी जाणवत होती. फडणवीस विरोधी पक्षात असताना सातत्याने नागपूरच्या विकासाबाबत विविध कल्पना मांडायचे. मुख्यमंत्री झल्यावर ते विकासाबाबत विविध व्यासपीठावरून आश्वासन द्यायचे. परंतु एवढ्या अल्पावधीत या कल्याणकारी योजना वेगाने पुढे नेतील, असे विरोधकांनाही वाटले नव्हते. आज विधिमंडळ परिसरात विविध पक्षीय नेते व पत्रकारांमध्ये ‘सीएम विथ कमिटमेंट’ हीच सकारात्मक चर्चा होती. काटोलचे संत्रा प्रक्रिया केंद्र सुरू करणारकाटोलमधील बंद संत्रा प्रक्रिया केंद्र पुन्हा सुरू केले जाईल. त्यासाठी न्यायालयाबाहेर तडजोडीसाठी सरकार पुढाकार घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यामुळे काटोल, नरखेड, कळमेश्वर या भागातील संत्र्यावर प्रक्रिया केली जाईल. संत्रा उत्पादकांना संत्रा विक्रीसाठी व्यापाऱ्यांवर अवलंबून रहावे लागणार नाही. चांगले दर मिळतील. टर्मिनल मार्केटचे काम वर्षभरात सुरू नागपूर येथे टर्मिनल मार्केटसाठी १०० एकर जागा संपादित केली असून एक वर्षाच्या आत तेथे पीपीपी तत्त्वावर विकासक नेमून बांधकाम सुरू केले जाईल. यामुळे भविष्यात नागपूरच्या परिसरात व्यापारी उलाढालीला एक मोठे केंद्र उपलब्ध होईल. यातून शेतकऱ्याचा मालासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल. ट्रिपल आयटीसाठी जमीन राज्य सरकार नागपुरात ट्रिपल आयटी व एम्ससाठी जमीन उपलब्ध करून देणार आहे. नागपुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नाही. ट्रिपल आयटीमुळे अभियांत्रिकी शिक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार संस्था उपलब्ध होईल. येथेच कुशल अभियंते तयार होणार असल्यामुळे कंपन्याही मिहानकडे आकर्षित होतील. रोजगाराच्या संधी वाढतील.