शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कचरा संकलनाचा नवा पॅटर्न : आदेशानुसार लोकांना द्यावे लागणार शुल्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 01:33 IST

पाणीपुरवठ्यानंतर स्वच्छता ही प्राथमिक गरज आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत होणाऱ्या सर्वेक्षणासोबतच आरोग्य विभागाची स्वच्छता यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. घराघरातील कचरा विलगीकरण करून संकलित झाला तर स्वच्छतेची समस्याच राहणार नाही. याचा विचार करता आगामी मार्च महिन्यापासून शहराला दोन भागात विभाजित करून संकलनासाठी दोन एजन्सी नियुक्त करण्यात येतील. कचरा संकलनाचा नवा पॅटर्न राबविला जाईल, अशी माहिती आयुक्त अभिजित बांगर यांनी शनिवारी दिली.

ठळक मुद्देमार्चपासून दोन एजन्सी : ट्रान्सफर स्टेशनमध्ये होणार सर्व प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाणीपुरवठ्यानंतर स्वच्छता ही प्राथमिक गरज आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत होणाऱ्या सर्वेक्षणासोबतच आरोग्य विभागाची स्वच्छता यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. घराघरातील कचरा विलगीकरण करून संकलित झाला तर स्वच्छतेची समस्याच राहणार नाही. याचा विचार करता आगामी मार्च महिन्यापासून शहराला दोन भागात विभाजित करून संकलनासाठी दोन एजन्सी नियुक्त करण्यात येतील. कचरा संकलनाचा नवा पॅटर्न राबविला जाईल, अशी माहिती आयुक्त अभिजित बांगर यांनी शनिवारी दिली.पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना बांगर म्हणाले, मार्च महिन्यात कनकचा कंत्राट संपत आहे. यामुळे नवीन व्यवस्था करावी लागणार आहे. त्यानुसाय मार्च अखेरीस नवीन पॅटर्ननुसार काम करण्यात येईल. यात घराघरातून कचरा संकलन करण्यात येईल. राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार नाममात्र शुल्क नागरिकांकडून वसूल करण्यात येईल. यातून नागरिकांना उत्तम व्यवस्था उपलब्ध केली जाईल. शुल्क वसुलीबाबतचा निर्णय महापालिका सभागृहात घेतला जाणार आहे. घराघरातून कचरा संकलन करण्यासाठी दोन एजन्सी नियुक्त करण्यात येतील. ट्रान्सफर स्टेशन निर्माण करण्यात येईल. यात कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येईल. यामुळे भविष्यात डम्पिंगयार्डची गरजच भासणार नाही. तसेच डम्पिंगयार्ड येथे कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मिती करण्यात येईल. तसेच बायोमायनिंग प्रक्रिया महिनाभरात सुरू करण्यात येईल. लँडफिल भागात प्रक्रिया करण्यात आलेल्या कचऱ्याचा वापर केला जाईल. परिणामी डम्पिंगयार्ड मध्ये कचरा साठणार नाही.बांगर म्हणाले, स्वच्छता सर्वेक्षण ही एक संधी आहे. या संधीचा लाभ घेत कचरा संकलनाची व्यवस्था अधिक बळकट करण्यात येईल. वर्षभरात नागरिकांना उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. शहरात १७ संकलन पॉईंट आहेत. येथील अवस्था बिकट आहे. यामुळे कंटेनरची संख्या वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. बाजारभागात अधिक कचरा निघतो. अशा ठिकाणी कॉम्पेक्टर लावण्यात येतील. कचरा संकलनाची नवीन यंत्रणा उभारली जात आहे.प्रथम झोनल अधिकारी, इन्स्पेक्टरवर कारवाईकचरा संकलनात हयगय करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. प्रथम तंबी दिली जात आहे. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास कारवाई केली जात आहे. अस्वच्छतेच्या बाबतीत सफाई कर्मचारी, ऐवजदार यांच्याऐवजी आधी झोनल अधिकारी, सॅनेटरी इन्स्पेक्टर यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यांना सुधारण्यासाठी संधी देत असल्याचे अभिजित बांगर म्हणाले.ग्रीनबस धावणार, स्कॅनियासोबत चर्चाग्रीन बस संचालनासाठी स्वीडनची कंपनी स्कॅनिया व महापालिका यांच्यात करार झाला आहे. करारातील शर्तीनुसार स्कॅनिया आपची जबाबदारी दुसऱ्या ऑपरेटरक डे हस्तांतरित करत असेल तर यावर विचार केला जाईल. यासाठी स्कॅनिया कंपनीची तयारी आहे. यावर लवकरच निर्णय होईल. नागपूर शहरात ग्रीन बस पुन्हा धावतील. पर्यावरणपूरक परिवहनाला प्रोत्साहन देण्याची भूमिका बांगर यांनी मांडली.महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारलीशहरात अनेक मोठे प्रकल्प होत आहेत. वेळेत पूर्ण झाले तर शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे. राज्य सरकारकडून मिळालेला १५० कोटींचा विशेष निधी, जीएसटी अनुदान फरकाचे १०१ कोटी तसेच दर महिन्याच्या जीएसटी अनुदानात ३६ कोटींनी वाढ केली. यामुळे बिकट आर्थिक स्थितीत असलेल्या महापालिकेला मोठे बळ मिळाले. सोबतच मालमत्ता, पाणीपट्टी, नगररचना व बाजार विभागाच्या उत्पन्नावाढीसाठी प्रयत्न चालू आहे. तीन महिन्यात कंत्राटदारांची देणी देण्यात येतील. अशी ग्वाही बांगर यांनी दिली.कर वसुलीसाठी अन्य विभाग सक्रियमालमत्ता कर हाच महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत आहे. स्वच्छता सर्वेक्षणाचे काम संपल्यावर कर विभातील कर्मचाऱ्यांसोबतच अन्य विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना कर वसुलीच्या कामाला लावण्यात येईल. अभय योजना पुन्हा राबविण्याचा विचार केला जाऊ शकतो. परंतु या योजनेला आधी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. थकबाकीदारांची प्रकरणे निकाली काढण्यात येतील. वन टाइम सेटलमेंटचा पर्याय उपलब्ध आहे. नियमित कर भरणाऱ्यांवर अन्याय केला जाणार नाही. ज्यांना डिमांड मिळालेली नाही. त्यांना दंड आकारला जाणार नाही. यासाठी सभागृहात प्रस्ताव येऊ शकतो.

 

टॅग्स :Abhijit Bangarअभिजित बांगरGarbage Disposal Issueकचरा प्रश्न