शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

आता चंद्रपूरला ओझोन वायू प्रदूषणाचा धोका

By admin | Updated: June 4, 2017 14:29 IST

चंद्रपूरसह राज्यातील औरंगाबादमध्येही ओझोनचे प्रमाण वाढल्याची नोंद केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निरीक्षणात करण्यात आली आहे.

मिलिंद कीर्तीचंद्रपूर : ओझोन वायू वातावरणाच्या वरच्या भागातील थर असून एकीकडे तो सूर्याच्या अतिनील किरणापासून पृथ्वीचे संरक्षण करीत असतो. तोच ओझोन वायू पृथ्वीवर निर्माण झाल्याने धोकादायक ठरू लागला आहे. चंद्रपूरकरिता वायू व जल प्रदूषणाचा विषय नवीन नाही. परंतु वाढत्या तापमानामुळे नव्याने ओझोन वायू प्रदूषणाचा धोका वाढला आहे. चंद्रपूरसह राज्यातील औरंगाबादमध्येही ओझोनचे प्रमाण वाढल्याची नोंद केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निरीक्षणात करण्यात आली आहे. वायू प्रदूषणाचे मोजमाप महत्त्वपूर्ण घटक (पार्टिक्युलेट मॅटर) २.५, पीएम १०, कॉर्बन मोनोआॅक्साईड आणि ओझोनच्या प्रमाणावरून केले जाते. ओझोन वायूच्या प्रदूषणाबाबत युरोप व अमेरिकेमधील पर्यावरण मंत्रालय सजग आहे. परंतु भारतात काही वर्षांपूर्वीपर्यंत त्याचे मोजमापही केले जात नव्हते. आता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ ओझोन प्रदूषणाच्या नोंदी घेत आहे. २ जून रोजी ओझोनची इंडेक्स व्हॅॅल्यू औरंगाबादमध्ये १५२ आणि चंद्रपूर शहरात १०७ नोंदविण्यात आली आहे. हे प्रमाण मध्यम स्वरूपाचे (मॉडरेट) आहे. त्यानुसार, ओझोन प्रदूषणाची स्थिती धोकादायक झालेली नाही. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये ओझोन वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढलेले आहे.सध्या मध्यम ओझोन प्रदूषणाच्या कक्षेत महाराष्ट्रातील औरंगाबाद व चंद्रपूर या दोन शहरांचा समावेश आहे. नागपूरचेही तापमान वाढत असल्याने या प्रदूषणाच्या कक्षेत नागपूरदेखील समाविष्ट होण्याचा धोका आहे. मध्यम स्वरूपाच्या ओझोन प्रदूषणामुळे नागरिकांना श्वसन क्रिया त्रासदायक ठरत असते. फुफ्फुसाचे आजार, अस्थमा आणि हृदयरोगाचाही वाढता धोका आहे. ओझोनचे प्रमाण अधिक असल्यास शेतीच्या उत्पादनात घट होते. तसेच रबर, प्लास्टिकच्या वस्तू लवकर खराब होतात. नागपूर येथील निरीने केलेल्या सर्वेक्षणात मुंबई, रायगडनंतर चंद्रपूरचा वायू प्रदूषणात समावेश आहे. त्यात आता ओझोन प्रदूषणाची भर पडली आहे. सध्या ओझोनचे प्रदूषण प्रमाण मध्यम स्वरूपाचे दाखविण्यात येत आहे.ओझोन वायू दुय्यम प्रदूषकजेथे पेट्रोल, डिझेल,, हायड्रोकॉर्बन, नायट्रोजन आॅक्साईड, हायड्रोजन, फ्लोरिन, ब्रोमिन, सल्फर, आणि कोळसा जाळण्यात येतो, तेथे ओझोनची निर्मिती होत असते. हे सर्व चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भूजलात सल्फरचे प्रमाण अधिक आहे. तसेच अनेक वस्त्यांमध्ये कोळसा जाळला जातो. तेथे तापमानही अधिक आहे. त्यामुळे ओझोन निर्मितीचे प्रमाण वाढले आहे. इतर शहरांमध्ये हे सर्व घटक एकाच वेळी जुळून येत नाहीत. त्यामुळे तेथे ओझोन प्रदूषणाचा धोका दिसून येत नाही.वाढत्या तापमानामुळे चंद्रपूरमध्ये ओझोन वायू प्रदूषणाचा नवीन धोका येऊ घातला आहे. त्यातून लोकांच्या आरोग्याची समस्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने चंद्रपूरचे वाढते तापमान व ओझोनचा अभ्यास करावा. तापमान वाढू नये, याकरिता सिमेंट काँक्रीटचे रस्ते न बांधणे, घरांना उष्मारोधक रंग देणे, एकाच ठिकाणी उद्योग केंद्रीत न करणे आदी उपाययोजना कराव्यात.-प्रा. सुरेश चोपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी, चंद्रपूर.