शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

उपराजधानीतही मराठ्यांची वज्रमुठ

By admin | Updated: October 24, 2016 02:44 IST

सकल मराठा समाजातर्फे २५ आॅक्टोबर रोजी आयोजित मराठा क्रांती मूक मोर्चाला शहरातील तब्बल १६ वेगवेगळ््या सामाजिक संघटनांनी

मोर्चाला १६ संघटनांचा पाठिंबा : पोलीस प्रशासनही सज्जनागपूर : सकल मराठा समाजातर्फे २५ आॅक्टोबर रोजी आयोजित मराठा क्रांती मूक मोर्चाला शहरातील तब्बल १६ वेगवेगळ््या सामाजिक संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता रेशीमबाग मैदानावरून निघणाऱ्या या मोर्चाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी महाल येथील राजे तेजसिंगराव भोसले सभागृहात झालेल्या पत्रपरिषदेत दिली. मागील तीन महिने राज्यभरात लाखोंच्या संख्येत निघालेल्या मोर्चानंतर आता नागपुरातील या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मोर्चातसुद्धा लाखो मराठा समाज बांधव सहभागी होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या मोर्चाच्या माध्यमातून कोपर्डी येथील घटनेचा निषेध नोंदवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अ‍ॅट्रासिटी कायद्याचा दुरुपयोग थांबवावा, मराठा समाजाला आरक्षण द्या आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा, यासारख्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे. विशेष म्हणजे, हा जिल्हास्तरीय मोर्चा असून, पुढील १४ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन काळात विधानभवनावर काढण्यात येणारा मोर्चा राज्यस्तरीय राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. २५ आॅक्टोबरच्या मोर्चात पुरुषांसह महिला व तरुण-तरुणींची फार मोठी संख्या राहणार आहे. या मोर्चासाठी संपूर्ण विदर्भातील मराठा बांधव एकजूट होणार आहेत. सकल मराठा समाजाने या मोर्चासाठी एक आचारसंहिता तयार केली असून, त्यानुसार संपूर्ण नियोजन केले जात आहे. राज्यभरातील मोर्चाप्रमाणे या मोर्चाचे नेतृत्वसुद्धा पाच मुली करणार आहेत. असा आहे मोर्चाचा मार्ग २५ आॅक्टोबर रोजी मराठा क्रांती मूकमोर्चासाठी संपूर्ण विदर्भातून येणारे मराठा समाज बांधव रेशीमबाग मैदानावर एकत्रित होणार आहेत. यानंतर सकाळी ११ वाजता मोर्चा मार्गक्रमण करून तो तुळशीबाग, महाल, गांधीगेट, सुभाष रोड, टेकडी रोड व संविधान चौकमार्गे दुपारी २ वाजताच्या सुमारास कस्तुरचंद पार्कवर पोहोचेल. येथे सर्वप्रथम कोपर्डी घटनेत बळी पडलेल्या निरपराध बालिकेला श्रद्धांजली वाहण्यात येईल. त्यानंतर जिजाऊ वंदन करून मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या पाच मुली मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येणाऱ्या निवेदनाचे जाहीर वाचन करतील. तसेच यानंतर त्या मुली जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतील. निवेदन सोपवून त्या मुली परत मोर्चेस्थळी येतील. निवेदन दिल्याची घोषणा केली जाईल आणि शेवटी राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता होईल.