शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

लॉकडाऊनचा निर्णय चुकीचा, अन्यायकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:09 IST

नागपूर : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याकरिता व्यापाऱ्यांना जबाबदार ठरवून शासनाने लॉकडाऊन लावून ३० एप्रिलपर्यंत बाजारपेठा बंद ...

नागपूर : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याकरिता व्यापाऱ्यांना जबाबदार ठरवून शासनाने लॉकडाऊन लावून ३० एप्रिलपर्यंत बाजारपेठा बंद केल्या आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होणार आहे. लॉकडाऊनने कोरोना रुग्ण कमी होणार नाहीत. त्याकरिता नागरिकांवर कठोर निर्बंध लादावे. लॉकडाऊन आठवड्याचे अखेरचे दोन दिवस लावावे. पुढे गुढीपाडवा आहे. व्यापाऱ्यांच्या आर्थिक नुकसानीला शासन जबाबदार असल्याचा आरोप करीत शासनाने लॉकडाऊन तात्काळ मागे घ्यावे, अशी प्रतिक्रिया व्यापारी संघटनांनी लोकमतशी बोलताना दिली.

शासनाला ७२ तासांची मुदत

लॉकडाऊन मागे घेण्याची विनंती सरकारला केली आहे. कोरोना रुग्ण कमी करण्यासाठी सरसकट लॉकडाऊन हा मार्ग नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. शासनाला लॉकडाऊन मागे घेण्याची ७२ तासांची मुदत दिली आहे. मागे न घेतल्यास आंदोलन करू.

दीपेन अग्रवाल, अध्यक्ष, कॅमिट.

लॉकडाऊनने काय मिळणार

सरसकट लॉकडाऊन लावून सरकारला काय मिळणार आहे. यामुळे व्यवसाय ठप्प होणार आहे. पुढे गुढीपाडवा आहे. विक्रीसाठी दागिन्यांची ऑर्डर दिली आहे. त्यांना पूर्ण पैसे चुकते करायचे आहे. बँकांचे हप्ते भरायचे आहे. ३० एप्रिलपर्यंत दुकाने बंद राहिल्याने नुकसान होणार आहे.

राजेश रोकडे, सचिव, सोना-चांदी ओळ कमिटी.

व्यापाऱ्यांसाठी ‘डेथ वाॅरंट’

लॉकडाऊनचा निर्णय म्हणजे व्यापाऱ्यांसाठी डेथ वाॅरंट आहे. पुढे व्यापाऱ्यांसमोर आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही. गेल्यावर्षी अशीच स्थिती होती. यावर्षी लॉकडाऊन लावून शासन काय साध्य करणार आहे. निर्बंध व्यापाऱ्यांवर नव्हे तर नागरिकांवर लावण्याची गरज आहे.

अश्विन मेहाडिया, अध्यक्ष, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स.

हॉटेल व्यावसायिकांचे नुकसान

लॉकडाऊनमुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांचे अतोनात नुकसान होणार आहे. आता कुठे हा व्यवसाय थोडा फार सुरू झाला होता, पण आता लॉकडाऊनने पूर्णत: बंद होणार आहे. मालकाला उत्पन्न काहीच नाही, पण खर्च तेवढाच आहे. निर्णय चुकीचा आहे.

तेजिंदरसिंग रेणू, अध्यक्ष, रेशिडेन्सियल हॉटेल असोसिएशन.

निर्णयाने अचंबित

राज्य शासनाच्या लॉकडाऊनच्या निर्णयाने अचंबित झालो आहे. आठवड्याच्या अखेरचे दोन दिवस लॉकडाऊन लावण्याचे अपेक्षित होते. शासनाच्या निर्णयाने सर्वच व्यवसाय धुळीस मिळणार आहे. पुढे खर्च कसा चालवायचा, हा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर आहे.

बी.सी. भरतीया, अध्यक्ष, कॅट.