शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

उपराजधानीतही मराठ्यांची वज्रमुठ

By admin | Updated: October 24, 2016 02:44 IST

सकल मराठा समाजातर्फे २५ आॅक्टोबर रोजी आयोजित मराठा क्रांती मूक मोर्चाला शहरातील तब्बल १६ वेगवेगळ््या सामाजिक संघटनांनी

मोर्चाला १६ संघटनांचा पाठिंबा : पोलीस प्रशासनही सज्जनागपूर : सकल मराठा समाजातर्फे २५ आॅक्टोबर रोजी आयोजित मराठा क्रांती मूक मोर्चाला शहरातील तब्बल १६ वेगवेगळ््या सामाजिक संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता रेशीमबाग मैदानावरून निघणाऱ्या या मोर्चाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी महाल येथील राजे तेजसिंगराव भोसले सभागृहात झालेल्या पत्रपरिषदेत दिली. मागील तीन महिने राज्यभरात लाखोंच्या संख्येत निघालेल्या मोर्चानंतर आता नागपुरातील या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मोर्चातसुद्धा लाखो मराठा समाज बांधव सहभागी होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या मोर्चाच्या माध्यमातून कोपर्डी येथील घटनेचा निषेध नोंदवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अ‍ॅट्रासिटी कायद्याचा दुरुपयोग थांबवावा, मराठा समाजाला आरक्षण द्या आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा, यासारख्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे. विशेष म्हणजे, हा जिल्हास्तरीय मोर्चा असून, पुढील १४ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन काळात विधानभवनावर काढण्यात येणारा मोर्चा राज्यस्तरीय राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. २५ आॅक्टोबरच्या मोर्चात पुरुषांसह महिला व तरुण-तरुणींची फार मोठी संख्या राहणार आहे. या मोर्चासाठी संपूर्ण विदर्भातील मराठा बांधव एकजूट होणार आहेत. सकल मराठा समाजाने या मोर्चासाठी एक आचारसंहिता तयार केली असून, त्यानुसार संपूर्ण नियोजन केले जात आहे. राज्यभरातील मोर्चाप्रमाणे या मोर्चाचे नेतृत्वसुद्धा पाच मुली करणार आहेत. असा आहे मोर्चाचा मार्ग २५ आॅक्टोबर रोजी मराठा क्रांती मूकमोर्चासाठी संपूर्ण विदर्भातून येणारे मराठा समाज बांधव रेशीमबाग मैदानावर एकत्रित होणार आहेत. यानंतर सकाळी ११ वाजता मोर्चा मार्गक्रमण करून तो तुळशीबाग, महाल, गांधीगेट, सुभाष रोड, टेकडी रोड व संविधान चौकमार्गे दुपारी २ वाजताच्या सुमारास कस्तुरचंद पार्कवर पोहोचेल. येथे सर्वप्रथम कोपर्डी घटनेत बळी पडलेल्या निरपराध बालिकेला श्रद्धांजली वाहण्यात येईल. त्यानंतर जिजाऊ वंदन करून मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या पाच मुली मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येणाऱ्या निवेदनाचे जाहीर वाचन करतील. तसेच यानंतर त्या मुली जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतील. निवेदन सोपवून त्या मुली परत मोर्चेस्थळी येतील. निवेदन दिल्याची घोषणा केली जाईल आणि शेवटी राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता होईल.