शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

मिहानमध्ये सात कंपन्यांचे प्रस्ताव थंडबस्त्यात

By admin | Updated: October 7, 2015 03:31 IST

शासनाच्या प्रशासकीय बदल्यानंतर मिहान-सेझचा विकास करणाऱ्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) उपाध्यक्ष ...

एमडी सव्वा महिन्यापासून रजेवर : विकास कसा होणार?नागपूर : शासनाच्या प्रशासकीय बदल्यानंतर मिहान-सेझचा विकास करणाऱ्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी विश्वास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. पण नियुक्तीपासूनच (१ सप्टेंबर) ते रजेवर गेल्यामुळे कंपनी सुरू करण्याच्या प्रतीक्षेत असलेले सात उद्योजकांचे प्रस्ताव पडून आहेत. त्यामुळे मिहानचा विकास कसा होणार, असा गंभीर प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे. (प्रतिनिधी)‘एमएडीसी’चे कार्यालय नागपूरला हलवाप्रकल्प नागपुरात, पण मुख्यालय मुंबईत असल्यामुळे अनेक कंपन्यांचे प्रस्ताव वेळेत निकाली निघत नाहीत, अशी ओरड आहे. त्यामुळे एखादा उद्योजक तातडीने उद्योग सुरू करण्यास उत्सुक असेल तर त्याच्या नियोजनावर विरजण पडते. मुख्यालय नागपुरात असल्यास मंजुरीची प्रकरणे प्रलंबित राहणार नाहीत, शिवाय छोट्या छोट्या कामांसाठी मुंबईला जावे लागणार नाही. निर्णयकर्ता नागपुरात राहिल्याने मिहान-सेझमध्ये अनावश्यक पडून असलेल्या जागांचा निपटारा तातडीने होईल, असे मत गुंतवणूकदारांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. याकडे एमएडीसीचे अध्यक्ष खुद्द मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांनी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही याप्रकरणी जातीने लक्ष घालावे, अशी मागणीही गुंतवणूकदारांनी केली आहे. रोजगार कसा मिळणार?मिहानमध्ये कंपन्या येत नाहीत, अशा बोंबा मारणाऱ्या नेत्यांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर वचक नसल्यामुळे विदर्भात कुणीही अधिकारी येण्यास तयार नाहीत, याची प्रचिती विश्वास पाटील यांच्यामुळे आली आहे. मिहान-सेझचा सर्व कारभार विस्कळीत झाला आहे. पूर्वीचे उपाध्यक्ष व एमडी तानाजी सत्रे यांच्या काळात दोन महिने आणि आता सव्वा महिना असे एकूण सव्वातीन महिने विविध कंपन्यांचे प्रस्ताव पडून आहेत. उद्योग उभारू पाहणाऱ्या कंपन्यांचे अधिकारी दिवसाआड मिहानच्या कार्यालयाला भेट देत आहेत किंवा दूरध्वनीवर विचारपूस करीत आहेत. कंपन्या मोठ्या नाहीत, पण प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या हजार लोकांना रोजगार मिळेल, असा या कंपन्यांचा व्याप आहेत. ‘राईट्स’सह हरीपॅकला हवी जागापॅकिंग बॉक्स तयार करणाऱ्या नागपुरातील सुमीत ट्रेडिंग कंपनीला एक एकर जागा हवी आहे. या कंपनीचा प्रस्ताव फेब्रुवारीपासून पडून आहे. हर्बल वाईन उत्पादने तयार करणाऱ्या ज्युनिअर अभिषेक हर्बल्स प्रा.लि. कंपनीलासुद्धा एक एकर जागा हवी आहे. या कंपनीला युरोपमधून कंत्राट मिळाला आहे. आयटी कंपनी मुरोदिया कन्सलटन्सी प्रा.लि.ला २.५ एकर जागा, रेल्वेची कंपनी राईट्स लि.ला ६.५ एकर जागा, एचडीपीई पाईप तयार करणाऱ्या हरीपॅक एक्ट्रूशन्स (व्ही) प्रा.लि.ला ५ एकर जागा, फूड प्रोसेसिंगसाठी प्रफुल्ला फूड प्रा.लि.ला १.५ एकर जागा तसेच जयका इन्शुरन्सला मध्यवर्ती सुविधा इमारतीत (सीएफबी) ३५० चौरस फूट जागा हवी आहे. उपरोक्त सात कंपन्यांचे प्रस्ताव कित्येक महिन्यांपासून पडून आहेत. छोटी-छोटी कामेही मुंबई कार्यालयातया कंपन्यांसह छोटे-छोटे प्रस्ताव मिहानच्या मुंबई कार्यालयात तानाजी सत्रे यांच्या कार्यकाळापासनूच अडकून आहेत. फेब्रुवारीपासून सुमीत ट्रेडिंगचा प्रस्ताव प्रलंबित आहे. सत्रे यांनी कंपनीतील प्रलंबित प्रस्ताव तातडीने निकाली काढण्याकडे कधीच लक्ष दिले नाही, असा त्यांच्यावर आरोप आहे. त्याच कारणामुळे मोबाईल टॉवरसाठी व्हिओम नेटवर्क आणि इंडस टॉवर्सला मुंबई कार्यालयाकडून साधे ना-हरकत प्रमाणपत्रही मिळाले नाही. या कंपन्यांकडून वारंवार विचारणा होत आहेत. कॉर्पोरेट कंपन्यांचा बोलबालामिहान-सेझमध्ये सध्या मोठ्या कंपन्यांचा बोलबाला आहे. टाटा कंपनीचे टाल आणि टीसीएस हे दोन प्रकल्प, इन्फोसिस, टेक महिन्द्र, लुपिन, रिलायन्स, फ्युचर गु्रप आणि आता ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन आॅफ इंडियाची (टीसीआय) दोन लाख चौरस फूट जागा अ‍ॅमॅझॉन कंपनीने वेअरहाऊससाठी घेतली आहे. अनिल अंबानी यांच्यासारख्या कॉर्पोरेट घराण्यांना राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर केवळ ३० दिवसांत जागा दिली जाते. ज्या तत्परतेने मोठ्या कंपन्यांना जागा मिळते, तशीच तत्परता लघु आणि मध्यम उद्योगांसाठी नेते आणि अधिकाऱ्यांनी दाखविली पाहिजे. देशात ७० टक्के लघु आणि मध्यम उद्योग असून कोट्यवधीं लोकांना रोजगार मिळाला आहे. मग अशा कंपन्यांचे प्रस्ताव सरकार दरबारी अनेक महिने का पडून राहतात, हा गंभीर प्रश्न आहे.