शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

गरजू मुलांना तो देतोय यशाचा मंत्र!

By admin | Updated: November 27, 2014 00:19 IST

‘बच्चा काबील बनो काबील, कामयाबी झक मारके पिछे दौडती है’, थ्री इडियट्स चित्रपटातील आमिर खानच्या केवळ या संदेशाने देशातील युवकांना प्रेरणा मिळाली. हाच संदेश गेल्या ३५ वर्षांपासून

खरा रॅन्चो जहांगीर : आमिरच्या चित्रपटात जहांगीरची स्कूटरचक्कीनागपूर : ‘बच्चा काबील बनो काबील, कामयाबी झक मारके पिछे दौडती है’, थ्री इडियट्स चित्रपटातील आमिर खानच्या केवळ या संदेशाने देशातील युवकांना प्रेरणा मिळाली. हाच संदेश गेल्या ३५ वर्षांपासून तळागाळातील विद्यार्थ्यांमध्ये रुजवून त्यांना जीवनाचा मार्ग दाखविण्याचे कार्य पहिला वर्ग शिकलेला शेख जहांगीर शेख उस्मानी ‘रॅन्चो इनोव्हेशन स्कूल’मधून करतो आहे. जहांगीरने बनविलेली स्कूटरचक्की चित्रपटाच्या माध्यमातून जगभरात प्रसिद्ध झाली. मात्र जहांगीरचा हुनर कधीही पुढे आला नाही. चित्रपटातून संदेश देऊन आमिर दुसऱ्या कामालाही लागला. जहांगीर मात्र राज्यातील गोरगरीब युवकांना प्रशिक्षित करण्यासाठी आजही झटतो आहे.ग्रामीण भागातील लोडशेडिंगवर मात करण्यासाठी जहांगीरने स्कूटरचक्की बनविली. नॅशनल इन्व्हेंशन फाऊंडेशनतर्फे अहमदाबाद येथे आयोजित एका प्रदर्शनात जहांगीरची स्कूटरचक्की डेमो म्हणून ठेवली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक राजू हिराणी यांचे स्कूटरकडे लक्ष गेले. स्कूटरची थ्री इडियट या चित्रपटासाठी निवड केली. पुढे चित्रपटाच्या माध्यमातून जहांगीरची स्कूटर जगभर प्रसिद्ध झाली. स्कूटरचक्की बरोबरच स्पे्र पेंटिंगचा व्यवसाय करणाऱ्या जहांगीरने स्कूटरला कॉम्प्रेसरचा जुगाड लावून, वीजेविना चालणारे स्पे्र पेंटिंगचे यंत्र बनविले. चाबीद्वारे चालणारे चार्जर, सायकल मिक्सर यासारख्या अनेक वस्तू त्यांनी बनविल्या आहे. सध्या ते चाबीद्वारे धावणारे चारचाकी वाहन बनवित आहे.लवकरच त्यांचा हा आविष्कार पूर्णत्वास येईल, असा दावा त्यांचा आहे. जहांगीरने केलेल्या आविष्काराबद्दल राष्ट्रपतींकडून त्यांचा सन्मानही झाला आहे. आपल्यातील कलागुण समाजातील गरीब, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या विद्यार्थ्यांना द्यावे, त्यांना स्वत:च्या पायावर उभे करावे, यासाठी ते गेल्या १५ वर्षापासून प्रशिक्षण देतात. आजपर्यंत त्यांनी जळगाव आणि ग्रामीण भागातील ३० हजारावर युवकांना प्रशिक्षण दिले आहे. २०० युवकांना त्यांनी स्वत:च्या पायावर उभे केले आहे. आदिवासी भागातील, झोपडपट्टीतील मुलांना ते प्रशिक्षित करण्याचे काम करीत आहे. तीन वर्षापूर्वी त्यांनी रॅन्चो इनोव्हेशन स्कूलची स्थापना केली आहे. (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावीसध्याच्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांना पुस्तकाद्वारे केवळ ज्ञान दिले जात आहे. प्रॅक्टिकलच्या रूपाने विज्ञान नेमके काय हे शिकविणे आजच्या विद्यार्थ्यांना गरजेचे आहे. हे शिकविल्या जात नसल्याने, लाखो खर्च करून विद्यार्थी डिग्री घेऊनही बेरोजगार आहे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल गोडी निर्माण व्हावी, यातून विद्यार्थ्यांची संशोधक वृत्ती वाढावी, हा प्रयत्न आहे. यासाठी राज्यातील शाळाशाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना अनोख्या पद्धतीने विज्ञान शिकवून त्यांच्यात विज्ञानाप्रती आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे. नागपुरातील काही उर्दु माध्यमांच्या शाळांनी त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे जहांगीर म्हणाले.