शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
3
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
4
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
6
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
7
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
8
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
9
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
10
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
11
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
12
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
13
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
14
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
15
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
16
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
17
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
18
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
19
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
20
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'

तापमानवाढीस कारणीभूत देशांमध्ये भारत पाचवा; हरितवायूचे उत्सर्जन नियंत्रणाबाहेर

By निशांत वानखेडे | Updated: April 2, 2023 08:00 IST

Nagpur News जगाच्या एकूण तापमानवाढीत भारताने ०.०८ अंश सेल्सिअसची भर घातली असून, तापमानवाढीस कारणीभूत ठरलेल्या जगातील १० देशांमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर आहे. एकूण प्रमाणात हे याेगदान ४.८ टक्के आहे.

निशांत वानखेडे

नागपूर : जागतिक तापमानवाढ ही जगासाठी नाही तर आपल्या ग्रहासाठीच समस्या ठरली आहे. ही समस्या निर्माण करणाऱ्या देशांमध्ये भारताचेही याेगदान आहे. जगाच्या एकूण तापमानवाढीत भारताने ०.०८ अंश सेल्सिअसची भर घातली असून, तापमानवाढीस कारणीभूत ठरलेल्या जगातील १० देशांमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर आहे. एकूण प्रमाणात हे याेगदान ४.८ टक्के आहे.

युरोप आणि युनायटेड स्टेट्समधील संशोधकांनी १८५० पासून कार्बन डायऑक्साइड (CO2), मिथेन (CH4) आणि नायट्रस ऑक्साइड (N2O) सारख्या हरितगृह वायूंमुळे झालेले जागतिक तापमानवाढीसाठी राष्ट्रीय योगदानाची गणना केली. १८५१ ते २०२१ पर्यंत भारतातील कार्बन, मिथेन व नायट्रस ऑक्साइड या वायूंच्या उत्सर्जनामुळे अनुक्रमे ०.०४ अंश सेल्सिअस, ०.०३ अंश सेल्सिअस आणि ०.००६ अंश सेल्सिअस जागतिक तापमान वाढ झाली आहे. या याेगदानासह टाॅप १० देशांत भारत पाचव्या क्रमांकावर असल्याचे वैज्ञानिक डाटामध्ये प्रकाशित संशाेधनात आढळून आले आहे. हा डेटासेट हवामान धोरण आणि बेंचमार्किंगची माहिती देण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

 

- अभ्यासाच्या विश्लेषणानुसार मिथेन ०.४१ अंश सेल्सिअस व एन२ओ ०.०८ अंश सेल्सिअसच्या तुलनेत कार्बन डायऑक्साइड १.११ अंश सेल्सिअस तापमानवाढीसाठी जबाबदार आहे.

- यादीत यूएसए पहिल्या क्रमांकावर. एकूण तापमानवाढीत यूएसएचे याेगदान ०.२८ अंश सेल्सिअस म्हणजे १७.३ टक्के आहे.

- रशियाला मागे टाकून चीन दुसऱ्या क्रमांकावर. याेगदान ०.२० अंश सेल्सिअस. (१२.३ टक्के)

- रशिया तिसऱ्या क्रमांकावर. ०.१० डिग्री सेल्सिअस. प्रमाण ६.१ टक्के.

- ब्राझील चाैथ्या क्रमांकावर, याेगदान ०.०८ डिग्री सेल्सिअस व प्रमाण ४.९ टक्के

- भारत २००५ पूर्वी १० व्या क्रमांकावर हाेता, पण त्यानंतर झेप घेत ५ व्या क्रमांकावर आला.

- इंडोनेशिया, जर्मनी, युनायटेड किंगडम, जपान आणि कॅनडा यांनी प्रत्येकी ०.०३-०.०५ डिग्री सेल्सिअस तापमानवाढीचे योगदान दिले.

- औद्याेगिक क्रांतीनंतर विकसित देश जागतिक तापमानवाढीस कारणीभूत ठरले आहे.

- जीवाश्म इंधन हे सर्वाधिक कारणीभूत

कार्बन संबंधित तापमानवाढीच्या तुलनेत मिथेन आणि नायट्रस ऑक्साइडमुळे तापमानवाढीसाठी भारत, चीन आणि ब्राझीलचे योगदान अनुक्रमे ११० टक्के, ५६ टक्के आणि ५५ टक्क्यांनी वाढले आहे.

- संशाेधकांच्या मते मिथेन व नायट्रस ऑक्साइडचे उत्सर्जन अनिश्चित आहे.

- जीवाश्म इंधनातून निर्माण हाेणारे सीओटूचे उत्सर्जन हे सर्वात भयंकर आहे.

- १९९२ पासून, जागतिक जीवाश्म इंधन उत्सर्जनामुळे होणारी अतिरिक्त तापमानवाढ जमीन-वापराच्या बदलामुळे होणाऱ्या अतिरिक्त तापमानवाढीपेक्षा चारपट जास्त आहे.

टॅग्स :weatherहवामान