शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

५३ टक्के रुग्णांची ऑक्सिजन पातळी धोकादायक स्थितीत होती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:11 IST

सुमेध वाघमारे नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी मृतांचा आकडा चिंता वाढविणारा आहे. नागपूर जिल्ह्यात ४,९७२ रुग्णांच्या ...

सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी मृतांचा आकडा चिंता वाढविणारा आहे. नागपूर जिल्ह्यात ४,९७२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. एकट्या मेडिकलमध्ये २४७२ मृत्यू झाले. यात नागपूर ग्रामीणमधील ५७७, जिल्हाबाहेरील २५९ तर इतर राज्यातील ८१ रुग्ण होते. याला घेऊन मेडिकलने केलेल्या मृत्यूच्या ‘ऑडिट’मध्ये भरती होऊनही पाच दिवसापर्यंत ५३.७ टक्के रुग्णांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण धोकादायक स्थितीत होते. मृत्यूमागे या कारणासोबतच मेडिकलमध्ये पोहचण्यास झालेला उशीर, सुरुवातीच्या दिवसात न मिळालेला योग्य उपचार व औषधांचा तुटवडा आदी कारणेही पुढे केली जात आहे.

कोरोनाचा पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक तीव्र व धोकादायक ठरली. मेडिकलमध्ये जानेवारी ते ३१ मे या दरम्यान ६३४७ कोरोनाचे गंभीर रुग्ण भरती झाले. यातील ३८ टक्के रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. हा आकडा मोठा असल्याने स्वत: मेडिकलने पुढाकार घेत त्या मागील कारणांचा शोध घेणे सुरू केले आहे. यात मेडिकलमध्ये उपचारासाठी आलेल्या कोरोनाबाधितांपैकी केवळ ११ टक्के रुग्णांची ऑक्सिजनची पातळी सामान्य होती. शिवाय, १५ टक्के म्हणजे, ३६८ रुग्ण मृतावस्थेत दाखल झाले. तर, ४६९ रुग्ण (१९ टक्के ) गंभीर होऊन आल्याने त्यांचा २४ तासांच्या आतच मृत्यू झाला.

-ग्रामीणमधील ६० रुग्ण ‘ब्रॉट डेड’

कोरोनाचा दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातून मेडिकलमध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांमध्ये ६० रुग्ण ‘ब्रॉट डेड’ म्हणजे रुग्णालयात मृतावस्थेत दाखल झाले, तर पहिल्या २४ तासांत १२८ रुग्णांचे मृत्यू झाले. मृतांमध्ये उमरेडमधील ५३, काटोलमधील ३८, सावनेरमधील ५१, रामटेकमधील ३०, कुहीमधील ३०, हिंगण्यामधील २६, कामठीतील १७, पारशिवनीतील ७, भिवापूरमधील ११, कोराडीतील १५, खापरखेडामधील १६, बुटीबोरीतील १०, कळमेश्वरमधील ३०, मौदामधील १२, वाडी (ग्रामीण)मधील २९, नरखेडमधील २१, दहेगावमधील ४, भिलगावमधील ६, कन्हानमधील ५, बोरखेडीमधील १, पाटणसावंगीमधील २, मकरधोकडामधील २ व इतर ग्रामीण भागातून १६३ असे एकूण ५७७ रुग्णांचा मृत्यूची नोंद आहे.

-भंडारा जिल्ह्यातील ६२ रुग्णांचा मृत्यू

जानेवारी ते मे या दरम्यान जिल्हाबाहेरील रुग्णांमध्ये भंडारा जिल्ह्यातील सर्वाधिक ६२ रुग्णांचे मेडिकलमध्ये मृत्यू झाले आहेत. या शिवाय, अकोला जिल्ह्यातील १०, अमरावती जिल्ह्यातील ३२, बुलडाणा जिल्ह्यातील ३, चंद्रपूर जिल्ह्यातील ५८, गडचिरोली जिल्ह्यातील १३, गोंदिया जिल्ह्यातील १७, जळगाव जिल्ह्यातील १, मुंबई येथील, वर्धा जिल्ह्यातील ४६, यवतमाळ जिल्ह्यातील १३, वाशिम जिल्ह्यातील २ तर नाशिक जिल्ह्यतील १ असे एकूण २५९ मृत्यू आहेत.

-मध्य प्रदेशातील ६९ रुग्णांचे गेले बळी

आजूबाजूच्या राज्यातील कोरोनाचा रुग्णांनी मेडिकलमध्ये उपचार घेतले. यात मध्य प्रदेशातील ६९, छत्तीसगड येथील ५, उत्तर प्रदेशातील ३, झारखंड येथील ३ तर बिहार येथील १ असे एकूण ८१ रुग्णांचे बळी गेले आहेत. या मागेही रुग्ण गंभीर होऊन व गुंतागुंत वाढल्यावर मेडिकलमध्ये दाखल झाल्याची कारणे दिली जात आहे.