शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

महास्वच्छता अभियानाकडे सत्ताधाऱ्यांची पाठ

By admin | Updated: June 3, 2015 00:26 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत मोर्शी नगर परिषदेच्या हद्दीत आ. अनिल बोंडे यांच्या प्रयत्नातून महास्वच्छता ...

मोर्शीतील प्रकार : नदीतील गाळ काढण्याचे काम बंदमोर्शी : स्वच्छ भारत अभियानांतर्गत मोर्शी नगर परिषदेच्या हद्दीत आ. अनिल बोंडे यांच्या प्रयत्नातून महास्वच्छता अभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमास नगर परिषदेच्या सत्तारुढ गटातील पदाधिकारी व नगरसेवक अनुपस्थिती राहिले. आम्हाला या कार्यक्रमास बोलाविण्यात आले नव्हते, अशी या गटाची ओरड आहे. देश पातळीवर स्वच्छ भारत अभियान राबविले जात असताना मोर्शी विधानसभा मतदारसंघातही हा उपक्रम राबविण्यात यावा या संकल्पनेतून आ. अनिल बोंडे यांनी वरुड, शेंदूरजनाघाट आणि मोर्शी या तीन नगरपरिषदांच्या शहरात महास्वच्छता अभियान राबविण्याचे ठरविले.कार्यक्रमाची रुपरेषा स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत ठरविण्यात आली. त्यात नगराध्यक्ष, नगरसेवक शहर आणि गाव खेड्यातील नागरिक आणि विविध संघटनांचे पदाधिकारी, अधिकारी उपास्थित होते. आमदार, खासदार निधीतून प्रत्येकी ३ लाख मिळून ६ लक्ष रुपये या कार्यासाठी मिळवून देण्याचे आश्वासनही आ. बोंडे यांनी दिले होते. शहरातून वाहणाऱ्या दमयंती नदीतील गाळ काढून, बेशरम वनस्पतीच्या निर्मूलनाच्या कार्याचा शुभारंभ आ. अनिल बोंडे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता.त्या अनुषंगाने आ. बोंडे यांनी जेसीबीचे पूजन करुन कार्याचा शुभारंभ केला. याप्रसंगी मुख्याधिकारी गीता ठाकरे, नगरपरिषदेचे अभियंता गणवीर, विद्युत विभागाचे प्रशांत खोडे, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता हर्षल पवार, नगरसेवक नितीन उमाळे, अजय आगरकर, सुनीता कुमरे, आप्पा गेडाम, ब्रम्हानंद देशमुख आणि शिवाजी बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष संजय उल्हे, सचिव शेखर चौधरी, शरद कणेर व नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते; तथापि सत्तारुढ गटातील एकही नगरसेवक या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. मात्र त्यांना निमंत्रण नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.(तालुका प्रतिनिधी)निमंत्रण नव्हते !वास्तविक नगरपालिकेच्या हद्दीत महास्वच्छता अभियान राबविण्याचे ठरल्यावर आ. अनिल बोंडे यांनी आयोजित बैठकीस नगराध्यक्षांसह सत्तारुढ नगरसेवक उपस्थित असताना, आम्हाला बोलाविण्यात आले नव्हते, अशी सत्तारुढ गटाच्या भूमिकेविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे. सत्तारुढ गटाची अनुपस्थिती आ. बोंडे यांना विरोध दर्शविणारी तर नाही ना ? किंवा या कार्यक्रमाची धुरा मुख्याधिकारी गीता ठाकरे यांच्याकडे असल्यामुळे त्यांना विरोध म्हणून तर सत्तारुढ गट अनुपस्थित नव्हता, असा सवाल उपस्थित केला जात आहे. नदीचा गाळ काढण्यासाठी लावण्यात आलेल्या जेसीबीचे पैसे आम्ही देणार नाही, अशी भूमिका सत्तारुढ गटाने घेतली.