शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

आता चंद्रपूरला ओझोन वायू प्रदूषणाचा धोका

By admin | Updated: June 4, 2017 14:29 IST

चंद्रपूरसह राज्यातील औरंगाबादमध्येही ओझोनचे प्रमाण वाढल्याची नोंद केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निरीक्षणात करण्यात आली आहे.

मिलिंद कीर्तीचंद्रपूर : ओझोन वायू वातावरणाच्या वरच्या भागातील थर असून एकीकडे तो सूर्याच्या अतिनील किरणापासून पृथ्वीचे संरक्षण करीत असतो. तोच ओझोन वायू पृथ्वीवर निर्माण झाल्याने धोकादायक ठरू लागला आहे. चंद्रपूरकरिता वायू व जल प्रदूषणाचा विषय नवीन नाही. परंतु वाढत्या तापमानामुळे नव्याने ओझोन वायू प्रदूषणाचा धोका वाढला आहे. चंद्रपूरसह राज्यातील औरंगाबादमध्येही ओझोनचे प्रमाण वाढल्याची नोंद केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निरीक्षणात करण्यात आली आहे. वायू प्रदूषणाचे मोजमाप महत्त्वपूर्ण घटक (पार्टिक्युलेट मॅटर) २.५, पीएम १०, कॉर्बन मोनोआॅक्साईड आणि ओझोनच्या प्रमाणावरून केले जाते. ओझोन वायूच्या प्रदूषणाबाबत युरोप व अमेरिकेमधील पर्यावरण मंत्रालय सजग आहे. परंतु भारतात काही वर्षांपूर्वीपर्यंत त्याचे मोजमापही केले जात नव्हते. आता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ ओझोन प्रदूषणाच्या नोंदी घेत आहे. २ जून रोजी ओझोनची इंडेक्स व्हॅॅल्यू औरंगाबादमध्ये १५२ आणि चंद्रपूर शहरात १०७ नोंदविण्यात आली आहे. हे प्रमाण मध्यम स्वरूपाचे (मॉडरेट) आहे. त्यानुसार, ओझोन प्रदूषणाची स्थिती धोकादायक झालेली नाही. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये ओझोन वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढलेले आहे.सध्या मध्यम ओझोन प्रदूषणाच्या कक्षेत महाराष्ट्रातील औरंगाबाद व चंद्रपूर या दोन शहरांचा समावेश आहे. नागपूरचेही तापमान वाढत असल्याने या प्रदूषणाच्या कक्षेत नागपूरदेखील समाविष्ट होण्याचा धोका आहे. मध्यम स्वरूपाच्या ओझोन प्रदूषणामुळे नागरिकांना श्वसन क्रिया त्रासदायक ठरत असते. फुफ्फुसाचे आजार, अस्थमा आणि हृदयरोगाचाही वाढता धोका आहे. ओझोनचे प्रमाण अधिक असल्यास शेतीच्या उत्पादनात घट होते. तसेच रबर, प्लास्टिकच्या वस्तू लवकर खराब होतात. नागपूर येथील निरीने केलेल्या सर्वेक्षणात मुंबई, रायगडनंतर चंद्रपूरचा वायू प्रदूषणात समावेश आहे. त्यात आता ओझोन प्रदूषणाची भर पडली आहे. सध्या ओझोनचे प्रदूषण प्रमाण मध्यम स्वरूपाचे दाखविण्यात येत आहे.ओझोन वायू दुय्यम प्रदूषकजेथे पेट्रोल, डिझेल,, हायड्रोकॉर्बन, नायट्रोजन आॅक्साईड, हायड्रोजन, फ्लोरिन, ब्रोमिन, सल्फर, आणि कोळसा जाळण्यात येतो, तेथे ओझोनची निर्मिती होत असते. हे सर्व चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भूजलात सल्फरचे प्रमाण अधिक आहे. तसेच अनेक वस्त्यांमध्ये कोळसा जाळला जातो. तेथे तापमानही अधिक आहे. त्यामुळे ओझोन निर्मितीचे प्रमाण वाढले आहे. इतर शहरांमध्ये हे सर्व घटक एकाच वेळी जुळून येत नाहीत. त्यामुळे तेथे ओझोन प्रदूषणाचा धोका दिसून येत नाही.वाढत्या तापमानामुळे चंद्रपूरमध्ये ओझोन वायू प्रदूषणाचा नवीन धोका येऊ घातला आहे. त्यातून लोकांच्या आरोग्याची समस्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने चंद्रपूरचे वाढते तापमान व ओझोनचा अभ्यास करावा. तापमान वाढू नये, याकरिता सिमेंट काँक्रीटचे रस्ते न बांधणे, घरांना उष्मारोधक रंग देणे, एकाच ठिकाणी उद्योग केंद्रीत न करणे आदी उपाययोजना कराव्यात.-प्रा. सुरेश चोपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी, चंद्रपूर.