शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

स्वधर्माचे पालनच सर्वश्रेष्ठ आहे

By admin | Updated: December 31, 2015 03:10 IST

आपल्या धर्मातच जीवनाचा मार्ग आहे. या तत्त्वावर विश्वास ठेवून स्वधर्मातच जीवनाचे कल्याण शोधले पाहिजे.

शंकराचार्य स्वामी विद्या नृसिंह भारती महाराज : विश्व स्वधर्म संमेलनाचा समारोप नागपूर : आपल्या धर्मातच जीवनाचा मार्ग आहे. या तत्त्वावर विश्वास ठेवून स्वधर्मातच जीवनाचे कल्याण शोधले पाहिजे. आपल्या धर्मात व्यक्तीच्या उत्थानाचे जे मार्ग सांगितले आहेत, त्याचेच अनुसरण प्रत्येक व्यक्तीने केले पाहिजे. प्रत्येक धर्मात जन्माला येणाऱ्या व्यक्तींनी आपापल्या धर्मावर विश्वास ठेवावा आणि स्वधर्म पालनातून आपली उन्नती करावी, असे मत शंकराचार्य स्वामी विद्या नृसिंह भारती महाराज यांनी व्यक्त केले. श्री शिवशक्ती सेवा समिती, उमरेडच्यावतीने रेशीमबाग प्रांगणात आयोजित तीन दिवसीय विश्व स्वधर्म संमेलनात ते बोलत होते. आज या संमेलनाचा समारोप करण्यात आला. शंकराचार्य म्हणाले, धर्माच्या बाबतीत कुणीही संशय ठेवू नये. आपल्या धर्माच्या मूलतत्त्वावर आपण विश्वास ठेवला पाहिजे, कारण त्यातूनच माणसाची उन्नती होते. आपल्या धर्माने सांगितलेल्या तत्त्वावरच आपले जीवन असले पाहिजे. याप्रसंगी सकाळच्या सत्रात ज्योतिषाचार्य डॉ. विजयकुमार दाणी, इस्कॉनचे अनंतशेष प्रभू, जयश्री पेंढारकर यांचे प्रवचन झाले. सायंकाळच्या सत्रात दीपाली घोंगे यांनी श्रीकृष्णनाट्याचे सादरीकरण केले. दिल्लीच्या राजेंद्र गंगानी यांच्या सुरेल कत्थक नृत्याला याप्रसंगी उपस्थितांनी दाद दिली. कार्यक्रमाला उद्योगपती बसंतलाल शाह, संघाराम महाविहार प्रशिक्षण संस्थानचे भंते श्रद्धाशील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक राजेश लोया, शंकरानंद सरस्वती स्वामी, हार्दिक स्वामी, सद्गुरुदास महाराज, सुरभी हांडे, राजे रघुजी भोसले आणि राजे मुधोजी भोसले प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना समितीचे अध्यक्ष दत्ता महाराज जोशी यांनी केली.(प्रतिनिधी)