शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

जलसंपदा विभागात पदोन्नतीचा घोळ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:27 IST

शरद मिरे भिवापूर : शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी सिंचन व्यवस्थेला बळकटी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी जलसंपदा विभाग महत्त्वाचा ठरतो. ...

शरद मिरे

भिवापूर : शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी सिंचन व्यवस्थेला बळकटी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी जलसंपदा विभाग महत्त्वाचा ठरतो. मात्र याच महत्त्वाकांक्षी विभागात सध्या पदोन्नती प्रक्रियेतील घोळ कार्यरत सेवाज्येष्ठ सहायक अभियंत्यांच्या (श्रेणी १) अनुभवी कर्तृत्वावर घाला घालणारा आहे. सेवाज्येष्ठांना डावलून सहायक कार्यकारी अभियंता संवर्गातील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यावर शासन मेहेरबान आहे. त्यामुळे जलसंपदा विभागातील पदोन्नतीच्या प्रक्रियेत पाणी मुरतेय कुठे, असा प्रश्न पडला आहे.

नियमानुसार एका पदावर दोन सरळसेवेने नियुक्त्या होत नाहीत. मात्र हा पराक्रम जलसंपदा विभागात सुरू आहे. ‘बॅकलॉग’च्या नावाखाली २०१३ मध्ये तब्बल ९६ सहायक कार्यकारी अभियंता संवर्गातील पदे एकाच स्पर्धा परीक्षेव्दारे भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे याविरुद्ध अभियंता संघटनांनी न्यायालयात दाद मागितली होती. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २५ जुलै २०१२ रोजीच्या शासननिर्णयाव्दारे पदभरतीवर निर्बंध नसल्याने सर्व रिक्त पदे भरण्याची कार्यवाही एकाच वेळेस सुरू केल्यास शासनास अपेक्षित असलेल्या गुणवत्तेचे उमेदवार निवडले जाणार नाही. ही बाब अधोरेखित केली असताना सदरची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यामुळे २०१३ मध्ये स्पर्धा परीक्षेव्दारे शिफारस झालेल्या एकूण ९६ अभियंत्यांपैकी तब्बल ७७ अभियंते २०१२ मध्ये ठरवून दिलेल्या किमान गुणांच्या निकषात बसत नसतानासुध्दा त्यांची भरती झाली. त्यामुळे अपेक्षित गुणवत्ता नसतानासुद्धा अतिमहत्त्वाच्या सहायक कार्यकारी अभियंतापदावर आरूढ झाले असून त्यांना आता पदोन्नती मिळत आहे. त्यातही नियुक्त झालेल्या अभियंत्यांचे केवळ ४ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. उर्वरित ८ महिन्यांचे प्रशिक्षण शिल्लक असताना परिविक्षाधीन कालावधी समाप्त करत त्यांना स्थायित्व लाभ प्रमाणपत्र देण्याचा प्रतापही करण्यात आला.

मॅटच्या आदेशाला तिलांजली

यासंदर्भात सहायक अभियंता श्रेणी १ च्या अभियंता संघटनेनी मॅटकडे दाद मागितली. त्यावर सुनावणी होऊन सहायक कार्यकारी अभियंत्यांच्या पदोन्नती प्रक्रियेला स्थगिती देत, मॅटने सेवा नियमानुसार पदोन्नतीची कार्यवाही करण्याबाबत आदेशित केले. शिवाय पदोन्नती नियमावली १९८३ चे पालन करावे असेही सूचित केले. मात्र मॅटच्या आदेशाला तिलांजली देत, जलसंपदा विभागातील पदोन्नती प्रक्रियेतील घोळ कायम आहे. त्यामुळे कौशल्य व अनुभव प्राप्त सहायक श्रेणी १ चे अभियंते पदोन्नतीपासून वंचित आहेत.

काय म्हणते पदोन्नती?

कार्यरत सहायक कार्यकारी अभियंत्यांच्या पदोन्नतीचा कालावधी ४ वर्षे तर सहायक अभियंता श्रेणी १ च्या पदोन्नतीचा कालावधी ७ वर्षाचा आहे. त्यानुसार २०१० ला नियुक्त झालेल्या ९६ सहायक कार्यकारी अभियंत्यांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र २००९ ते २०११ या तीन बॅचेसमध्ये नियुक्त झालेल्या व पदोन्नतीसाठी आवश्यक ७ वर्षाचा कालावधी पूर्ण केलेल्या राज्यभरातील १५० च्यावर सहायक अभियंत्यांना अद्यापही पदोन्नती मिळालेली नाही.