शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

ओडिशा अपघातानंतर टीकेची धार बोथट करण्यासाठी रेल्वेकडून सुरक्षेच्या खर्चाचा गाजावाजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2023 08:00 IST

Nagpur News ओडिशात झालेल्या भीषण अपघातानंतर देशभरातून उठलेली टीकेची झोड कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षेच्या खर्चाचा गाजवाजा करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सोशल मिडियाचा आधार घेतला आहे.

नरेश डोंगरेनागपूर : ओडिशात झालेल्या भीषण अपघातानंतर देशभरातून उठलेली टीकेची झोड कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षेच्या खर्चाचा गाजवाजा करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सोशल मिडियाचा आधार घेतला आहे.

भारतीय रेल्वेचा सर्वांत भीषण मानला जाणारा अपघात ओडिशातील बालासोरमध्ये २ जूनच्या रात्री घडला. २७५ निर्दोष प्रवाशांचे हकनाक बळी गेल्याने आणि शेकडो प्रवासी जखमी झाल्याने ओडिशातील हा अपघात देश-विदेशात चर्चेला आला आहे.

या भीषण अपघाताचे नेमके कारण कोण आणि त्याला जबाबदार कोण, याची विचारणा होत असतानाच रेल्वेे प्रशासनासह सरकारवरही टिकेची झोड उठली आहे. प्रत्येक वळणावर या अपघाताची चर्चा होत असतानाच रेल्वे अधिकाऱ्यांनी २०१७ ते २०२२ या पाच वर्षांच्या कालावधीतील केलेल्या खर्चाचा आढावा व्हॉटस्अॅप ग्रुपच्या माध्यमातून मांडला आहे.

सुरक्षेवर भारतीय रेल्वेचा खर्च कसा करण्यात आला ते सांगताना २०१७ मध्ये राष्ट्रीय रेल सुरक्षा कोष (आरआरएसके) निधी अंतर्गत सुरक्षेच्या कार्याकरिता अव्यय (नॉन लॅप्सेबल) खर्चासह १ लाख कोटी रुपयांच्या निधीसह स्थापना झाली आणि भारतीय रेल्वेने २०१७ ते २०२२ पर्यंत सुरक्षेच्या कामांवर १ लाख कोटींहून अधिक खर्च केल्याचे म्हटले आहे.या पाच वर्षांत ट्रॅक नूतनीकरणाचा खर्च सातत्याने वाढला असून २०१७-१८ मध्ये खर्च ८,८८४ कोटी होता, २०२१-२२ मध्ये तो १६,५५८ कोटी झाल्याचे सांगितले आहे. गेल्या ५ वर्षात रेल्वेने यावर ५८,०४५ कोटी रुपये खर्च केल्याचाही दावा केला आहे. वर्ष २००४-२००५ ते २०१३-१४ मधील ४७,०३९ कोटींच्या तुलनेत २०१४-१५ ते २०२३-२४ पर्यंत ट्रॅक नूतनीकरणावर एकूण १,०९,०२३ कोटी खर्च झाल्याचेही म्हहटले आहे.

पूल, लेव्हल क्रॉसिंग गेट्स (आरओबी/ आरयूबी) सिग्नलिंग कामे यांसारख्या सुरक्षेशी संबंधित कामांवरील खर्चाचा आढावा मांडताना २००४-०५ ते २०१३-१४ या कालावधीत ७०,२७४ कोटी खर्च झाला. तर, २०१४-१५ ते २०२३-२४ या कालावधीत १,७८,०१२ कोटी खर्च करण्यात आल्याचे म्हटले आहे.अपघात अन् सुरक्षेची आकडेवारी

या संबंधाने रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याशी संपर्क करून नेमकी अपघातानंतरच ही सुरक्षेच्या कामांची (निधीची) आकडेवारी मांडण्याची गरज का वाटली, असा प्रश्न केला असता ते याबाबत समाधानकारक काही सांगू शकले नाही.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे